Thursday 15 June 2017

कायदा ,विकसक आणि ग्राहक !



















प्रत्येक समाजाला त्याच्या लायकीप्रमाणे गुन्हेगार मिळतात. त्याचप्रमाणे प्रत्येक समाज ज्याप्रकारच्या कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह करतो तसाच कायदा त्यांना मिळतो हे देखील तितकेच खरे आहे”… रॉबर्ट केनडी.

रॉबर्ट फ्रँसिस "बॉबी" केनडी हे मॅसॅच्युसेट्समधील अमेरिकी राजकीय नेते होते. त्यांनी 1965 पासून ते 1968 साली त्यांची हत्या होईपर्यंत न्यूयॉर्कमधून अमेरिकेचे कनिष्ठ सिनेटर म्हणून काम केले. रॉबर्ट यांचा मृत्यूही त्यांचे थोरले बंधू जॉन केनडी यांच्याप्रमाणेच जाला. रॉबर्ट त्यांच्या उदारमतवादी विचारांसाठी ओळखले जात जे त्यांच्या वरील विधानातून दिसून येतात. मात्र कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या यंत्रणेवर त्यांचा विश्वास होत ती त्यांचा जीव वाचवू शकली नाही. या पार्श्वभूमीवर मला एफबीआयचे माजी प्रमुख जे. एडगर हूवर यांचे आणखी एक अवतरण आठवत आहे, “कुटुंबातूनच आलेल्या समस्यांना कायदा रोखू शकत नाही”! आता तुम्ही विचाराल की मी अचानक कायद्याच्या अंमलबजावणीविषयी का बोलतो आहे. रिअल इस्टेट उद्योगात गेल्या काही दिवसांपासून बहुदा तीन महिन्यांपासून एकाच शब्दाची चर्चा सुरु आहे तो म्हणजे रेरा व त्याचे नियमन करणारे रेरा प्राधिकरण. पूर्णपणे अराजकता किंवा अजिबात नियंत्रण नसलेल्या रिअल इस्टेट उद्योगासाठी या कायद्याची अंमलबजावणीकेली जाणार असल्याचं बोललं जातंय. माझ्या रिअल इस्टेटमधल्या सहकाऱ्यांना अराजकता हा शब्द आवडणार नाही, मात्र सरकार, सामान्य माणूस व माध्यमांच्या मनात रिअल इस्टेटची प्रतिमा अशीच आहे. हेच वास्तव आहे कारण इतर कोणत्याही उद्योगासाठी गेल्या सत्तर वर्षात सरकारनं सगळ्या राज्यांमध्ये असा कोणताही विशिष्ट कायदा लागू केलेला नाही. यातूनच पुन्हा एकदा केंद्र सरकार सामान्य माणसाला स्वतःचे घर घेण्यासाठी अच्छे दिन यावेत याबाबक किती गंभीर व जागरुक आहे हे दिसून आले! अर्थात रिअल इस्टेटद्वारे हे खरंच शक्य होणार आहे का हे आगामी काळात कळेच. तरीही रिअल इस्टेट उद्योगाने त्याचे सावधपणे स्वागत केले आहे (स्वागत न करणे कुणाला परवडेल?). परिणामी रेराची अंमलबजावणी झाल्यापासून म्हणजेच 1 मे 2017 पासून सर्व जाहिराती किंवा नव्या प्रकल्पांची सुरुवात रोडावली आहे, तसेच महत्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये रिअल इस्टेटच्या विशेष पुरवण्याही कमी झाल्या आहेत. मे महिना हा रिअल इस्टेटच्या प्रदर्शनांचा महिना म्हणून ओळखला जातो कारण शाळांना सुट्या असतात. मात्र या मे महिन्यात एकही प्रदर्शन आयोजित करण्यात आले नाही कारण त्यात कुणीही सहभागी होणार नाही याची सगळ्यांना खात्री होती. रेराअंतर्गत नोंदणी करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती म्हणजेच 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. संपूर्ण मे महिना व जूनचा पहिला आठवडा संपत आला तरीही संपूर्ण महाराष्ट्रात रेराअंतर्गत जेमतेम पंचवीस प्रकल्प नोंदविण्यात आले आहेत! यातूनच रिअल इस्टेटचा रेराविषयीचा सावधगिरीचा दृष्टिकोन दिसून येतो.

हा रेराविषयीचा लेख नाही. याबद्दल विविध मंचांवरून तसेच माध्यमांमधूनही बरीच चर्चा झालेली आहे, तसेच मी या कायद्याचा सखोल अभ्यास केलेला नाही व दुसरे म्हणजे मी रेराला घाबरत नाही. आपल्याला कायद्याचा आदर वाटला पाहिजे भीती नाही हे मान्य असले तरीही आपल्या देशात अशी परिस्थिती नाही; जोपर्यंत लोकांना कायद्याची भीती वाटत नाही (म्हणजेच कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे होणाऱ्या परिणामाची) ते कायद्याचा आदर करत नाहीत हे कटू सत्य आहे पुणेकरांशिवाय हे जास्त चांगलं कुणाला माहिती असेलरस्त्यावर वाहतूक पोलीस नसेल तर सिग्नल तोडणे, नदीत कचरा फेकणे, जिथे पार्किंग करू नये असं लिहीलं असेल तिथे पार्किंग करणे किंवा प्रवेश निषिद्ध लिहीले असेल तिथून प्रवेश करणे, ही कायद्याची अंमलबजावणी जिथे होत नाही तिथे आपण कायद्याचा किती आदर करतो याची केवळ काही उदाहरणे आहेत. कायद्याचे उल्लंघन केले तरी आपल्याला काही होणार नाही असा जेव्हा समाजातल्या सामान्य माणसाचा दृष्टिकोन असतो तेव्हा या साथीच्या रोगातून रिअल इस्टेट उद्योग तरी कसा सुटणार असा प्रश्न मला विचारावासा वाटतो. आपण जरावेळ रेरा बाजूला ठेवू कारण तो या प्रस्तुत लेखाचा विषय नाही; हा हस्तांतर करारनाम्याविषयीचा (कन्व्हेयन्स डीड) लेख आहे. ज्यांना कन्व्हेयन्स डीड माहिती नसेल त्यांना थोडक्या व सोप्या शब्दात सांगतो ते म्हणजे जोपर्यंत बांधकाम व्यावसायिक तुमच्याशी हा करार करत नाही तोपर्यंत तुम्ही सदनिकेचे मालक होत नाही. हा सुद्धा एक विक्री करारच आहे मात्र त्यामध्ये संपूर्ण प्रकल्प सोसायटीच्या किंवा अपार्टमेंट सहाधिकाराच्या नावे हस्तांतरित केल्यानंतरच तुम्ही ज्या जमीनीवर सदर इमारत बांधलेली आहे तिच्यातील हिश्श्यासह सदनिकेचे मालक होऊ शकता. हुश्श! मला असं वाटतं तुम्हाला समजेल अशा शब्दात मी हे समजावून सांगितलं आहे कारण हस्तांतर करारनाम्याची कायदेशीर व्याख्या किमान मला तरी सांगता येणार नाही. आजकाल समाज माध्यमे, रिअल इस्टेटविषयी लिहीणारे ब्लॉगर यांच्यामुळे हस्तांतर करारनाम्याचे महत्व लोकांना समजू लागले आहे, ते संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे त्यासाठी आग्रह धरू लागले आहेत. मात्र काही विचित्र कारणांमुळे तो नेहमीच वादाचा मुद्दा असतो. याची कारणे अनेक असू शकतात उदा. एखादा बांधकाम व्यावसायिक टप्प्या टप्प्याने प्रकल्प विकसित करत असेल व अंशतः हस्तांतर करारनामा करण्यात आला तर ती सोसायटीही जमीनीची मालक होते व प्रकल्पाच्या आराखड्यातील कोणत्याही सुधारणा किंवा अशा इतर बऱ्याच दस्तऐवजांवर त्यांची स्वाक्षरी आवश्यक असते. प्रत्येक सोसायटीमध्ये असे काही सदस्य असतातच जे हस्तांतर करारनाम्याद्वारे त्यांना मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये मालकी हक्कात काही त्रुटी असतात किंवा बँकेच्या कर्जाचं काही प्रकरण असतं किंवा महानगरपालिकेसारख्या स्थानिक संस्थेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळायचं असतं, ज्यामुळे बांधकाम व्यावसायिक हस्तांतर करारनामा लवकर करू शकत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये विकासक व रहिवाशांमध्ये आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल वाद असतात व हस्तांतर करारनामा करताना त्यावर मतभेद होतात व ही यादी वाढतच जाते.

या पार्श्वभूमीवर आम्ही बाणेरमध्ये आमचा सदाफुली नावाचा एक प्रकल्प नुकताच पूर्ण केला, तो तीन टप्प्यांमध्ये बांधण्यात आला. इतर प्रकरणांमध्ये असते तशीच याही प्रकल्पामध्ये आमची सदनिकाधारकांशी बांधीलकी होती तसेच त्यांच्याकडून अपेक्षाही होत्या. हा प्रकल्प टप्प्या टप्प्याने पूर्ण होणार होता त्यामुळे आम्ही सदनिकाधारकांना विश्वासात घेऊन स्पष्टपणे सांगितलं की तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आम्ही हस्तांतर करार करू, जो आम्ही आश्वासन दिलेल्या वेळात केला. त्यात काही कलमांविषयी वाद होते तसंच काही प्रलंबित कामं होती (ज्याविषयी आमचे मतभेद होते). यासंदर्भात भरपूर वादविवाद झाले, काही वेळा दोन्ही बाजूंनी पोलीसही उपस्थित होते, माझ्यासाठी रिअल इस्टेट उद्योगातील माझ्या सत्तावीस वर्षांच्या कारकिर्दीत असा पहिलाच अनुभव होता. आजूबाजूला प्रलंबित असलेल्या हस्तांतर करारनाम्याच्या प्रकरणांसारखीच परिस्थिती होती; मात्र दोन्ही बाजूंना असा दृष्टिकोन निरुपयोगी असल्याचं जाणवलंत्यानंतर एक दिवस मी, माझ्या प्रकल्पातले भागीदार, सोसायटीचे अध्यक्ष, सचिव सगळे एकत्र बसलो व हा वाद कायद्याने नाही तर आपणच सोडवू असं ठरवलं. त्या क्षणापासून आमच्यात पुन्हा मैत्री झाली; आम्ही मतभेदाच्या मुद्यांची यादी केली व त्यावर स्पष्टपणे चर्चा केली व ते आत्ताच सोडवायचे आहेत असे ठरवले. आमचं उद्दिष्ट स्पष्ट होतं, दोन्ही बाजूंना हस्तांतर करार हवा होता, त्यामुळे सोसायटीला विकल्या न गेलेल्या सदनिकांच्या देखभालीसाठी विशिष्ट रक्कम हवी असेल तर ती द्यायची असं ठरलं. त्याचवेळी सोसायटीला जी कामे अपूर्ण आहेत असे वाटत होते त्या संदर्भात आम्ही कोणती कामे करणे शक्य आहे व कोणती नाहीत व कोणती केली जाणार नाहीत हे स्पष्टपणे सांगितले. दोन्ही पक्षांनी एक पाऊल मागे घेतले व दोन पावले पुढे टाकली व त्या पुढील आठवड्यात आम्ही हस्तांतर करारावर स्वाक्षरी केली व हसतमुखाने तो नोंदवला.

ही गोष्ट इथेच संपत नाही तर सुरु होते आणि तीच खरी गंमत आहे; हस्तांतर करार नोंदवल्यानंतर, त्या सोसायटीचे सचिव रविंद्र पतंगे यांन मला कॉल केला व ते एक भोजन समारंभ आयोजित करणार असून त्यात हस्तांतर करारचे दस्तऐवज आम्ही त्यांना देऊ शकतो असे सांगितलेत्यानंतर मला एक कल्पना सुचली, जी मला खात्री आहे की कुणाही विकासकाने किंवा सोसायटीने राबवली नसेल. मी म्हटलं सर्व सदनिकाधारक, जमीन मालक, सल्लागार व आमचे कर्मचारी यांचं एक संमेलन का आयोजित करू नये ज्यामध्ये आपल्याला सोसायटीचे दस्तऐवज हस्तांतरित करता येतीलमी सांगितले की सगळी तयारी आम्ही आमच्या खर्चानं करू कारण ती आमची जबाबदारी आहे असं मला वाटतं (मी लपवणार नाही, पण काही सदनिका विकलेल्या नसल्यानं त्यामागे थोडा विपणनाचाही विचार होता). फोनवरच आम्ही तारीख, वेळ व ठिकाण ठरवले, भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला व दुसऱ्या दिवशी सगळ्या सदनिकाधारकांना ईमेल तसंच वॉट्स ऍपवर आमंत्रण पाठवलं. त्यापुढे जाऊन, तसंच आमच्या कंपनीच्या संस्कृतीनुसार आम्ही डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे यांना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केलं, ज्या समाजातील प्रत्येक वर्गातल्या मुलांसाठी एक चाईल्ड केअर हेल्पलाईन चालवतात. त्यांनी आपल्या भाषणानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं त्याचशिवाय बाल मानसशास्त्राशी संबंधित अलिकडच्या काळातील समस्या हाताळताना त्यांना आलेले अनुभवही सांगितले. कुठल्याही वयोगटातील मुलं असली तरीही त्यांना जास्तीत जास्त दर्जेदार वेळ द्या अशी श्रोत्यांना विनंतीही केली. सदाफुलीतल्या रहिवाशांनी आमच्यासोबत व्यवहार करताना त्यांना आलेल्या अनुभवासोबतच त्यांचे स्वतःच्या घराविषयीचे अनुभव सांगितल्यानंतर आम्ही डॉ. अनुराधा यांच्या हस्ते हस्तांतर करारनामा अध्यक्ष व सचिवांच्या हाती दिलारहिवासी या कार्यक्रमाविषयी इतके उत्साही होते की त्यातले काही विशेष या कार्यक्रमासाठी बाहेरगावहूनही आले होते. एका सदनिकाधारकानं सांगितलं की त्यांच्या बांधकाम व्यावसायिकानं हस्तांतर करार देण्यासाठी भोजनसमारंभ आयोजित केल्याचं जेव्हा त्यानं मित्राला सांगितलं तेव्हा त्याचा विश्वासच बसला नाही तेव्हा त्याला वॉट्स-ऍपवरचं आमंत्रण दाखवावं लागलंहस्तांतर कराराशिवाय आम्ही सोसायटीला एक पेन ड्राईव्ह दिला ज्यामध्ये प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक दस्तऐवज होता. त्यात मंजुरी मिळालेला आराखडा, ना हरकत प्रमाणपत्र, बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, लिफ्टचे एनओसी इत्यादींचा बाबींचा समावेश होता. दुग्धशर्करा योग म्हणजे सोसायटीच्या सदस्यांनी स्थानिक नगरसेवक श्री. अमोल बाळवदकर यांना आमंत्रित केले होते, आम्ही या कार्यक्रमात त्यांचाही सत्कार केला. ते म्हणाले की त्यांनी सदनिकाधारक व बांधकाम व्यावसायिकादरम्यान इतके सौहार्दाचे संबंध कधीच पाहिले नव्हते. कोणत्याही सोसायटीमध्ये त्यांना आत्तापर्यंत बांधकाम व्यावसायिकाशी असलेले वाद सोडविण्यासाठी किंवा बांधकाम व्यावसायिकाने प्रलंबित ठेवलेल्या कामांविषयीच्या तक्रारी हाताळण्यासाठीच बोलावलं जायचं.

मी माझ्या भाषणात सांगितलं की, “रेरा कायद्याविषयी पूर्णपणे आदर राखत मला असं सांगावसं वाटतं की हे संमेलन म्हणजे रेरासारख्या कायद्यांना एक जोरदार चपराक आहे. बांधकाम व्यावसायिक व सदनिकाधारक एकाच मंचावर येतात व हसत हसत हस्तांतर करारावर स्वाक्षरी केली जाते याहून अधिक पारदर्शकता काय असू शकते!” मोठा गाजावाजा करत बांधकाम व्यावसायिकांना गुन्हेगाराप्रमाणे मानून त्यांचा कारभार आणखी पारदर्शक करण्यासाठी रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना फसवल्याचे अनेक प्रकार झाले असले तरीही हजारो लोक कोणतेही दस्तऐवज न मागता किंवा त्यांची पडताळणी न करता, केवळ दर कमी आहेत म्हणून अवैध इमारतींमध्ये सदनिका खरेदी करतात त्याचे काय? कोणत्याही व्यवसायाला त्याची उलाढाल किंवा त्यातून होणार नफा यामुळे लौकिक मिळत नाही तर संबंधित पक्षांमध्ये तो कसे नाते व विश्वास निर्माण करतो यावरून मिळतो. आत्तापर्यंत उद्योग क्षेत्रात रिअल इस्टेटची प्रतिमा व्रात्य मूल अशीच राहिली आहे, मात्र ती केवळ रिअल इस्टेटमधील व्यक्तिंमुळेच निर्माण झाली आहे असे नाही, असे लोक दोन्ही बाजूंना होते व आहेत. कुठल्याही व्यवसायात दोन्ही बाजूच्या लोकांनी पारदर्शकतेबाबत आदर दाखवला तरच ती परिणामकारक ठरते. म्हणूनच सदाफुलीचा हस्तांतर करार अतिशय विशेष ठरतो, कारण बांधकाम व्यावसायिक म्हणून आम्ही पारदर्शक राहिलो व आमच्या सदनिकाधारकांनी त्याचा आदर केला. परिणामी आम्हाला ग्राहकांना आनंदी व समाधानी ठेवण्यासाठी रेराची गरज पडली नाही. ला पुन्हा एकदा सांगावसं वाटतं की रेराद्वारे जी माहिती मागण्यात आली आहे किंवा लेखा परीक्षण, आश्वासने अथवा त्यामधील शिक्षेची तरतूद ही अडचण नाही. एखाद्या कायद्यामुळे नाही तर ग्राहक व विक्रेत्याचा व्यवहाराविषयीचा दृष्टिकोन व एकूण व्यवहारामध्ये त्यांना एकमेकांविषयी जो विश्वास वाटतो त्याद्वारे उद्योगाचे भवितव्य ठरते. कोणताही कायदा किंवा न्याय अवैध घटकांना थांबवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणूनच अगदी मृत्यूदंडाची शिक्षा असली तरीही खून होतातच. रिअल इस्टेटमध्येही आम्हाला रेराची भीती वाटत नाही मात्र आम्हाला अशी एक यंत्रणा हवी आहे ज्यामध्ये व्यवसायाची भरभराट व वाढ होईल. कोणत्याही व्यवसायाच्या केवळ एकाच बाजूला सुरक्षित करून व्यवसायाची भरभराट होत नाही या कटू सत्याची आपल्या सरकारला आठवण करून द्यायची वेळ आली आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे, रिअल इस्टेटसाठी रेरा किंवा मोफा हे आव्हान नाही तर ग्राहकांचा बदलता दृष्टिकोन तसंच नेमकी मागणी समजून घेणे हे मुख्य आव्हान आहे. विकासकांनी हे तथ्य स्वीकारण्याची वेळ आली आहेसदाफुलीचं संमेलन ग्राहकांसोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा तसंच त्यांच्या मनात तुमच्याविषयी चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा एक मार्ग होता. तुम्ही तुमच्या ग्राहकांना आनंदी ठेवलं तर बाजारातली स्थिती बदलली तरीही तुमच्या ग्राहकांचं तुमच्या कंपनीविषयीचं प्रेम व जिव्हाळा कधीच बदलणार नाही; कुणीही बांधकाम व्यावसायिक याहून अधिक काय मागू शकतो. मी सदाफुलीच्या रहिवाशांचा ऋणी आहे त्यांनी मला विपणनाचा एक धडा अक्षरशः मोफत शिकवला; आजच्या युगात सगळ्यासाठी जिथे पैसे मोजावे लागतात तिथे ही नक्कीच दुर्मिळ बाब म्हटली पाहिजे.


संजय देशपांडे

Mobile: 09822037109


Thursday 1 June 2017

जागतिक पर्यावरण दिवस! (नाते जोडु निसर्गाशी !)





















मला खरोखरच आश्चर्य वाटते की पृथ्वीसारख्या सुंदर ग्रहाचा विध्वंस करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला !” … कर्ट व्हॉनगट ज्यू.

कर्ट हा अमेरिकी लेखक होता तसंच व्यवसायाने यांत्रिक अभियंता होता. तो दुसऱ्या जागतिक महायुद्धातही सहभागी झाला होता. त्यानं आयुष्याचे इतके विविध पैलू पाहिले असल्यामुळे, त्यानं पर्यावरणाविषयी आपल्या भावना अतिशय नेमक्या शब्दात व्यक्त केल्या आहेत! जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं माझे विचार व्यक्त करण्यासाठी त्यानं दिलेला इशारा अतिशय समर्पक आहे, याचं कारण म्हणजे आपण आपल्या पृथ्वीची नासधूस करतोय म्हणा विनाश करतोय किंवा विध्वंस करतोय म्हणा हे सगळं खरंच तर आहे. संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना पर्यावरणाविषयी जागरुक करण्यासाठी तसंच त्याच्या संवर्धनाविषयी किंवा रक्षणाविषयी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १९७४ साली साजरा करण्यात आला, तेव्हापासून या दिवशी पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा चालविल्या जातात. त्यामध्ये सागरी प्रदूषण व ग्लोबल वॉर्मिंग, नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत वापर व वन्यजीवनासंदर्भातील गुन्हे अशा विविध समस्यांचा समावेश होतो. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची एक वेगळीच संकल्पना असते. त्याआधारे मोठमोठ्या जागतिक कंपन्या, स्वयंसेवी संस्था, सामाजिक गट, प्रशासन व प्रसिद्ध व्यक्ती विविध कार्यक्रम व संकल्पना राबवतात व पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी जागरुकता निर्माण करतात. जागतिक पर्यावरण दिनामध्ये जगभरातले १४३ देश सहभागी होतात, आपल्या देशात मात्र अजूनही जागतिक पर्यावरण दिवस हा फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे सारखी काहीतरी पाश्चात्य कल्पना आहे ईतकच त्याला महत्व दिलं जातं! कारण जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी सगळ्यांना अचानक निसर्गप्रेमाची जाणीव होते आणि जी आणि वायफायच्या कृपेनं ट्विटर, एफबी, वॉट्ससारख्या समाज माध्यमांवर हे प्रेम व्यक्त करणाऱ्या संदेशांचा पाऊस पडू लागतो (यातले बहुतेक संदेश फॉरवर्ड केलेले असतात). मात्र निसर्गाच्या संवर्धनासाठी स्वतःहून कुणी काही केलेलं फारसं दिसून येत नाही, जे खरं तर जास्त महत्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे, “लोकांना निसर्गाशी जोडणं’. मला असं वाटतं ही संकल्पना निवडून अतिशय योग्य पाऊल उचलण्यात आलंय कारण आजकालच्या स्वार्थी जगात याची अतिशय गरज आहे. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या वाटतात त्यांच्याशीच आपण संबंध जोडतो व आपल्या भौतिक गरजांशी संबंधित बाबींमध्येच आपल्याला रस असतो. म्हणून सर्वप्रथम निसर्गाशी जोडलं जाणं महत्वाचं आहे, तरच आपण त्याच्याविषयी काहीतरी चांगलं करण्याचा विचार करू शकतो! जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेविषयी बोलण्यापूर्वी पर्यावरणाच्या बाबतीत आपल्या स्मार्ट पुणे शहराची व आजूबाजूची काय परिस्थिती आहे ते पाहू.

आपण रोजच पाहतो की येथे इमारतींच्या बांधकामाच्या नावाखाली किंवा रस्ते रुंदीकरणासाठी किंवा नागरी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी झाडांची बेसुमार कत्तल केली जाते. आपल्या नद्या व झरे प्रदूषित झालेल्या दिसतात, व या शहरात चिमण्यांसारख्या पक्ष्यांचा मागमूसही दिसत नाही. काही दशकांपूर्वी जेव्हा मी या शहरात आलो तेव्हा माझ्या आईला लिहीलेलं पहिलं पत्र मला आठवतंय. मी लिहीलं होतं, आई या शहरात उन्हाळाच नाही”! तो काळ मे महिन्यादरम्यानचा होता, पण आज आपल्याला असं म्हणता येईल का? आपल्याला विकासासाठी झाडं कापावी लागतात हे मान्य मात्र नवी झाडं लावून ती वाढवण्याचं काय? काही वर्षांपूर्वीपर्यंत वातानुकूलन यंत्र ही श्रीमंतांची चैन होती. मात्र आता सतत वाढणाऱ्या तापमानामुळे वन रूम किचन सदनिकांमध्येही सर्रास एसी लावलेला दिसून येतो. त्याशिवाय लाखो वाहनांधल्या धुरामुळे आपल्या भोवतालचं वातावरण कार्बन मोनॉक्साईड व अशाच उष्णता वाढविणाऱ्या वायूंनी भरून जातंसार्वजनिक वाहतूकीचा संबंध थेट पर्यावरणाशी असतो व या शहरामध्ये लोक सार्वजनिक वाहतूक चांगली नसल्यानं वापरत नाहीत. या सेवेमध्ये अनेक कारणांमुळे सुधारणा होत नाही, मात्र मुख्य कारण म्हणजे शासनकर्त्यांना वाहतुक सेवा सक्षम करण्यात व नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यात ईच्छाच कमी आहे आपल्याला इतका वेळ वाचवायचा असतो की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी काही मिनिटं वाट पाहू शकत नाही किंवा चालू शकत नाहीआपण नेमकं इथेच लोकांना निसर्गाशी जोडणं किती महत्वाचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. मी जेव्हा पीएमपीएमएल बसची वाट पाहायला तसंच घरून किंवा कार्यालयातू बस स्थानकापर्यंत चालत जायला तयार होतो, तेव्हा मी एकप्रकारे निसर्गाशीच जोडला जातो. असं करून मी प्रदूषण कमी व्हायला हातभार लावून आपल्या पर्यावरणाला मदतच करत असतो.

त्यानंतर झाडं लावून व जगवून पर्यावरणाला प्रत्यक्ष मदत करणं येतं. झाडं जगवण्याविषयी किंवा वृक्षतोड केल्याबद्दल इतरांवर (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांवर) टीका करणारे संदेश टाकणं सोपं असतं, मात्र आपल्यापैकी कितीजण प्रत्यक्ष झाडं लावतात व ती जगवतातमला खात्री आहे की पर्यावरण दिवसाचा संदेश पाठविणाऱ्यांपैकी एक टक्का लोकांनीही असं केलं नसेल, नाहीतर आपल्याला या विषयावर चर्चाच करावी लागली नसती. आम्ही आमच्याकडे एक वेगळी प्रथा सुरु केली आहे, आम्ही आमच्या इमारतींमध्ये सदनिका आरक्षित करणाऱ्या प्रत्येक परिवाराला इमारतीच्या आवारात एक झाडं लावायला लावतो. आम्ही त्या झाडापाशी त्या कुटुंबाच्या नावाचा फलक लावतो व त्यांना ते झाड दत्तक घ्यायला लावतो. म्हणूनच मी अभिमानानं सांगू शकतो की अशा प्रकारे गेल्या दहा वर्षात आम्ही किमान पाचशे झाडं तरी लावली आहेत व ती जगवली आहेत. ही सगळी झाडं स्थानिक जातीची आणि फुलं फळं देणारी आहेत त्यामुळे जैवविविधतेची साखळी पूर्ण होते. आपण फक्त झाडं कमी झाली आहेत हे पाहतो, पण त्यामुळे शहरातल्या व भोवतालच्या संपूर्ण जैवविविधतेचं किती नुकसान झालंय हे आपल्याला दिसत नाही. शहराच्या उपनगरामध्ये काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक प्रकारचे पक्षी, फुलपाखरं, बेडूक व अगदी माकडंही नियमितपणे दिसायची. आता मला सांगा तुम्ही आपल्या या स्मार्ट शहरामध्ये शेवटचं फुलपाखरू किंवा बुलबुलसारखा पक्षी कधी पाहिला होता. शहराच्या काही भागात पूर्वी स्वर्गीय नर्तक (एशियन पॅराडाईस फ्लाय कॅचर) नावाचा पक्षीही दिसायचा जो आता अजिबात दिसत नाही. मला आठवतंय पूर्वी पावसाळ्यानंतर बेडकांच्या डराँव डराँवनं आसमंत भरून जायचा, तो कानांना सुखावणारा आवाज आता ऐकू येत नाही. अनेक जण म्हणतील त्यात काय मोठसं; आपलं आयुष्य आनंदायक करण्यासाठी आयटी पार्क, मॉल, बँका, उद्योगधंदे, वसाहती नाहीत का? या सगळ्यांमुळे आपलं आयुष्य नक्कीच सोपं होतं व पुणे गेल्या काही दशकांमध्ये खूप बदललं आहे. मात्र स्वतःला प्रश्न विचारा की आयुष्य केवळ बँका, मॉल व आयटी पार्कमुळे पूर्ण होतं का? झाडे, बेडूक, फुलपाखरं, चिमण्या व इतरही प्रजाती आपल्या आयुष्याचा तितकाच महत्वाचा भाग आहेत व ते नसतील तर जीवनचक्राची साखळीच तुटेल.

या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना, लोकांना निसर्गाशी जोडणे महत्वाची आहे, कारण इथे लोक फक्त म्हणजे खरंतर तुम्ही आणि मीच व आपणच निसर्गाचं जे नुकसान केलं आहे ते भरून काढू शकतो. त्यासाठी निसर्ग म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, तरच आपण त्याचं संवर्धन करू शकू. निसर्गाची व्याख्या शब्दात करणं अवघड आहे, कारण ते कितीतरी गोष्टींपासून बनलेलं असतं व त्याला अनेक पैलू आहेतथोडक्यात सांगायचं तर निसर्ग पाच तत्वांपासून बनतो ते म्हणजे जल, अग्नि, पृथ्वी, आकाश, वायू व ही पंचतत्वे आपल्याभोवतीच तर असतात. म्हणजेच एका अर्थानं जगातलं सगळं काही निसर्गाचाच एक भाग असतो व त्याच्याशी जोडलेलं असतं. मात्र आपल्यासारखे काही मूर्ख हे नातं विसरतात व निसर्गाशी जोडलं जाण्यासाठी आपल्याला पुन्हा वेगळे प्रयत्न करावे लागतातनिसर्गातल्या या पाच तत्वांचं आपण काय केलं आहे ते पाहा; आपण नदी व समुद्रासारख्या जलस्रोतांना गटाराचं पाणी वा केमीकल मिश्रीत पाणी सोडून प्रदूषित करतो. आपल्या प्रदूषणामुळे माशांसारख्या प्रजातींचं जीवन असह्य करून टाकतो व उरलेले मासे आपण आपल्या खाण्यासाठी मारून टाकतो. आपण पृथ्वीवर शक्य तो सगळा केर-कचरा तयार करतो व येथेच जमिनीवर टाकतो! वेगवेगळ्या प्रजातींची निवासस्थानं आपण नष्ट करतो केवळ आपल्याला आरामात राहता यावं म्हणुन त्यांना नामशेष करतो आणि मग आपलं निसर्गप्रेम दाखवण्यासाठी वाघ वाचवा सारख्या मोहिमा राबवतो. आपण जमीनीवरील मातीचं आच्छादनच काढून टाकतो. तेथे काँक्रिटचे रस्ते बनवतो त्यामुळे मातीसाठी किंवा डबक्यांसाठी जागाच उरत नाही, मग इथे बेडूक कसे जगतील! हवेच्या बाबतीत बोलायचं तर आपण फटाके फोडतो, सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सशक्त करण्याऐवजी लाखो वाहनांचं उत्पादन करतो, मोठमोठे उद्योग उभारतो, ज्यातून विषारी वायू सोडले जातात. आपण ज्या हवेत श्वास घेतो ती प्रदूषित करतो. आपण आग मिळविण्यासाठी उपलब्ध कोळसा व खनिज तेलाचे सगळे स्रोत सतत वापरतोय. एक दिवस हे स्रोत संपतील त्यानंतर काय याची काळजीसुद्धा करत नाही! आपण आकाशालाही सोडलेलं नाही, आपल्याला आकाशातले तारे पाहायचे असतील तर शहराच्या बाहेर जावं लागतं, आपल्याला शहराच्या आकाशात फक्त धूर आणि धुकं दिसतं. आपण आपल्या आकाशाची परिस्थिती सगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे मृतप्राय करून ठेवली आहे.

आपण जेव्हा निसर्गाशी जोडलं जाणं असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आपण निसर्गाप्रती स्वतःची जबाबदारी समजून घेणं असा होतो असं मला वाटतं. माझा लेख वाचून लोक विचारतील की निसर्गाशी जोडलं जाणं म्हणजे विकास थांबवणं का? नाही, त्याचा अर्थ असा होतो की निसर्गाला आपल्या विकासाचा एक भाग बनवणं. वाढती मानवी लोकसंख्या हे निसर्गाच्या ऱ्हासाचं एक महत्वाचं कारण आहे, ती नियंत्रित करण्यापासून ते नामशेष होत चाललेल्या प्रजातींना वाचवण्यासारख्या अनेक आघाड्यांवर आपल्याला काम करायचं आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या गरजा आपला हव्यास होऊ देऊ नका, कारण हव्यासामुळे आपण दुसऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतो. आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की निसर्ग म्हणजे फक्त माणसंच नाही तर सगळ्याच प्रजातींची मालमत्ता आहे. सर्वात विकसित प्रजाती म्हणून पृथ्वीवरचा निसर्ग सगळ्यांना समान उपभोगता येईल याची खात्री करण्याची जबाबदारी एखाद्या वर्गाच्या मॉनिटरप्रमाणे आपली आहे. हे अजिबात अवघड नाही, आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात जे काही करतो ते अधिक संवेदनशीलपणे केले पाहिजे. मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे असेल, झाडांना पाणी देणे असेल, शीतपेयाची बाटली व्यवस्थित टाकून देणे असेल किंवा नळ बंद करणे; लाखो लोकांनी यासारख्या लहान गोष्टींचे पालन केले तर त्यातूनच पर्यावरण संवर्धाची मोहीम सुरु होईल.

आपण आणखी व्यापक विचार केला पाहिजे, असं एक जग निर्माण केलं पाहिजे जिथे कारखाने व आयटी पार्क असतील पण स्वच्छ नद्या असतील व दाट झाडी असलेली पर्वतराजी असेल. जिथे मुलांना फुलपाखरु पाहण्यासाठी प्राणीसंग्रहालयात जावं लागणार नाही, तर ते त्यांच्याशी अंगणातच पळापळी खेळू शकतील. महामार्ग बांधले जातील मात्र त्यांच्या दुतर्फा मोठ्या वृक्षांची सावली असेल. असं एक जग असेल ज्यात गगनचुंबी इमारतींच्या जवळच जंगल असेल, बेडकांना डुंबायला, पावसाळ्यात डराँव डराँव करायला भरपूर जागा असेल. या जगामध्ये चमकत्या ताऱ्यांनी आकाश भरलेलं असेल, जे कुठूनही पाहता येईल. स्वच्छ निळ्या आकाशात पक्षांचा किलबिलाट ऐकू येईल, वाहनांचा गोंगाट नाही. असं एक जग जेथे प्रत्येक झाडाचा, प्रत्येक चिमणीचा निसर्गावर माणसाइतकाच हक्क असेल! आणि तरच आपल्याला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा हक्क मिळेल. या कामात प्रत्येकानंच हातभार लावला पाहिजे. मला असं वाटतं हे वास्तव समजून घेणं हीच निसर्गाशी जोडलं जाण्याची पहिली पायरी आहे. तरच आपल्याला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा खरा अर्थ समजला असं म्हणता येईल. नाहीतर एक वेळ अशी येईल की पर्यावरण दिवस साजरा होईल मात्र पर्यावरण कायमचं नष्ट झालं असेल!



संजय देशपांडे



Mobile: 09822037109