Tuesday 28 March 2023

माननीय पंतप्रधान सर, सुनियोजित शहरे व देशाचे भविष्य !

 





























 





मध्यंतरी माझ्या वाचनात मा. पंतप्रधानांनी दिलेल्या एका मुलाखतीमधील त्यांचे सुनियोजित शहरे आणि आपल्या देशाचे भविष्य या बद्दलचे मत वाचनात आलेले , त्यावरून त्यांना लिहावेसे वाटले म्हणून हे पत्र….

 मा, पंतप्रधान सर,

 एक समंजस माणूस स्वतःला जगाप्रमाणे बदलतो: मात्र एक असमंजस माणूस सातत्याने जगाला स्वतःप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच, सर्व प्रगती असंमजस माणसावर अवलंबून असते.” …  जॉर्ज बर्नाड शॉ.

 इंग्रजी साहित्याची अगदी तोंडओळख असलेल्या व्यक्तीलाही शौर्य नाव माहिती असते. मात्र ज्यांनी त्यांच्याविषयी काहीच ऐकलेले नाही त्यांच्यासाठी ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटचे दैवत आहे त्याचप्रमाणे जी. बी. शॉ यांचे नाव इंग्रजी साहित्यासाठी आहे, मला असे वाटते मी याहून अधिक चांगल्याप्रकारे समजावून सांगू शकत नाही. आपल्या माननीय पंतप्रधानांविषयी वाचनात आलेल्या एका वृत्त लेखामुळे मला हे अवतरण आठवले, त्यात त्यांनी म्हटले होतेसुनियोजित शहरे हेच आपल्या देशाचे एकमेव भविष्य आहे. मला आपले माननीय पंतप्रधान कितीही वादग्रस्त असले तरीही त्यांची दूरदृष्टी तसेच कामातील प्रामाणिकपणासाठी त्यांचे कायमच कौतुक वाटते (ते काम कसे पूर्ण केले जाते व ते करण्याच्या पद्धती हा एक स्वतंत्र विषय आहे). जेव्हा ते व त्यांचा पक्ष साधारण नऊ वर्षांपूर्वी (याला बराच काळ झालाय) सत्तेत आले, तेव्हा अगदी सुरुवातीपासूनच त्यांचे ग्राहक (माफ करा पण आजकाल राजकीय पक्ष त्यांच्या मतदारांकडे याच दृष्टीकोनातून पाहतात) शहरांमध्येचे आहेत हे त्यांना माहिती होते व त्यांनी त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. मग स्मार्ट शहर मोहिमेअंतर्गत घरे स्वस्त करण्याचा प्रयत्न असो किंवा पीएमओवाय (प्रधानमंत्री आवास योजना), रेराची अंमलबजावणी किंवा पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद, त्यांनी शहरी लोकसंख्येवर लक्ष केंद्रित केले आहे जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या साठ वर्षात झाले नव्हते ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या ताज्या निवेदनातूनही सरकारचा शहरांबाबतचा दृष्टिकोन दिसून येतो व मी ज्या क्षेत्रात आहे त्याच्याशी त्याचा थेट संबंध येतो ते म्हणजे रिअल इस्टेट, याच कारणामुळे मला त्यांच्या दृष्टिकोनाविषयी लिहावेसे वाटले.

माननीय पंतप्रधान सर, तुम्हाला नियोजित शहरांचे महत्त्व समजले आहे ही फारच चांगली गोष्ट आहे व जेव्हा सर्वोच्च नेत्याला कोणत्याही विषयाचे गांभीर्य (म्हणजे महत्त्व) समजते तेव्हाच त्यासंदर्भात संपूर्ण यंत्रणा कामाला लागते, हाच आपल्या देशामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत (म्हणजे सगळीकडे) लागू होणारा यंत्रणेचा कायदा आहे (उपहासासाठी माफ करा), मग ती एखादी लहान कंपनी असो किंवा च्या बाराखडीतली एखादी कॉर्पोरेट कंपनी किंवा अगदी आपल्यासुद्धा घरातही असो. म्हणूनच, मला खात्री आहे की देशातील तसेच राज्यातील व पुण्यासारख्या शहरातील नागरी नियोजनासाठी थोडे चांगले दिवस येतील. परंतु त्यापूर्वी आधी वस्तुस्थिती काय आहे हे आपण पाहू (म्हणजेच हेच करताना येणारे अडथळे), सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपली दिडशे कोटीहून अधिक लोकसंख्या व या एवढ्या मोठ्या लोकसंख्येतील तफावत कारण घर हे अतिशय महागडे उत्पादन आहे. कोणत्याही शहराचे नागरी नियोजन हे घरांच्या गरजेभोवती फिरत असते व हे समजून घेतलेले नाही व म्हणूनच आपण आत्तापर्यंत सुनियोजित शहरे उभारण्यात अपयशी ठरलो आहोत. आपल्या सगळ्यांना घरे हवी असतात परंतु आपल्यापैकी केवळ काही जणांनाच यासंदर्भातील आपली गरज कायदेशीर मार्गाने पूर्ण करता येते, नियोजित शहरे उभारण्यातील हीच सर्वात मोठी समस्या आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे शहरीकरण हे आपले भविष्य आहे (१५० कोटी लोकसंख्येची कृपा), २०५० पर्यंत आपल्या देशातील जवळपास ५०% लोकसंख्या शहरात किंवा महानगरांमध्ये राहात असेल असा अंदाज आहे. हे का होत आहे तर याचे उत्तर तेथे अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही मूलभूत गरजा पूर्ण होण्याची खात्री आहे, जे जनतेला देण्यामध्ये आपली  खेडी अपयशी ठरली आहेत. म्हणूनच प्रत्येक जण शहराकडे धाव घेत आहे.

या तिन्ही आघाड्यांवर काय स्थिती आहे, घराच्या आघाडीवरील आव्हाने जाणून घेण्यासाठी ही तुलना पाहू या…  या शहरातील (उदाहरणार्थ पुणे) श्रीमंत माणसाला भूक लागली, तर तो मॅरियट किंवा कॉनरॅडसारख्या पंचतारांकित हॉटेलात जाऊ शकतो. एखाद्या उच्च मध्यमवर्गीय माणसाला भूक लागली तर पॅव्हेलियन किंवा फिनिक्स मॉलमधील फूड कोर्टमध्ये एखाद्या चांगल्या उपाहारगृहात जाऊ शकतो. एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला भूक लागली तर त्याच्याकडे एखाद्या शेट्टीच्या किंवा थाळी मिळणाऱ्या उपाहारगृहामध्ये जाण्याचा पर्याय असतो. तिसऱ्या वर्गवारीत माणसाकडे म्हणजे एखादा प्युनला किंवा टॅक्सी चालकाला भूक लागली असेल तर त्याला मर्यादित थाळी वगैरे माफक दरात देणाऱ्या खाणावळींचा पर्याय असतो. एखादा गरीब माणूस (म्हणजे कामगार किंवा रोजंदारीवर काम करणारा मजूर) भुकेला असेल, तर त्याच्याकडे रस्त्यावर पुरी-भाजी किंवा वडा-पाव यासारखे खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांचा पर्याय असतो. हे सगळे खाद्य पर्याय (म्हणजे पोट भरण्यासाठीचे उपाय) कायदेशीरपणे उपलब्ध आहेत, म्हणजे अधिकृतपणे पैसे देऊन तुम्हाला ते उपलब्ध होऊ शकतात व तुम्हाला त्यासाठी एक पावती मिळते जी प्रत्येक कायद्यानुसार स्वीकार्य असते, बरोबर? आता वस्त्रांच्या बाबतीतही असेच आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय ब्रँडपासून ते स्थानिक शिंप्यापर्यंत किंवा अगदी वापरलेले सुद्धा परंतु चांगल्या दर्जाचे तयार कपडे, समाजातील प्रत्येक वर्गासाठी उपलब्ध आहेत, नाहीतर आपल्याला आत्तापर्यंत नग्न मोर्चे पाहावे लागले असते नाही का? म्हणजे समाजाला जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याची आवश्यकता आहे त्यापैकी अन्न व वस्त्र यांची पूर्तता होत आहे व हे आपले यश असून त्यासाठी आपले अभिनंदन केलेच पाहिजे.

आता पुण्यामध्ये (उदाहरणार्थ) घर ही मूलभूत गरज पूर्ण होण्याच्या आघाडीवर काय चित्र आहे ते पाहू, एक श्रीमंत माणूस पैसे देऊन कोणत्याही उच्चभ्रू ठिकाणी घर खरेदी करू शकतो, त्याला काहीच समस्या नसते. एक उच्च मध्यवर्गीय माणूस थोडीशी तडजोड व बँकेकडून थोडेसे कर्ज काढून या शहरातील एखाद्या चांगल्या ठिकाणी घर शोधू शकतो. एका मध्यमवर्गीय माणसाला चांगल्या ठिकाणी अगदी २ बेडरूमचे घर घेण्यासाठी आयुष्यभर झगडावे लागते. त्याला १ बीएचकेवर समाधान मानावे लागते किंवा शहराच्या सीमेबाहेर जावे लागते किंवा कायमस्वरूपी भाड्याच्या घरात राहावे लागते. म्हणजे एकतर त्याला आयुष्यभर हप्ते भरावे लागतात किंवा भाडे भरावे लागते, त्यामुळे घरासारखी मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी त्याच्या खिशाला कायमस्वरूपी भोक पडते. , तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्याला पुण्यासारख्या शहरात घरच मिळणार नाही कारण त्याच्या उत्पन्नातून जवळपास कुठे एक खोलीही मिळत नाही, ( कायदेशीर )  त्यामुळे त्याला शहाराच्या टोकाला कुठेतरी घर घ्यावे लागते किंवा पुणे शहरात झोपडपट्टीत (बऱ्याच आहेत) राहावे लागते किंवा अवैध घरांमध्ये (सदनिकांमध्ये) जी मायबाप सरकारद्वारे कालांतराने वैध केली जातात, मात्र तोपर्यंत स्थानिक नगरसेवकाच्या दयेवर तणावाखाली जगावे लागते. गरीब किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूराचे आयुष्य तर  रस्त्यावरच्या कुत्र्यापेक्षाही वाईट असते कारण त्याला कुठेही जुळवून घ्यावे लागते, त्याला त्याच्या कुटुंबासोबत एक  छप्पर  म्हणून परंतु घराच्या बाबतीत त्याच्याकडे काहीही पर्याय नाही !

माननीय पंतप्रधान सर, आपण (आम्ही मिळून सगळ्यांनी) घराच्या बाबतीत आधी आपले हे अपयश स्वीकारले पाहिजे, तरच आपण शहर सुनियोजित करण्याचा मार्ग शोधू शकू. कारण मध्यमवर्गीय, कनिष्ट मध्यमवर्गीय व गरीब वर्गातील लोकांची संख्या  कोटींमध्ये आहे. या लोकांची घरांची जी गरज आहे त्यामुळेच शहरातील नागरी नियोजनाच्या आघाडीवर प्रत्येक नियोजन अपयशी ठरते. तुमच्या सरकारचे घरे स्वस्त व्हावीत हे धोरण आहे. बांधकामासाठी अनेक प्रकारचे एफएसआय/टीडीआर/सशुल्क एफएसआय/टीओडी किंवा इतरही अनेक बाबी आहेत परंतु हा एफएसआय जेथे वापरता येईल अशी योग्य जमीन कुठे आहे, हा प्रश्न तुम्ही तुमच्या नियोजनकर्त्यांना विचारणे आवश्यक आहे. अलिकडच्या काळात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील दर दुसरी इमारत पुनर्विकासासाठी जात आहे त्यामुळे या भागात अनेक घरे उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही या घरांच्या किमती पाहिल्या आहेत का, या सगळ्यांच्या किमती एक कोटीच्या जादुई आकड्याच्या वरतीच असतात व किती जणांना ही किंमत परवडू शकते, याचा कुणी विचार केला आहे का? यातून मिळणारा सगळा नफा जमीन मालक, सरकारी संस्था व काही प्रमाणात बांधकाम व्यावसायिक (जर तो पुरेसा हुशार असेल) व या संपूर्ण बांधकाम प्रक्रियेचे सहाय्यक (मला खात्री आहे की सहाय्यक म्हणजे कुणाविषयी बोलतोय हे तुम्हाला समजले असेल) उपभोगत आहेत, परंतु जो ग्राहक आहे त्याच्यापर्यंत किती लाभ पोहोचतोय, त्याचे यावर काही नियंत्रण आहे कापरिणामी बहुतेक खऱ्या-खुऱ्या गरजू ग्राहकांना शहराच्या बाहेर जावे लागते किंवा शहरातील झोडपट्ट्या किंवा अवैध घरांचा आसरा घ्यावा लागतोनिकृष्ट सार्वजनिक वाहतुकीमुळे या सगळ्यांना उपजीविकेसाठी शहरापर्यंत प्रवास करण्यासाठी (इथेही नियोजन नाही) स्वतःचे वाहन खरेदी करावे लागते, त्यामुळे त्यांना या वाहनांसाठी जास्त इंधन खर्च करावे लागते व तसेच यामुळे शहरातील सातत्याने अतिक्रमण झालेल्या रस्त्यांवरील वाहतुकीच्या कोंडीत भरच पडते. पंतप्रधान सर, नियोजित शहरांविषयी तुमच्या दूरदृष्टीविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की दूरदृष्टीला जर काटेकोरपणे अंमलबजावणी व देखरेख केल्या जाणाऱ्या कृती योजनेची जोड नसेल तर तिचा काही उपयोग होत नाही. हेच या राज्यातील व देशातील प्रत्येक शहरात व गावामध्ये होताना दिसत नाही, त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये अतिशय गोंधळ किंवा वाहतुकीची कोंडी, झोपडपट्ट्या व कचरा दिसून येतो.

तुमचा (म्हणजे तुमच्या भक्तगणांचा) माझ्यावर विश्वास बसत नसेल, तर पुण्यामध्ये नियोजन प्राधिकरणाने काय गोंधळ घालून ठेवला आहे ते पाहा. तीन दशकांपासून काही गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विलीन करण्याचा वाद सुरू आहे. ती गावे विलीन करण्यात आल्यानंतरही दोन गावांचे विलीनीकरण रद्द करण्यात आले (कारण माहिती नाही). अजूनही या विलीन करण्यात आलेल्या गावांच्या विकास योजनेला आपण अंतिम स्वरूप देऊ शकलेलो नाही, तसेच कोणते नियम लागू करायचे आहेत व कसे लागू करायचे आहे हेदेखील ठरवू शकलेलो नाही. एवढा उशीर होत असताना आणखी थोडा वेळ आवश्यक आहे हे मान्य आहे परंतु किती वेळ म्हणजे थोडा वेळ याचे उत्तर कुणाकडेही नाही किंवा ते शोधण्याची इच्छाही नाही. नियोजनामध्ये होणाऱ्या विलंबाची किंमत कोण चुकवेल, एखादी व्यक्ती नाही तर संपूर्ण शहरालाच त्याची किंमत चुकवावी लागेल किंवा आधीपासूनच चुकवताहेत. कोणत्याही गावासाठी किंवा शहरासाठी विकास योजना निश्चित करण्यासाठी एखादी निश्चित वेळ का असू शकत नाही व वरपासून अशी एखादी यंत्रणा का नाही जी शहराच्या विकास योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करेल, असे प्रश्न तुम्ही तथाकथित सरकारी बाबू किंवा नगर नियोजकांना विचारले आहेत का जे शहराशी संबंधित अशी सर्व धोरणे ठरवतात. तुम्ही विचारले असेल तर त्यांनी काय उत्तर दिले किंवा त्यावर काय उपाययोजना सुचवली हे तुम्ही कृपया सांगू शकता का? औद्योगिक विकास महामंडळ ज्याप्रमाणे उद्योगांना भूखंड देते त्याचप्रमाणे तुम्ही च्या बाराखडीतील कॉर्पोरेट कंपन्यांना भूखंड देऊन त्यांना परवडणाऱ्या घरांवर खर्च करायला व प्रायोगिक तत्वावर पुण्याच्या चारही बाजूंना हजारो घरे बांधायला व ती गरजू तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना भाड्याने द्यायला का सांगत नाही? कारण असे केले तरच शहरातील मध्यवर्ती भाग नियोजित विकासासाठी मोकळा होईल, कुणीही किमान एकदा तरी अशाप्रकारे विचार का करत नाही. याचे कारण म्हणजे, प्रत्यक्षात कुणालाही समाजातील सर्व वर्गांना परवडतील अशी घरे बांधायची नाहीत, नाहीतर बक्कळ पैसा केवळ काही जणांच्या खिशातच कसा राहील, हे सत्य आहे व आपल्या देशामध्ये सुनियोजित शहरे नावाचे स्वप्न अपयशी ठरण्यामागचे मुख्य कारण आहे.

हे सगळे पुरेसे नाही म्हणून की काय सर्व राज्यातील स्थानिक सरकारे (यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे) तथाकथित अवैध बांधकामे वैध करण्याच्या मागे लागलेले आहे, कारण परवडणाऱ्या घरांसाठी तो सर्वात सोपा व सुरक्षित मार्ग आहे. परंतु या प्रक्रियेमध्ये संपूर्ण शहराची कचरापेटी झाली आहे ही वस्तुस्थिती आहे ज्याविषयी वैयक्तिक तुम्ही सोडून इतर कुणालाही चिंता , नसावी असे मला वाटते. कारण, तुम्ही (म्हणजेच सरकार असे वाचावे) सर्वप्रथम चुकीची धोरणे तयार करता, त्यानंतर तुम्ही या धोरणांची अंमलबजावणी उशीरा तसेच चुकीच्या प्रकारे करता व त्यानंतर या धोरणांमुळे सामान्य माणसाला परवडणारे घर मिळणार नसल्यामुळे तुम्ही अवैध वसाहतींकडे काणाडोळा करता. त्यानंतर तुम्ही या अवैध वसाहती गृहबांधणीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वैध करता, ज्यांच्या जमीनी रस्ते किंवा उद्याने किंवा रुग्णालये किंवा डोंगर किंवा जलाशय यासाठी आरक्षित असू शकतात. त्यानंतर तुम्ही सुनियोजित शहरे उभारण्यात असमर्थ असल्याचे गळे काढता. आता नागरी नियोजनाच्या आघाडीवर आपण एक यंत्रणा म्हणून ज्याप्रकारे काम करतो ते कौतकास्पदच म्हणावे लागेल. ही अतिक्रमणे शहराच्या महसुलामध्ये एका नव्या रुपयाचीही भर टाकत नाहीत, ती सुनियोजित शहरांसाठी दुहेरी शाप आहेत. एक म्हणजे ती कोणत्याही प्रकारचा कर किंवा शुल्क भरत नसल्यामुळे शहराचे नुकसान होते व यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्या, तथाकथित कायदेशीर घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या खिशावरील ताण वाढतो. दुसरे म्हणजे यातील बहुतेक घरे (झोपडपट्ट्या/वसाहती) या सरकारी आरक्षित जमीनींवर आहेत यामुळे आधीच विलंबाने होत असलेले नियोजन पूर्णपणे कोलमडते कारण आपण ज्या हेतूने या जमीनी आरक्षित केल्या त्यासाठी त्यांचा विकास कधीच केला जात नाही.

म्हणूनच, माननीय पंतप्रधान सर सुनियोजित शहरांच्या तुमच्या दूरदृष्टीविषयी पूर्णपणे आदर राखून असे सांगावेसे वाटते की, काही तर्कशुद्ध व पूर्णपणे झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा एक स्वतंत्र विभाग किंवा खाते तयार करा व एक कृती योजना तयार कराआपण उदाहरण म्हणून पुणे शहरापासून सुरूवात करू शकतो (त्यासाठी अशीही इथे अनेक जाणकार मंडळी आहेत, हाहाहा) कारण आपण एकाच वेळी सर्व शहरांमध्ये प्रयोग करून पाहू शकत नाही म्हणूनच आधी एका शहरामध्ये प्रयोग करून पाहू, म्हणजे इतर व्यक्ती त्याचे अनुकरण करतील (केवळ एक आशा). 

 

सुनियोजित शहरे हेच आपल्या देशाचे भविष्य आहे असे तुम्ही म्हटले आहे परंतु हे भविष्य कधी साकारच झाले नाही तर काय; किंबहुना तुम्ही जे म्हटलेले नाही, तेच अधिक महत्त्वाचे आहे असे मला वाटते व आता आपण आपल्या भविष्याची काळजी घेण्याची वेळ आली आहे, बरोबरमी या संबंधी कोणत्याही प्रकारची मदत अगदी आनंदाने करेन, कारण मलाही माझ्या शहराच्या भविष्याची काळजी आहे!

संजय देशपांडे. 

संजीवनी डेव्हलपर्स.

ई-मेल आयडी - smd156812@gmail.com

कृपया पुण्यातील रिअल इस्टेटबद्दलचे माझे शेअरिंग खालील You Tube लिंकवर पहा.

.
https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s










Monday 27 March 2023

"द एलिफंट व्हिस्परर्सची " तुतारी !

























मी हत्तींचे निरीक्षण करत तासन् तास घालवले आहेत, ते अतिशय भावनिक प्राणी आहेत हे मला समजले आहे...ही केवळ एक नामशेष होत चाललेली प्रजाती नसून, त्यांना वैयक्तिक पातळीवर देखील माणसांचा अतिशय त्रास सहन करावा लागतोय.” … माईक बाँड

हत्ती लक्ष वेधून घेतात. मात्र फक्त  त्यांच्या आकारामुळे आपल्या काळजाचा ठोका चुकतो असे नाही. डौलदार चालीचा, खांद्यावर जगाचे ओझे घेऊन चालणारा हा प्राणी अतिशय संवेदनशील प्रामाणिक असतो, त्यांचे हृदय वेगाने धडधडत असते त्यांच्या सुपाएवढ्या करड्या, उघड्या कानाप्रमाणे ते खुल्या दिलाचे असतात. मोफो म्हणत असत की हत्ती कधीही विसरत नाहीत या क्षणापर्यंतही त्याचा नेमका अर्थ काय होतो हे मला समजलेले नाही” … किरा जेन बक्स्टन

किरा जेन बक्स्टन यांच्या पहिल्या कादंबरीला हॉलो किंगडमला अमेरिकी विनोदी लेखनासाठीचा थर्बर पुरस्कार, ऑडी पुरस्कार मिळाला ती वॉशिंग्टन स्टेट बुक अवॉर्ड्ससाठीच्या अंतिम यादीमध्ये होती तिला एनपीआर, बुक रायटद्वारे २०१९ चे सर्वोत्तम पुस्तक म्हणून घोषित करण्यात आले होते. माईक बाँड हे अमेरिकी कादंबरीकार, पर्यावरणवादी, युद्ध मानवी हक्कांचे वार्तांकन करणारे पत्रकार कवी आहेत. बाँड यांचा उल्लेख जगण्याच्या थरारपटातील लढवय्येअसा केला जातो वॉशिंग्ट टाइम्सने त्यांना २१ व्या शतकातील एक सर्वात उत्कंठावर्धक लेखक असा त्यांचा गौरव केला आहे. या दोघांच्याही लेखनातील सामायिक घटक म्हणजे हत्ती, विशेषतः वरील दोन अवतरणे हा लेख हत्तींविषयी आहे हे तुम्ही बरोबर ओळखले असेल अर्थात एका चित्रपटाच्या स्वरूपात, (माहितीपटाच्या, अगदी तांत्रिक शब्दात बोलायचे झाले तर) जो देशाच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे एलिफंट व्हिस्परर्स त्याची तरुण दिग्दर्शिका मिस कार्तिकी गोन्साल्विस. आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी या माहितीपटाच्या दिग्दर्शिकेच्या निर्मातीच्या प्रवासाविषयी नेहमीप्रमाणे बरेच काही वाचले असेल, हा माहितीपट गेल्या सहा महिन्यांपासून ओटीटीवर (नेटफ्लिक्स) उपलब्ध आहे. परंतु त्याला ऑस्करसाठी नामांकन मिळताच त्याचे दर्शक कित्येक पटींनी वाढले. त्याला ऑस्कर पुरस्कार मिळताच अचानक त्याचा समावेश सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत झाला आहे, माणसाची मानसिकता कशी असते यात काही आश्चर्य नाही. आपण यशाच्या मागे धावतो शेवटी यशस्वी व्यक्तीला (किंवा चित्रपटाला) अधिक यशस्वी बनवतो, असो.

मी हा माहितीपट टप्प्या-टप्प्याने पाहिला होता, कारण तो ऑस्करला गेला आहे हे मला माहिती होतो म्हणून नव्हे तर मी निसर्गाशी (वन्यजीवनाशी) संबंधित सगळे काही नेटफ्लिक्सवर पाहातो कारण मला कोणत्याही स्वरूपातील जंगल पाहायला आवडतेटीईडब्ल्यू ( एलिफंट व्हिस्परर्सचे मी तयार केलेले संक्षिप्त नाव), हा अगदी शुद्ध वन्यजीवन चित्रपट म्हणता येणार नाही परंतु विषय माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे कारण त्यामध्ये वन्यजीवन मानवातील नातेसंबंध दाखवण्यात आला आहे. या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत, अगदी लाईफ ऑफ पाय ते टू ब्रदर्ससारख्या (दोन्ही वाघांवर आधारित होते) लोकप्रिय चित्रपटांपासून ते डिस्नेच्या काही महान लोकप्रिय चित्रपटांमध्ये मनुष्य प्राण्यांमधील संबंध दाखविण्यात आले आहेत. या विषयावर काही हिंदी चित्रपटही आहेत ज्यामध्ये हत्ती हेच मध्यवर्ती पात्र आहे (आपण सुपर स्टार राजेश खन्ना यांच्या बहराच्या काळातील हाथी मेरे साथी कसा विसरू शकतो). परंतु एलिफंट व्हिस्परर्स हा एखादा चित्रपट नाही किंवा त्याची पटकथा तयार केलेली किंवा लेखकांच्या कल्पनेतून तयार झालेली नाही, ही तामिळनाडू राज्यातील बोम्मन बेल्ली नावाच्या जोड्याची  खरी गोष्ट आहे. मदुमलाईच्या हत्तींच्या छावणीमध्ये काम करणाऱ्या या जोडप्याविषयी हा माहितीपट आहे. ही अशाप्रकारची एकमेव छावणी असावी ज्यामध्ये जखमी हत्तींवर उपचार केले जातात हत्तींच्या अनाथ पिल्लांची काळजी घेतली जाते जेव्हा वन विभागाला अशी खात्री वाटते की ही पिल्ले आता स्वतःची काळजी घेऊ शकतील तेव्हा त्यांना पुन्हा जंगलात सोडले जाते. रघू अम्मू हे दोन असेच हत्ती आहेत जे या माहितीपटाच्या केंद्रस्थानी आहे बोम्मन-बेल्ली हत्तीच्या या दोन पिल्लांची कशी काळजी घेतात यावरच पटकथा आधारित आहे, बस्स. यासोबत हा माहितीपट आपल्याला निलगिरीच्या टेकड्यांमध्ये जंगलाची सफर घडवतो ज्यामध्ये बोम्मन आणि बेल्ली राहतात, ते जंगलामध्येच लहानाचे मोठे झाले आहेतअनेक जण म्हणतील त्यात काय मोठेसे, जंगलामध्ये अशा शेकडो गोष्टी घडत असतात मी हे अमान्य करत नाही. अशावेळी एलिफंट व्हिस्परर्समध्ये काय विशेष आहे, त्यामध्ये वन्यजीवनाचे उत्तम छायाचित्रण किंवा अभिनय किंवा जंगली हत्तीची दृश्ये नाहीत, किंबहुना त्यामध्ये काहीच विशेष नाही हेच या माहितीपटाचे बलस्थान आहे. हा चित्रपट तुम्हाला इतक्या सोप्या खऱ्या स्वरूपात गोष्ट सांगतो की तुम्हीही नकळत या गोष्टीचाच एक भाग होऊन जाता, हेच एलिफंट व्हिस्परर्सचे खरे यश आहे.माहितीपटाच्या चाळीस मिनिटांच्या कालावधीत काहीच नाट्यमय घडत नाही केवळ रघू अम्मू कशाप्रकारे बोम्मन बेल्लीच्या आयुष्यात येतात त्यांचा सहा ते सात वर्षांचा एकत्र प्रवास एवढेच घडते. परंतु निलगिरी पर्वतांच्या, जैव विविधता असलेल्या जंगलांच्या पार्श्वभूमीवरील हा प्रवास, हत्तीची पिल्ले माणसाच्या जोडप्यामध्ये हळूहळू निर्माण होत जाणारा बंध या प्रवासाचे बोम्मनच्या प्रामाणिक आवाजातील (सबटायटलसह) वर्णन तुमच्या मनाचा ठाव घेते, हेच एलिफंट व्हिस्परर्सचे यश आहे.           

 

                                   

 हत्ती आपल्या देशातील अनेक भागांमध्ये अगदी सहजपणे दृष्टीस पडत असले तरीही शेकडो हत्ती प्राणी मनुष्याच्या संघर्षामध्ये मृत्यूमुखी पडतात तसेच बरीच माणसेही मारली जातात. महाकाय आकारामुळे ( त्याला जगवायला आवश्यक खाण्यामुळे) हत्तींना जगण्यासाठी बरीच जागा (अन्न पाणीही) हवी असते माणसांच्या सातत्याने वाढत्या लोकसंख्येमुळे ( हव्यासामुळे) हत्तींसाठी हे अवघड होत चालले आहे. माणसांनी हत्तींना त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग म्हणून सहभागी करून घेतले नाही तर ही प्रजाती नामशेष होईल, हा संदेश अतिशय सोप्या भाषेत देण्यात आला आहे, हेच एलिफंट व्हिस्परर्सचे बलस्थान आहे. हा संदेश हत्तींसाठी असला कारण ते या माहितीपटाच्या केंद्रस्थानी आहेत, तरी प्रत्येक वन्य प्राणी किंवा संपूर्ण परिसंस्थेलाच तो लागू होतो तो माणसाचे डोळे उघडतो, एलिफंट व्हिस्परर्सला ऑस्कर मिळण्यामागे हा अतिशय महत्त्वाचा घटक होता, तसेच तो सर्वार्थाने या पुरस्कारासाठी योग्यही होता. ऑस्कर मिळाल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच बोम्मन बेल्ली यांना बोलावून घेतले त्यांच्या सेवेसाठी त्यांना रोख बक्षिस दिले. मदुमलाईतील हत्तींची छावणी सात वर्षांच्या रघू अम्मूची (माहितीपटात दाखविण्त आलेली हत्तीची पिल्ले) छायाचित्रे काढण्यासाठी अचानक पर्यटकांचे आकर्षण केंद्र झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्व अडीअडचणींवर मात करत, वन विभागाच्या विरोधालाही तोंड देत, बोम्मन बेल्ली अनेक दशकांपासून आपली कौटुंबिक परंपरा पुढे नेत करत असलेल्या या कामाचे महत्त्व आपल्या देशाला जाणवण्यासाठी ऑस्कर मिळावा लागला. सरकारने आता या हत्तींच्या छावणीला निधी दिल्याची बातमीही आली, खरोखरच एक समाज म्हणून आपण अतिशय ढोंगी आहोत, नाही का ?

बोम्मन बेल्ली हत्तींना वाढविण्याचे किंवा त्यांचे काळजीवाहक म्हणून करत असलेले काम किती अवघड आहे हे समजून सांगायचे झाले तर, निधीची नेहमीच चणचण असते हे काम करताना त्यांना कोणतीही शारीरिक इजा झाल्यास कोणत्याही प्रकारचा विमा किंवा तत्सम काहीही तरतूद नसतेएक लक्षात ठेवा की हत्ती हा भावना प्रधान प्राणी आहे माणसांच्या तुलनेत त्याचा आकार शक्ती दहापट जास्त असते, त्यामुळे एखादे चिडलेले हत्तीचे पिल्लूही काळजीवाहक किंवा त्याच्या किंवा तिच्या प्रियजनांच्या जिवासाठी धोकादायक असू शकते. पाळीव हत्तींमुळे मरण पावलेल्या माणसांच्या बाबतीत एक रोचक तथ्य म्हणजे, यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या माहुताचा समावेश आहे, कारण हत्तींच्या मनस्थितीतील बदल किंवा रागाच्या भक्ष्यस्थानी सर्वप्रथम त्यांचे काळजीवाहक किंवा माहुतच पडतात. विरोधाभास म्हणजे बरोबर पाच वर्षांपूर्वी ऑस्कर पुरस्कारांच्याच महिन्यात म्हणजे १८ मार्च रोजी आपण हत्तींच्या रागाची घटना पाहिली या रागाला नागरहोळे व्याघ्र अभयारण्याचे (जे एलिफंट व्हिस्परर्सच्याच क्षेत्रात आहे) क्षेत्र संचालक एस. माणिकनंदा, हे भारतीय वन सेवेतील अधिकारी बळी पडले. ते त्यांच्या चमूसह जंगलामध्ये लागलेला एक वणवा तपासण्यासाठी गेले होते जेथे हत्तींचा एक कळप राहात होता, त्यावेळी हत्तींनी केलेल्या हल्ल्यात ते मारले गेले. आता तुम्ही कल्पना करू शकता की एका प्रशिक्षित उच्च पदस्थ वनाधिकाऱ्याला सर्व प्रकारचे संरक्षण असून तोसुद्धा हत्तींच्या हल्ल्यात मारला गेला. येथे बोम्मन बेल्ली तर केवळ कनिष्ट श्रेणीतील वनमजूर आहेत, जे हत्तींची काळजी घेण्यासाठी त्यांचे आयुष्य धोक्यात घालत आहेत. ते काळजी घेत असलेले हत्ती कोणत्या ना कोणत्या आघाताचे बळी आहेत उदाहरणार्थ आईचा मृत्यू तसेच त्यांना मानवाच्या हस्तक्षेपामुळे इजाही झालेल्या आहेत. हत्तींची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते, ते त्यांना झालेल्या त्रासाचे कारण सहजासहजी विसरत नाहीत हे लक्षात ठेवा. यातील सर्वोत्तम भाग म्हणजे बोम्मन बेल्ली यांनी हत्तींसोबतचे हे खडतर (कठीण) आयुष्य अतिशय सहजपणे आपुलकीने स्वीकारले आहे की काही वेळा हत्तींच्या पिल्लांची काळजी घेताना त्यांचे स्वतः मुलांकडेही दुर्लक्ष होते ही बाबही ते अतिशय मनमोकळेपणाने सांगतात.

या माहितीपटाची दिग्दर्शिका कुमारी कार्तिकी गोन्साल्विसला पूर्णपणे श्रेय दिले पाहिजे, जी केवळ काही दृश्यांमधून किंवा फ्रेममधूनच आपल्याला बोम्मन बेल्ली हत्तींमधील नाते उलगडून दाखवते किंवा आपल्याला हे जोडपे ज्या समर्पणाने हत्तींचे काळजीवाहक म्हणून काम करत आहेत त्याची जाणीव करून देते. एका दृश्यामध्ये बोम्मन आपल्याला तुम्ही हत्तीच्या पिल्लाला कसे हाताळले पाहिजे किंवा अनुभवले पाहिजे हे सांगतो कारण ते खरोखरच तुमचे मूल वाढविण्यासारखे असते, त्यांना स्पर्श करा”, बोम्मन सांगतो कारण हत्तींना तुमचा स्पर्श जाणवतो ते स्पर्शाला प्रतिसाद देतात त्यांना भरपूर वेळ द्या. दुसऱ्या एका दृश्यामध्ये बेल्ली माती झावळ्यांपासून बनवलेल्या खोपट्यामध्ये तिच्या मुलांना रात्री गोष्ट सांगत असते, त्याचवेळी रघू हे हत्तीचे पिल्लू खोपटाभोवती फेऱ्या मारत असते, त्याला बोम्मन बेल्ली यांच्या मुलांबद्दल एखाद्या भावंडाविषयी वाटावी तशी असूया वाटत असते हे या दृश्यामध्ये अगदी नेमकेपणाने चित्रित झाले आहे. हा भाग अतिशय सुंदर नैसर्गिक आहे असेच बारिकसारिक तपशील क्षणांमुळेच एलिफंट व्हिस्परर्सला ऑस्कर मिळाला असावा असे माझे मत आहे. आणखी एक पैलू म्हणजे बोम्मन बेल्ली यांनी ज्या सहजपणे त्यांच्या खडतर आयुष्याचा किंवा त्यांच्या आयुष्याच्या वास्तवाचा स्वीकार केला आहे. कोणतीही खंत मनात बाळगता, तक्रारी करता, तसेच कोणतीही जाहिरात करता ते आपले काम करत आहेत. हा माहितीपट जगाला (केवळ प्रेक्षकांनाच नव्हे) हाच सर्वोत्तम संदेश देतो. ज्या जगामध्ये स्वतःच्या पालकांची किंवा रक्ताच्या नात्यांचीही लोक पर्वा करत नाहीत अशावेळी हे जोडपे त्यांच्या सर्व मर्यादा ओलांडून, हत्तींच्या काही अनाथ पिल्लांची काळजी घेते तसेच त्यांना जीव लावते, माणूस असण्याचा हाच खरा अर्थ आहे, हेच आपल्या समाजाला सांगणे आवश्यक आहे एलिफंट व्हिस्परर्स हा संदेश अतिशय शांत तरीही अतिशय ताकदीने  देतो!

 चित्रपटाच्या समारोपाच्या दृश्यामध्ये काही लहान मुले हत्तीच्या पिल्लाला अंघोळ घालत असतात पाठीमागून बोम्मनचा आवाज येत असतो, माझ्या वडिलांनीही वर्षानुवर्षे हेच केले आता मी बेल्लीही हेच करत म्हातारे झालो आमच्या मुलांनीही हेच करावे असे आम्हाला वाटते, हत्तींवर प्रेम करावे त्यांच्यासोबत मोठे व्हावे, येथेच हा माहितीपट संपतो. एलिफंट व्हिस्परर्स हा काही हत्तीच्या काही सुदैवी पिल्लांविषयी आहे ज्यांना योग्य मदत मिळाली मात्र हे आपल्याभोवती असलेल्या संपूर्ण वन्यजीवनालाही लागू होते ज्यासाठी असे बोम्मन बेल्ली आवश्यक आहेत तीच खऱ्या अर्थाने या माहितीपटाला मिळालेल्या ऑस्करसाठी तसेच एलिफंट व्हिस्परर्सच्या संपूर्ण चमूच्या प्रयत्नांसाठी खरी सलामी असेल. 

ऑस्करच्या मंचावर, कार्तिकी गोन्साल्विस पारितोषिक स्वीकारताना म्हणाली ते शब्द प्रत्येक माणसाच्या मनावर कोरले जातील (म्हणजे गेले पाहिजेत), ती म्हणाली, “मी आज येथे निसर्ग आणि माणसातील पवित्र नात्याबद्दल बोलायला उभी आहे. मी मानवतेचा या पृथ्वीवर ज्या-ज्या प्रजातींसोबत आपण सहजीवन जगतो त्या सर्वांचा गौरव करण्यासाठी उभी आहे”! 

कार्तिकी, खरोखरच, जोपर्यंत बोम्मन बेल्लीसारखी माणसे आहेत तुझ्यासारख्या त्यांच्या गोष्टी संपूर्ण जगापर्यंत पोहोचविणाऱ्या व्यक्ती आहेत, तोपर्यंत वन्य जीवनासाठी आशा जिवंत आहे एवढेच मला वाटते त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे.

--

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

कृपया पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे मत खालील यूट्यूबलिंकवर पाहा..

https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s