Thursday 10 October 2019

स्मार्ट सिटीचे अभिमन्यु !





















आपण जेवढे पहिल्या आपत्तीपासून लांब जातो, खरंतर तेवढेच आपण पुढील आपत्तीच्या जवळ जात असतो .”… डॅनियल सिल्ह्वा
ते त्यांच्या पिढीतील अमेरिकेतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कट व गुप्त हेरकथा लेखक मानले जातात. डॅनियल सिल्ह्वा या न्यूयॉर्क टाईम्सच्या यादीनुसार सर्वाधिक खपाची पुस्तकं असणाऱ्या, पुरस्कार विजेत्या लेखकाच्या लेखनासाठी गुंतवून ठेवणारं, तळमळीनं लिहीलेलं, मनाला पछाडणारं, बुद्धिमान अशी कितीतरी विशेषणं लावली जातात.25 सप्टेंबर 19 च्या रात्री आपल्या स्मार्ट शहरानं या हेरकथा लेखकाचे शब्द खरे ठरवले. त्यादिवशी भीषण पाऊस झाला. पण आपण जी भयंकर परिस्थिती अनुभवली ती फक्त पावसामुळे झालेली नव्हती. ती माणसाच्या निष्कळाजीपणामुळे, आपण केवळ निसर्गाकडेच नाही तर स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आलेली आपत्ती होती. तथाकथित सरकारी अधिकारी (म्हणजे विभाग) ज्यांनी कारवाई करणं किंवा खबरदारी घेणं अपेक्षित होतं, तसंच बांधकाम व्यावसायिक (म्हणजे मला म्हणायचंय की ज्याने कुणी नाल्यांवर काहीतरी बांधकाम केले आहे अशी प्रत्येक व्यक्ती)ज्यांनी बहुतेक नाले किंवा ओढे किंवा पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्रोत बुजवून टाकले आहेत, त्याशिवाय ज्यांनी या पुरात आपला जीव तसंच आयुष्यभर गाठीशी जोडलेला पैसा गमावला तेसुद्धा या आपत्तीसाठी कुठेतरी जबाबदार आहेत असं मी म्हणेन.

अनेकांना माझे वरील विधान आवडणार नाही, कारण आत्तापर्यंत नेहमीप्रमाणे समाज माध्यमं, वृत्त माध्यमं, राजकारणी, सरकार, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी व सामान्य माणूस (म्हणजेच नागरिक), सगळेजण पावसामुळे जो पूर आला व त्यामुळे तथाकथित निष्पाप नागरिकांचं जे नुकसान झालं त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना व संपूर्ण व्यवस्थेला दोष देण्यात व्यग्र आहेत.तीसहून अधिक लोक मरण पावले आहेत व विविध कुटुंबातल्या व्यक्तींना आपल्या प्रियजनांना वाचवताना कसा जीव गमवावा लागला याच्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. रोहित आमले नावाचा एक केवळ पंधरा वर्षांचा आईविना मुलगा त्याच्या आजीचा जीव वाचवताना मरण पावला. एका माणसाच्या घरात जवळपासच्या ओढ्याच्या पाण्याचा लोंढा शिरल्यानंतर घरातून बाहेर पडत असतानातो केवळ त्याच्या एका मुलाला वाचवू शकला, मात्र बायको व दुसऱ्या मुलाला वाचवू शकला नाही.त्यानंतर दोन उच्चशिक्षित तरूण होते, त्यातील सलीम शेख आयटी कंपनीमध्ये अभियंता होता व त्याचा मित्र सीएचा अभ्यास करत होता. दोघंही जण पाणी वाहत असलेला ओढ्यावरचा पूल कारनं ओलांडत असताना त्यांची कार वाहून गेली.त्यानंतर अनेक सोसायट्यांच्या तळघरात हजारो कार व दुचाकी अजूनही बुडालेल्या आहेत, यामुळे अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या सगळ्यात काही आश्चर्यकारक घटनाही घडल्या आहेत. एका मध्यमवयीन माणसाची कार नाल्यातून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यातून वाहात जात होती. मात्र त्याने काही झुडुपांना धरून ठेवल्याने तो वाचला. तीन तास पाण्यात आणि अंधारात घालवल्यावर त्याची सुटका करण्यात आली.अर्थात सगळे एवढे सुदैवी नव्हते. या पुरामुळे झालेली जीवितहानी व मालमत्तेचं नुकसान याची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बहुतांश गरीब लोकांचीमाती व पत्र्यापासून बांधलेली हजारो घरं वाहून गेली आहेत. लहान विक्रेत्यांची दुकानं किंवा दैनंदिन उपजीविकेची साधनंही हातची गेली आहेत.त्या भयाण रात्रीनंतर पाच दिवसांनीही नक्की किती नुकसान झालंय याची अंतिम आकडेवारी आलेली नाही. बचाव व शोध मोहीम सुरू आहे, स्मार्ट शहराची ही अवस्था आहे.केवळ तीन तासांच्या पावसातच ही आपत्ती ओढवली, चांगलंयआणि हा निसर्गाचा पहिला प्रस्ताव  आहे शेवटचा नाही !
आतापर्यंत या आपत्तीच्या कारणांचं विश्लेषण करण्यासाठी तज्ञ समिती स्थापित झाली असेल. प्रत्येक जण आपापली बाजू मांडताना इतरांना दोष देईल (सरकार, बांधकाम व्यावसायिक, झोपड्या इत्यादी)व त्यानंतर विश्लेषण करून गोगलगाईच्या गतीनं त्यावरील उपायोजना सादर केल्या जातील. म्हणूनच मला माझा किंवा वाचकांचा वेळ नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमणे झाली, अवैध बांधकामे पाडली पाहिजेत, पूर रेषा आखल्या पाहिजेत, पावसाचे पाणी शोषण्यासाठी जमीन उघडी ठेवली पाहिजे, म्हणजेच शहरातल्या प्रत्येक जमीनीचे काँक्रिटीकरण करू नका असं सांगण्यात घालवायचा नाही. पण हे काहीच थांबणार नाही, लोक काही काळानी हे सगळं विसरून जातील व आयुष्य पुन्हा सामान्य होईल, जसं ते पूर्वी होतं. मला एक मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे या सगळ्या घटनांमध्ये विशेषतः जिथे मृत्यू झाले तसंच घरातल्या वस्तू व रस्त्यावरील किंवा इमारतीमध्ये लावलेल्या गाड्यांचं नुकसान झालं, तिथे कुणाच्याच लक्षात आली नाही अशी एक महत्त्वाची एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे कासत्य असं आहे की आपण सर्वप्रथम पुरासारख्या अशा आपत्तीसाठी तयारच नव्हतो, हे आपल्या अजिबात लक्षात आलेलं नाही. मी सरकारविषयी बोलत नाही, खरंतर अग्निशमन दल व पोलीसांनी त्यांच्या मर्यादित संसाधनांमध्ये उत्तम कामगिरी केली, (तो सुद्धा आपल्या अपुऱ्या तयारीचाच एक भाग आहेव जीव तसंच मालमत्ता वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मी आपण नागरिकांविषयी बोलतोय. आपण काही वर्षांपूर्वी जपानमध्ये आलेल्या त्सुनामीमुळे आलेले पूर विसरलोय का (अर्थातच आपण विसरलोय), असाल तर तुम्ही यू ट्यूबवर जा व त्या ध्वनीचित्रफिती पाहा. त्यात लोकांनी त्या आपत्तीला कसं तोंड दिलं व प्रतिसाद दिला हे तुम्हाला समजेल.त्यातून आधी जीव वाचण्यासाठी व जमल्यास मालमत्ता वाचवण्यासाठी अतिशय शिस्तबद्धता, परिपक्वता व दृढ निश्चय दिसून आलामाफ करा, पण जेथे हेल्मेट घालणे, रस्त्याच्या योग्य बाजूने वाहने चालवणे यासारखे वाहतुकीचे साधे नियम पाळले जात नाहीत तेथे तुम्ही बेसावध असताना पुरासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यावर गोंधळ व गदारोळाशिवाय दुसऱ्या कशाची अपेक्षा करू शकताखरंतर आपल्यासाठी बेसावध हा अतिशय चुकीचा शब्द आहे कारण आपल्याला सावध असणे म्हणजे काय हेच माहिती नाही ही दुर्दैवानं वस्तुस्थिती आहेआपल्याला आपत्तीला कसं तोंड द्यायचं हे माहिती नव्हतं,आपत्तीचं मुख्य कारण काय होतं, आहे व असेल हे माहिती नाही त्यामुळेच मृतांचा आकडा एवढा वाढला, दर आपत्तीच्या वेळी हा आकडा वाढत राहिला तर मला आश्चर्य वाटणार नाही.आपल्याला आपत्ती थांबवता येत नसेल तर आपल्याला कमीत कमी नुकसान होईल अशाप्रकारे त्याला तोंड देता यायला हवं, नाही का?

खरंतर रोहित आमलेसारख्या मुलाचा मृत्यू पुरामुळे झालेला नाही तर यंत्रणेमुळे झालाय. कारण या यंत्रणेनं त्याला अशा परिस्थितीत काय करायचं हे शिकवलंच नाही. आपली यंत्रणा इतकी गहाळ (घमेंडीत) राहिली की रोहितला त्याच्या म्हाताऱ्या व असाहाय्य आजीला पुराच्या पाण्यातून वाचवावं लागेल अशी परिस्थिती कधी निर्माण होईल असा विचारच तिनं कधी केला नाहीत्या मुलाला फक्त एवढंच माहिती होतं की त्यांच्या घरात पाणी शिरत असताना आजीला एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं, पण हे करत असताना स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हे त्याला कुणी शिकवलंच नव्हतं. ज्या देशाच्या पुराणांमध्ये अभिमन्यूची गोष्ट आहे तिथे आणखी काय अपेक्षा करता येईल? या शूर अभिमन्यु नावाच्या तरुणाला चक्रव्यूहात (सैन्याची रचना) पाठवण्यात आलं, त्यात आत कसं शिरायचं हे त्याला माहिती होतं पण बाहेर कसं पडायचं हे माहितीच नव्हतं, या प्रक्रियेमध्ये त्याला जीव गमवावा लागला.रोहित आमले हा खरंतर आपल्या स्मार्ट शहरातला अभिमन्यूच आहे, या पुरामध्ये ज्यांना जीव गमवावा लागला त्या प्रौढांच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. सलीम शेख व त्याचा मित्र पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांना गाडी चालवता येत होती व त्याचा मित्र पट्टीचा सायकलपटू होता. त्यानं अनेक प्रदेशांमध्ये सायकल चालवली होती, पण त्या दोघांना हे माहिती नव्हतं की पाणी फुटभरही असलं तरी वेगाने वाहत असेल तर त्यात कार उलटू शकते व त्यामुळे कारमधल्या लोकांचा जीव जाऊ शकतो. त्यांना असं वाटलंकी त्यांच्या कारला वाहत्या पाण्यात काहीही होणार नाही, पण ते चूक होते. त्यांच्या या चुकीमुळे त्यांचा जीव गेला, आता मागे त्यांची दुःखी कुटुंब आहेत.ज्या माणसानं पुरात घराची भिंत कोसळल्यामुळे आपला एक मुलगा व बायको गमावली त्याला एक गोष्ट माहिती नव्हती की पूर आल्यानंतर घरातून बाहेर पडण्यासाठी फार वेळ वाट पाहू नये. पाण्याची पातळी अतिशय वाढल्यास त्यामुळे तुमच्यावर भिंत कोसळून मृत्यू ओढवू शकतो. असा मृत्यू पाण्यामुळे नाही तर इमारतीच्या मलब्यामुळे होऊ शकतो, जो तुमच्याही घराचा असू शकतो.एका स्थापत्य अभियंत्याच्या बाबतीतही हेच झालं तो कारमध्ये वाट पाहात बसला होता मात्र पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गात होता व त्याच्या चुकीमुळे (म्हणजे अज्ञानामुळे) त्याला जीव गमवावा लागला, कारण त्याची कार पाण्यात वाहून गेली व तो कारमध्येच होता.
हे झालं मृतांविषयी, हजारो वाहनांच्या मालकांनी आपली वाहने आहेत तिथेच सोडली पण ती सुरक्षितपणे बांधून ठेवली नाहीत. त्यांचा जीव वाचला, पण दुसऱ्या दिवशी त्यांना वाहनांची अतिशय नासधूस झालेली दिसली किंवा त्यांनी दुचाकी किंवा चारचाकी जिथे सोडल्या होत्या त्यापासून कित्येक मैल लांब जाऊन पडलेल्या दिसल्या. पाण्याच्या प्रवाहानं या गाड्या लांबवर वाहून नेल्या व बुडून झाले असते त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान झाले. तुम्ही कोणतीही कार तपासा (दुचाकी बाजूला ठेवा), त्यापैकी किती कारमध्ये नायलॉनचा दोरा, हुक, फ्लॅश लाईट तसंच कुऱ्हाडीसारखी साधने ठेवलेली असतात जी अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी आवश्यक आहेत. मी पैजेवर सांगतो की एकाही कार मालकानं असं साहित्य कारमध्ये ठेवलं नसेल. ज्या व्यवस्थेमध्ये तो मोठा झाला तिनं त्याला फक्त गाडी चालवायला शिकवलं. तो चालवत असलेली कार कधीतरी पाण्याच्या प्रवाहात अडकेल व त्याला कार सोडून द्यावी लागेल असं तिला कधी वाटलंच नाही.त्याशिवाय त्या रात्री अशा अनेक घटना झाल्या जिथे दुचाकी किंवा चारचाकी चालकांना स्थानिक स्वयंसेवकांनी पाणी तुंबलेल्या रस्त्यावरून पुढे जाऊ नका असा सल्ला दिला, मात्र लवकरात लवकर घरी पोहोचायची घाई असल्यामुळे चालकांनी इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. या सगळ्यात त्यांनी स्वतःचा जीव तसंच वाहनं धोक्यात घातली. मी यापैकी कोणत्याही चालकांना दोष देत नाही. त्यांच्यापैकी कुणालाही, कधीही शाळा किंवा महाविद्यालयामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये अशा आपत्तींच्या वेळी पुढील धोक्याच्या इशाऱ्यांचं पालन करण्याविषयी व शिस्तबद्धपणे कृती करण्याविषयी कधीच शिकवण्यात आलं नाही.त्यानंतर ज्या लोकांची इमारतीमध्ये किंवा तळघरात लावलेली वाहनं वाहून गेली त्यांच्याविषयीत्यांनासुद्धा अडाणीच म्हटलं पाहिजे. त्यांनी कधी विचारच केला नाही की त्यांच्या इमारतीशेजारच्या नाल्याची भिंत तुटली तर पाण्याच्या प्रवाहाला वाट कशी करून द्यायची. पाणी साचलं तर ते उपसून काढायला कोणत्याही सोसायटीकडे पंपिंग यंत्रणा नाहीकिंवा डिझेल पंप्स नाहीत जे लाईट गेल्यावर पण चालतात !
तसंच कोणत्याही सोसायटीनं पुराच्या पाण्यामध्ये सुरक्षा सिमा भिंत कशी टिकून राहील हे तपासलं नाही.लोक आता म्हणतील की हे तपासायची जबाबदारी बांधकाम व्यावसायिक किंवा पुणे महानगरपालिकेची नव्हती का, अर्थातच होती पण आता वाहनं कुणाची बुडाली, बांधकाम व्यवसायिकांची का पुणे महानगरपालिकेची? लोकहो तुम्ही दरवर्षी तुमच्या वाहनाचा विमा काढता (आरटीओच्या नियमांची कृपा नाहीतर मला शंका वाटते आपल्यापैकी किती जणांनी तो काढला असता), तर मग तुम्ही तुमच्या इमारतींच्या पायाभूत सुविधांचं पूर किंवा अगदी आगीसाठी सुरक्षा लेखापरीक्षण का करून घेत नाही?

सगळ्यात शेवटी आपला अग्निशमन विभाग व पोलीस दलाच्या जवानांच्या शौर्याविषयी. त्यांनी त्यांचे जीव धोक्यात घालून शक्य त्या सर्व माणसांना तसंच  पाळीव प्राण्यांनाही वाचवलं. एक लक्षात ठेवा हे जवान लोकांचे जीव वाचवत असताना त्यांच्या जीवाला असलेला धोका त्यांच्या वरिष्ठांना नक्कीच माहिती असेल, पण या वरिष्ठांच्याही वर बसलेले लोक अडाणी, अनुत्सुक व निष्काळजी आहेत. असं नसतं तर त्यांनी अग्निशमन विभागाला इतकं कमी मनुष्यबळ तसंच संसाधनांसह एवढ्या भयंकर परिस्थितीला तोंड देण्यासाठी वाऱ्यावर सोडलं नसतं. आपण सगळे हॉलिवुड चित्रपटांमध्ये पाहतो की कोणतीही नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मिती आपत्ती आल्यानंतर हेलिकॉप्टरपासून सगळी आधुनिक यंत्रसामग्री कामाला लागते, इथे अग्निशमन दलाच्या जवानांकडे नागरिकांना वाचवताना साधी लाईफ जॅकेटही नव्हती. यानंतरही आपण या आपत्तीसाठी निसर्ग देवतेलाच दोष देतोय, केवळ ती आपल्याला उलट दोष देत नाही म्हणून पण लक्षात ठेवा  निसर्ग देवता  तिच्या पद्धतीने उत्तर देते  आणि त्यालाच आपण नवीन नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो, हे लक्षात ठेवा स्मार्ट शहराच्या अभिमन्युनो!

संजय देशपांडे
संजीवनीडेव्हलपर्स



No comments:

Post a Comment