Tuesday 19 January 2021

रियल इस्टेट, टीम इंडिया आणि कणखरपणाची कसोटी!

 












आपल्या वैयक्तिक  व्यावसायिक आयुष्यातआपल्याला नेहमी एका पाठोपाठ एक अडचणींना तोंड द्यावे लागते, ज्यापैकी बहुतेकींवर आपले नियंत्रण नसते. मात्र आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया देतोआपण परिस्थितीनुरूप  स्वतःमध्ये कसे बदल करतोआपण कसा श्वास घेतो  आपण काय कृती करतो यावर आपले पूर्णपणे नियंत्रण असते”... डायमंड डल्लास पेज

डल्लास पेजज्यांना क्रीडा जगतात डायमंड डल्लास पेज या नावाने ओळखले जातेते एक अमेरिकी व्यावसायिक कुस्तीपटूफिटनेस कोचप्रेरणादायी वक्ता  अभिनेते आहेत. जेव्हा एक कुस्तीपटू प्रेरणादायी वक्ता होतो तेव्हा तोच अडचणींविषयी इतक्या सकारात्मकरित्या  बोलू शकतो  त्यांचे वरील शब्द इतर कुणासाठी नाही तर रिअल इस्टेटसाठी अतिशय आवश्यक आहेत२०२० हे वर्ष बहुतेकांसाठी वैयक्तिक तसेच व्यावसायिक पातळीवरही एखाद्या  वाईट स्वप्नासारखे होतेमात्र गेल्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात भारतीय क्रिकेट संघाच्या म्हणजेच टीम इंडियाच्या बाबतीत एक घटना झाली जी मला इथे सांगाविशी वाटतेरिअल इस्टेटविषयी पुन्हा बोलण्याआधी मी माझ्या कार्यालयातल्या  माझ्या बांधकाम स्थळांवरील कर्मचाऱ्यांना उद्देशून एक संदेश लिहीलातो इथे देत आहे

संदेश  (हा वॉट्सॲपवर पाठवलेला संदेश होतात्यामुळे मी भाषा अनौपचारिक ठेवली होती)

प्रिय टीम संजीवनी,

तुम्ही सगळे मी पाठविलेली मिठाई  कशासाठी मिळाले असा विचार करत असाल. आजचा दिवस खास आहेआपण फ्लॅट विक्रीच्या बाबतीत फार उल्लेखनीय कामगिरी करत आहोत म्हणून नाहीतर भारताने ऑस्ट्रेलिया संघावर कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला म्हणूनविशेष या सामना बॉक्सिंग डे च्या दिवशी म्हणजे म्हणजेच नाताळाच्या दुसऱ्या दिवशी सुरू झाला  कसोटी सामन्यातील कामगिरी ही ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी नेहमीच अभिमानाची बाब असते!! लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आधीच्या कसोटी सामान्यामध्ये भारताला अतिशय लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता ज्यामध्ये संघाने कसोटी सामन्यातल्या आत्ता पर्यंतच्या सर्वात कमी म्हणजे सर्व बाद जेमतेम ३६ धावा केल्या होत्याया सामान्यात ते कप्तान विराट कोहलीशिवाय खेळले ज्याने मागील कसोटी सामन्यामध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्याभारतीय संघावर कुणीही पैसे लावले नव्हतेमात्र एखाद्या सर्वसामान्य संघात  विजेत्यांमध्ये हाच फरक असतोतुमच्या क्षमतेविषयी कोण काय म्हणत आहे यापेक्षाही शेवटी तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे महत्त्वाचे आहेभारतानेही नेमके हेच केलेत्यांनी उद्दिष्टावर लक्ष्य केंद्रित केलेस्वतःवर विश्वास ठेवला  मैदानावर आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली.
मी अशा स्पर्धांमधूनही हेच शिकलो आहेऑस्ट्रेलियाने वाईट खेळ केला असे नाही तर भारतीय संघाने आपला सर्वोत्तम खेळ केलाआपणही यातून शिकले पाहिजे  वाईट काळ विसरून आपली सर्वोत्तम कामगिरी करायचा प्रयत्न केला पाहिजेत्यानंतर विजय आपलाच असेल.

संदेश 

मी क्रिकेटमध्ये अलिकडच्या काळात पाहिलेला बरोबरीत संपलेला सर्वोत्तम सामना... तिसरी टेस्ट मॅच

कसोटी क्रिकेटचा हा सर्वोत्तम खेळ होता, हे केवळ बॅट  बॉलने खेळलेले युद्ध नव्हते तर दोन मनोवृत्तींचे युद्ध होते, आपली सर्वोत्तम कामगिरी दाखविण्यासाठीचे युद्ध होते. पुजाराने जवळपास २०० चेंडूत ७७ धावा केल्या, रिषभ पंतने ११२ चेंडूत ९७ धावा केल्या तर अश्विन  हनुमा विहारी यांच्या जोडीने ४१ षटके जागतिक क्रिकेटमधील काही सर्वोत्तम गोलंदाजांचा मारा झेलत खिंड लढवलीयाआधीचा थोडासा काळ पाहिला तर त्या दोघांनाही दुखापती झाल्या होत्या  विहारीचा खेळ चांगला होत नव्हतातो नवखा होता  संघातील आपले स्थान राखण्यासाठी धडपडत होताअश्विनला तो गोलंदाज असल्यामुळे कुणी त्याचा विश्वासू फलंदाज म्हणून विचारही करत नव्हतेया जोडगोळीच्या खेळातून आक्रमकताचिकाटीनिश्चयसंयम  धैर्य यांचा मिलाप दिसून आलासध्याच्या भारतीय संघामध्ये नेमके हेच वैशिष्ट्य आहे  आपण केवळ त्याविषयी अभिमान  बाळगता त्यातून शिकले पाहिजेआधीच्या कसोटी सामन्यामध्ये ऐतिहासिक विजय झाला होता, तर हा बरोबरीत सुटलेला ऐतिहासिक सामना होता असे म्हणावे लागेल याचे कारण म्हणजे काहीवेळा सामना जिंकण्यापेक्षाही सामना बरोबरीत सुटणे अधिक चांगले असतेमला नेहमीच कसोटी क्रिकेट आवडते कारण ते जीवनासारखेच आहेत्याच्या प्रवासात तुम्हाला प्रत्येक पैलू अनुभवता येतोतुमची सर्वांगाने कसोटी घेतली जाते  पाच दिवसांच्या प्रवासात दर दिवशी तुम्ही स्वतःला अधिक चांगल्याप्रकारे ओळखू लागता.
जिओ टीम इंडियाअसेच लढत राहा!!...

 

बहुतेक वाचकांना हा संदर्भ माहिती असेल कारण आपल्या देशामध्ये चित्रपट  क्रिकेट हे माणसाच्या जगण्यासाठी ऑक्सिजन  पाण्यासारखे आहेतमात्र प्रत्येक नियमाला नेहमी काही अपवाद असतात म्हणूनच अशा लोकांसाठी पहिला संदेश भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २रा कसोटी सामना जिंकला तेव्हा लिहीला होतापहिला सामना आपण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येने हारलो होतो. दुसरा संदेश जेव्हा आपण तिसरा कसोटी सामना सर्व अडचणींवर मात करून बरोबरीत सोडवला तेव्हा लिहीला होतातेव्हा कोणताही संघ जिंकला नाही तरी भारतीय संघाचा नैतिक विजय झाला होता!

 

आता तुम्ही म्हणाल की त्यात काय मोठेसेतो एक खेळ होता  काही वेळा तुम्ही खेळात जिंकता  काही वेळा खेळात हरतात्याचा रिअल इस्टेटशी किंवा उद्योगाशी किंवा आपल्या जीवनाशी काय संबंध? जेव्हा दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारत विजयी झाल्यानंतर मी मिठाई वाटली तेव्हा माझ्या संघाच्या (कार्यालयातील संघाच्यामनातही हा प्रश्न नक्कीच आला असेलमात्र त्यांनी काही विचारले नाही (मी अगदी एखाद्या सामान्य बॉससारखाच आहेमात्र या देशामध्ये तुम्ही बॉसला प्रश्न विचारत नाहीमग तो घरातला असेल किंवा कार्यालयातला हे वेगळे सांगायची गरजच नाही)मात्र इतरही लोकांच्या मनात बरेच प्रश्न असतील  अनेक लोक रिअल इस्टेटमधील परिस्थिती  भारतीय संघाच्या कामगिरीमध्ये काय संबंध आहे याचा विचार करत असतील.  मी सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की हा लेख केवळ रिअल इस्टेटला लागू होत नाही तर कोणताही व्यवसाय किंवा उद्योगाशी किंवा अगदी सामान्य जीवनाशीही संबंधित आहेदुसरे म्हणजे भारतीय संघाची कामगिरी किंवा विजय किंवा सामना बरोबरीत सुटणे महत्त्वाचे नाही तर त्यांनी या दोन सामन्यांदरम्यान ज्याप्रकारचा खेळ दाखवला ते महत्त्वाचे आहे. एखादा सामना जिंकल्यामुळे अथवा बरोबरीत सोडवल्यामुळे तुम्ही सर्वोत्तम संघ आहात असे नाही किंवा त्यामुळे तुम्ही जगात सर्वोच्च स्थानी पोहोचता असेही नाहीपरंतु कोणतेही युद्ध कधीही अंतिम नसते, मात्र आपण त्यातून जे काही शिकतो ते नक्कीच असतेमला नेमके हेच सांगायचे होते कारण भारतीय संघाप्रमाणेच रिअल इस्टेट नवीन वर्षात प्रवेश करत असताना भूतकाळ (म्हणजे अगदी अलिकडचा भूतकाळएखाद्या वाईट स्वप्नासारखा होता.रिअल इस्टेट विषयी  धोरणांपासून ते घरांच्या मंदावलेल्या विक्रीपर्यंत सर्व आघाड्यांवर सगळ्या नकारात्मक गोष्टी घडत होत्यानुसती अडथळ्यांची शर्यत सुरू होतीअनिश्चिततेमुळे संभाव्य खरेदीदारांमध्ये अस्वस्थता किंवा बेचैनी होती ज्यामुळे घरासारखी महाग गोष्ट खरेदी करताना त्यांच्या निर्णयातून हे दिसून येत होते. त्याचवेळी सध्याच्या ग्राहकांना प्रकल्प पूर्ण करून देण्यासाठी डोक्यावर रेराची टांगती तलवार होतीसुरु असलेल्या प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज सतत वाढत होतेहे कमी होते म्हणून की काय संपूर्ण राज्यात सारखेच विकास नियंत्रण नियम लागू करणे (नेहमीप्रमाणे काही अपवाद वगळून गावांचे विलीनीकरण/वगळणे (मी पुण्याच्या रिअल इस्टेटविषयी बोलतोययासारख्या धोरणांच्या बाबतीत कोणतीही स्पष्टता नव्हती त्यामुळे तुमचे आराखडे मंजूर करून घ्यायचे का  कोणत्या प्राधिकरणाकडून मंजूर करून घ्यायचे हे माहिती नव्हतेअशा इतरही बऱ्य़ाच बाबी होत्याया सगळ्याचा एकत्र परिणाम होऊन अगदी सशक्त (म्हणजे आर्थिकदृष्ट्याविकासकही हताश झालेले होते. 

 

या बरोबरीने अडचणीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया संघ ज्याप्रमाणे जलदगती गोलंदाजीच्या माऱ्याने प्रतिस्पर्धी संघाला हैराण करून सोडतो त्याप्रमाणे सरकारही ग्राहकांसाठी शून्य मुद्रांक शुल्क  बांधकाम व्यावसायिकांनी मुद्रांक शुल्क भरले तर त्यांना इतर शुल्कांमधून ५० टक्के सवलत मिळेल वगैरे अशी विचित्र धोरणे जाहीर करून बांधकाम व्यावसायिकांची परीक्षा पाहात होतेअसोधोरणे तयार करणाऱ्या मंडळामध्ये आपले परम हितचिंतक श्रीदीपक पारेख (माफ करात्यांचा हेतू  ज्ञानाविषयी पूर्णपणे आदर राखत मी हे बोलतोयअसताना तुम्ही आणखी काय अपेक्षा करू शकताहेच सरकार विकासकांनी सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा करतेयात एक रोचक बाब म्हणजे जेव्हा रिअल इस्टेटसाठी काहीतरी चांगले करण्याची वेळ येते (म्हणजे मला म्हणायचे आहे की धोरणांच्या बाबतीत), तेव्हा श्रीपारेख  सर्व सन्माननीय मंडळी स्टीलसिमेंट यासारख्या अत्यावश्यक कच्च्या मालाच्या किंमती कमी करण्याविषयी किंवा रिअल इस्टेटला कमी दराने वित्त पुरवठा करण्याविषयी कधीच सूचना देत नाहीत किंवा प्रस्ताव देत नाहीतअसे का हा प्रश्न मला नेहमी पडतो. असोतो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईलहे कमी म्हणून की काय स्थानिक भाईंचे (नेत्यांचेसातत्याने मागणी करणारे पंटर असतातच तसेच माहितीच्या अधिकाराच्या नावाखाली ब्लॅकमेल करणारेही असतात (त्याचा सदुपयोग करणाऱ्यांविषयी पूर्णपणे आदर राखत हे सांगतोय), ज्यांना बांधकाम स्थळावरील चुकीच्या गोष्टी उजेडात आणण्यापेक्षाही फक्त स्वतःचे खिसे भरण्यात रस असतोत्यानंतर विविध ना हरकत प्रमाणपत्रांची कधीही  संपणारी मालिका असते  अनेक विभागांकडून (अर्थातच सरकारीमंजुऱ्या घ्याव्या लागतातही संपूर्ण प्रक्रिया बांधकाम व्यावसायिकाचा संयमच नाही तर अंत पाहणारी असते. सगळ्यात शेवटी ग्राहक (हे नव्या युगातील ग्राहक आहेतजे आपल्या मोफत वाय-फायचा वापर करायला सज्ज असतात  बांधकाम व्यावसायिकाने एखादी लहानशी गोष्ट त्यांना कळविण्यात काही चूक केली तर समाज माध्यमांवर हात धुवून त्याच्या मागे लागतात (अर्थात बांधकाम व्यावसायिकांनी त्रास दिल्याची अनेक खरी उदाहरणेही आहेत त्यांचा अपवाद वगळून). त्याशिवाय निकृष्ट पायाभूत सुविधा तसेच विजेचे मीटर बसविण्यास होणारा उशीरपाणी पुरवठा  इतर गोष्टांसाठी ग्राहक  माध्यमे बांधकाम व्यावसायिकाला सुळावर चढवतात  खरी चूक सरकार नावाच्या यंत्रणेची असते.

 

या सगळ्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांनी नवीन वर्षात प्रवेश केला आहे जिथे त्यांच्याकडून प्रकल्पाचा ताबा देण्याविषयी त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करणे तसेच थोडेफार पैसे कमावणे अपेक्षित आहे ज्यासाठी तो किंवा ती रिअल इस्टेट व्यवसायामध्ये आलेले असतात; हे कथानक भारतीय संघाने ऑस्ट्रिलियामध्ये जी लढत दिली त्याच्याशी जुळत नाही का? भारतीय संघाचा खेळाविषयीचा दृष्टिकोन रिअल इस्टेटने (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांनीव्यवसायाच्या बाबतीत स्वीकारावा यासाठीच मी हे उदाहरण दिले आहेसामना जिंकायचा प्रयत्न करा म्हणजेच चांगला पैसा कमवा (त्यात काहीच वाईट नाही त्याचवेळी व्यवसायात टिकून राहण्याइतपत कणखरपणा दाखवणेही तितकेच महत्त्वाचे आहेकारण तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहिलात तरच तुम्ही सामना जिंकू शकाल हा खेळाचा साधा नियम असतोत्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने व्यवसायाचे काही मूलभूत नियम पाळले पाहिजेत जे आपल्यापैकी बहुतेक जण गेल्या काही दशकांमध्ये विसरून गेले आहेतकोणत्याही जमीनीच्या व्यवहारासाठी तो पृथ्वीवरचा शेवटचा जमीनीचा तुकडा असल्याप्रमाणे घाई करू नका, तुमच्या नियंत्रणात किंवा क्षमतेबाहेर असलेल्या कशाचेही आश्वासन देऊ नका (विशेषतः रस्ते किंवा पाणी पुरवठा वगैरे), वर्तमानात राहून व्यवहार करा भविष्यात राहून नव्हे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेकाम करतानाएखादे उद्दिष्ट गाठताना तुमच्या ग्राहकांशीविक्रेत्यांशी  कर्मचाऱ्यांशी पारदर्शकपणे वागा तसेच त्यांच्याशी आवर्जून संवाद साधा.

 

सुदैवाने आता कोव्हिड-१९ वरील लस बाजारात आली आहे यामुळे जनतेचे मनोधैर्य निश्चितच वाढले आहेमात्र या लॉकडाउनमुळे  एकूणच परिस्तिथीमुळे लोकांवर शारीरिक व आर्थिक  परिणामापेक्षा त्यांच्या मानसिकतेवर फार मोठा परिणाम झाला आहेया परिणामाच्या जखमा भरून येतील मात्र त्याचे व्रण अपेक्षेपेक्षाही दीर्घकाळ राहतील.  येथून पुढे खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळणार असेल तरच कुठलीही वस्तू खरेदी केली जाईल  स्वतःचे घर घेण्यास प्राधान्य असेल मात्र ते पूर्णपणे गरजेवर आधारित असेल. म्हणूनच, आपण कोणतीही जमीन खरेदी करताना आपले बजेट तसेच घराचे संभाव्य ग्राहक विचारात घ्या, गेल्या काही काळात आपण हे करायला विसरलो आहोत किंबहुना आपल्याला त्याची कधी गरज पडली नाही. तसेच लॉकडाऊनने सरकारच्या खिशालासुध्दा (देशाच्या आर्थिक साठ्यालाझळ बसलीय  ते दोन प्रकारे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करेलएक म्हणजे करशुल्क  अधिभारांच्या माध्यमांमधून बांधकाम व्यावसायिकांच्या  खिशातून काढून घेणे  त्याचवेळी एफएसआय वाढवणेम्हणजे विकासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतीलमात्र ही दुधारी तलवार आहे कारण बाजारातील पुरवठा वाढल्यावर घराच्या ग्राहकांसाठी आणखी पर्याय उपलब्ध होतील  नफा कमी असेलमाफ करा मी अर्थव्यवस्था किंवा वित्तपुरवठा या विषयांवर टिप्पणी करण्यासाठी कुणी वॉरन बफेट नाहीमात्र जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर असता  तुमच्यावर दोन्हीकडून मारा होत असतो तेव्हा तुम्ही भारतीय संघासाठी खेळताय किंवा तुमच्या स्वतःच्या व्यवसायाच्या संघासाठी याने काही फरक पडत नाहीतुम्ही ज्या संघासाठी खेळताय त्या संघाला वाचवणे  उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती करणे एवढेच महत्त्वाचे असतेनाही का?

 

घराच्या ग्राहकांसाठीही हा कसोटीचा काळ आहे कारण एकीकडे त्यांना त्यांच्या करिअरची काळजी घ्यायची आहेत्यांच्या मुलांसाठी भविष्याचे नियोजन करायचे आहेतसेच खर्च सतत वाढतच चालले आहेत  दुसरीकडे घर घेण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहेत्यांनी घर घ्यावे असे सगळ्यांना वाटतेअगदी सरकारलाहीएक लक्षात ठेवा जेव्हा कमी पर्याय असतात तेव्हा निवड करण्यापेक्षाही जेव्हा जास्त पर्याय असतात तेव्हा निवड करणे अवघड असतेकारण तुम्हाला आता शहाणपणाने निवड करावी लागेल. शेवटी मी इतिहासकार मायकेल वुड्स यांनी आपल्या देशाविषयी केलेली एक सुंदर टिप्पणी मला आठवतेय ती इथे सांगतो, “इतिहासामध्ये तलवारीच्या जोरावर अनेक साम्राज्ये निर्माण झालेली पाहता येतीलमात्र भारत हे एकमेव असे साम्राज्य आहे जे आत्मशक्तीच्या जोरावर उभे राहिले आहे”! भारतीय क्रिकेट संघाने या अवतरणाचे मूर्तिमंत उदाहरण दाखवून दिले आहेआता रिअल इस्टेटनेही आपल्याला एका चांगल्या उद्दिष्टासाठी आत्मशक्तीच्या जोरावर कसे लढायचे हे माहिती असल्याचे दाखवून द्यावे  सगळ्यांसाठी उत्तम घराशिवाय आणखी चांगले उद्दिष्ट काय असू शकते?

 

 

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com