Thursday 29 June 2023

महेंद्रसिंग धोनी , न संपणारी गोष्ट !


















सर्वोत्तम नेता तोच असतो ज्याच्या अस्तित्वाची लोकांना फारशी जाणीवही नसते, जेव्हा त्याचे काम पूर्ण होते, त्याचे उद्दिष्ट पूर्ण होते, तेव्हा लोक म्हणतात: हे आम्हीच केले” … लाओ त्झू

मला माझ्या चुकासुद्धा परत करायला आवडतात …  एम.एस. धोनी

 

जडेजाने चेंडू लेग साईडला फटकावला व तो फाईन लेगवरील क्षेत्ररक्षकाला ओलांडून सीमारेषेच्या दोरीला स्पर्श करण्यापूर्वीच, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पिवळ्या रंगात न्हायलेल्या जनसागराने एकच जल्लोष केला, समालोचकही अतिशय उत्साहात जाहीर करत होतो, आयपीएल २०२३ चे (माफ करा टाटा आयपीएलचे) विजेते आहेत, चेन्नई सुपर किंग्ज! महेंद्र सिंह धोनीने विक्रमी पाचव्यांदा ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली ! खरेतर, संपूर्ण सामन्यात, शुभमन गिलला यष्टीचीत केले ते वगळता (त्याविषयी नंतर बोलेन), खेळाडू फलंदाज म्हणून धोनी अपयशी ठरला  होता व जडेजाच्या खेळीमुळे व उर्वरित खेळाडूंनी काही जोरदार फटके मारल्यामुळे विजय शक्य झाला, परंतु तरीही प्रत्येकाच्या तोंडी एकच जयघोष होता, एमएसडीहीच जादू आहे, कारण पुन्हा एकदा युद्धामध्ये शस्त्र नव्हे तर ती शस्त्रे कुणाच्या हातात असतात हे महत्त्वाचे असते हे सिद्ध झाले आहे. एमएसडीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ज्यांच्या हातात ती शस्त्रे असतात त्या हातांमुळे नव्हे तर सेनापतीच्या बुद्धिमत्तेमुळे त्या हातांमध्ये ती शस्त्रे वापरण्याचे सामर्थ्य आल्याने युद्धात विजय होतो, म्हणूनच धोनी केवळ विशेष नाही तर अतिशय विशेष आहे.

मला माहिती आहे हा केवळ एक आयपीएल चषक आहे व करोडो भारतीय क्रिकेटच्या खेळावर प्रेम करत असतील, तर तितक्याच लोकांना हा खेळ अजिबात आवडत नाही किंवा हा खेळ पाहात नाहीत हेदेखील खरे आहे. परंतु ज्याप्रमाणे अनेक लोक राजकारणाचा (राजकीय पद्धतीचाही) तिरस्कार करतात परंतु त्यांना श्री. मोदींविषयी प्रेम व किंवा आदर वाटतो (दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या बाबतीतही असेच होते), धोनीच्या वैयक्तिक प्रतिमेचा (तुम्ही त्याला ब्रँड म्हणा) विचार केला तर त्याचेही असेच आहे, म्हणूनच धोनी विशेष आहे. आपण सगळे त्याची लोकप्रियता जाणतो व जे क्रिकेट पाहतात त्यांनी सीएसकेचे सर्व सामने पाहिले असतील व जे क्रिकेट पाहात नाहीत, त्याची आकडेवारी जाणून घेण्यात रस नाही त्यांच्यासाठी मी हा भाग वगळतो व थेट या लेखाचे प्रयोजन सांगतो. धोनी किती महान आहे किंवा त्याने केलेले विक्रम किंवा ज्या विक्रमांमध्ये तो सहभागी होता हे सांगण्यासाठी हा लेख नाही तर तो इतका विशेष व महान का आहे याविषयी आहे. अर्थात याविषयीही बरेच बोलले गेले आहे, बऱ्याच मंचांवर लिहीले गेले आहे. परंतु कोणत्याही यशोगाथेचे अनेक पैलू असतात व कोणत्या पैलूमुळे एखाद्याला एखादी गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजेल किंवा सहजपणे समजेल म्हणजे कुणीतरी, कुठेतरी या मार्गाने यशस्वी होऊ शकतो हे सांगता येत नाही, म्हणूनच हा लेखप्रपंच. मी चार गोष्टींचा निस्सीम चाहता आहे (किंवा प्रेक्षक) आहे ते म्हणजे, चित्रपट, सुपर हिरो, ॲनिमेशन व खेळ, त्यातही सांघिक खेळ अधिक, कारण वैयक्तिक खेळ रोचक असतात परंतु त्यांच्यासाठी नेतृत्वाची गरज नसते किंवा ते नेतृत्व निर्माण करत नाहीत. आपल्याला समाज म्हणून जेव्हा वाढायचे असते किंवा प्रगती हवी असते तेव्हा आपल्याला नेत्यांचीच गरज असते, म्हणूनच सांघिक खेळ महत्त्वाचे असतात कारण त्यातून आपल्याला नेतृत्व मिळते. टेनिसचेच उदाहरण घ्या, मला तो खेळ अतिशय आवडतो त्यामध्ये फेडरर, ज्योकोविच, नदाल यासारखे महान खेळाडू आहेत, बॅडमिंटनही आवडते ज्यामध्ये आपल्या सिंधू व सायना आहेत तसेच लिन डॅनसारखे महान खेळाडूही आहेत, त्यांचे लाखो चहाते आहेत व ते अतिशय उत्तम खेळाडू आहेत. तरीही ते त्यांच्या कोर्टवर जे काही करतात ते त्यांचे वैयक्तिक कौशल्य असते, परंतु क्रिकेटसारखा खेळ (तो केवळ दहा किंवा बारा देशांमध्ये खेळला जात असला तरीही) कोणत्याही सामन्यामध्ये एखाद्या सैन्याचे संचालन करण्याप्रमाणे असतो, यासाठी उत्तम नेतृत्वाची गरज असते तरच सैन्याचा विजय होऊ शकतो किंवा सातत्याने नेत्रदीपक कामगिरी करता येऊ शकते.

जर असे असेल तर मग आकडेवारीही महत्त्वाची आहे, मुंबई इंडियन्सनेही आयपीएल पाचवेळा जिंकली व धोनीच्या आधी, रोहित शर्मा जो सध्याच्या भारतीय संघाचा कप्तान आहे त्यानेही हे करून दाखवले आहे, तरीही धोनी महान आहे असे लोकांना का वाटते, म्हणूनच हा लेख लिहीत आहे. काही जणांची कामगिरी किंवा व्यक्तीमत्व तुम्ही आकडेवारी किंवा विक्रमांमध्ये बांधू शकत नाही, विशेषतः जेव्हा ते कप्तानाच्या भूमिकेत असतात, त्यामुळेच मी क्रिकेट पाहायला (खरेतर ऐकायला हा शब्द योग्य होईल कारण ७०/८०च्या दशकात आमच्याकडे टीव्ही नव्हता) सुरुवात केली, तो गावस्कर व कपील देवचा काळ होता. वैयक्तिक खेळाडू म्हणून ज्यांचे योगदान मोठे आहे अशा महान खेळाडूंची नावे तुम्ही पाहिली तर बेदींपासून कपील देवपर्यंत, ते तेंडुलकर व द्रविड, ते सध्याच्या विराट कोहलीपर्यंत, आपल्याकडे क्रिकेटमध्ये अशी अनेक नावे आहेत व लोकप्रियतेविषयी बोलायचे तर दोन दशकांहून अधिक काळ या देशासाठी तेंडुलकर हा देव आहे, गावस्करही होता, वैयक्तिक खेळाडू म्हणून आकडेवारीमध्ये या सगळ्या खेळाडूंपेक्षा मागे असूनही धोनी या सगळ्यांच्या वरचढ आहे (कुणालाही दुखवायचा हेतू नाही), म्हणूनच हा लेख. मी तुम्हाला अगदी या आयपीएलमधली धोनीची एखादी विशेष खेळी आठवतेय का असे विचारल्यावर तुम्हाला फारसे काही आठवणार नाही व तरीही हे आयपीएल धोनीचे आयपीएल म्हणून ओळखले जाईल हे नक्की. ही विशेष कामगिरी वर नाव नमूद केलेल्यांपैकी कुणालाही साध्य करणे शक्य झाले नाही. काही जण म्हणतील की हे समाज माध्यमांचे युग आहे व खेळाचे व्यावसायिक पैलूही असतात. काही बाबतीत ते खरे आहे परंतु गावस्करच्या रुपाने जाहिरांतीचा पैसा क्रिकेटमध्ये आला जेव्हा त्याने सियारामची जाहिरात केली व माझी पिढी कपील पाजींची, पामोलिव्ह दा जवाब नही ही शेव्हिंग क्रिमची जाहीरात कशी विसरू शकेल. त्यामुळे व्यवसाय हा बऱ्याच हा काळापासून भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग राहिला आहे व केवळ त्या पैलूमुळे तुम्ही लोकांच्या विस्मरणात जाण्यापासून वाचू शकत नाही. किंबहुना जाहिरातींचे जग हे अतिशय निष्ठूर आहे, ते केवळ कामगिरीच्या मागे धावते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दोन वर्षांपूर्वीच निवृत्ती घेऊनही त्याची जादू कायम आहे, या जादूचे विश्लेषण करण्यासाठी, माझा हा लेख आहे.

आता पुन्हा आयपीएल २३ विषयी बोलू, अनेक जण आयपीएलचा तिरस्कार करतात तरीही ते जगभरात सर्वाधिक पैसे मिळवणारे लोकप्रिय साखळी सामने आहेत या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याने हजारो तरुण खेळाडूंना एका मोठ्या व्यासपीठावर येण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, जे पूर्वी शक्य नव्हते. फुटबॉलपासून टेनिसमध्ये अनेक खाजगी क्रीडास्पर्धा होतात ज्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांपेक्षा अधिक लोकप्रिय असतात हे देखील तितकेच खरे आहे. धोनीच्याच कर्णधारपदाच्या कारकीर्दीत आपण टी२० व एक दिवसीय विश्वचषक जिंकला होता हे आपण कसे विसरू शकतो. तसेच लक्षात ठेवा की आजच्या युगातील महान फुटबॉलपटू मेस्सी ज्या वेगवेगळ्या क्लबसाठी खेळला त्यांना विविध स्पर्धा जिंकवून देऊन महान बनला, त्यानंतरच कारकीर्द संपत असताना त्याच्या देशाला विश्वचषक जिंकून देऊ शकला!  त्यामुळेच माझ्या मते तुम्ही कोणत्या संघाकडून खेळता हे महत्त्वाचे नसते कारण स्पर्धेच्या नावापेक्षाही खेळ महत्त्वाचा असतो. अर्थात देशाच्या झेंड्याखाली खेळताना मिळणारा लौकिक तसेच अभिमान महत्त्वाचा आहेच, हे पण लक्षात ठेवा. तुम्ही धोनीविषयी माझ्या विचारांशी सहमत असाल तर आपण पुढे जाऊ व खेळाडू व या आयपीएलमधील त्यांच्या कामगिरीवर एक नजर टाकू, कारण तुम्ही कितीही महान कप्तान असला तरीही, संघातील  खेळाडू चांगले खेळले नाहीत तर तुम्ही सामना जिंकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्वाधिक बळी घेणारे पहिले तीन खेळाडू गुजरात टायटन्सचे होते, ते गतवर्षीचे विजेतेही होते व या वर्षीचे उपविजेते. त्याचशिवाय सीएसकेचा कुणीही गोलंदाज सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये नाही. तसेच या आयपीएलच्या या सामान्यांमध्ये सीएसकेकडून पहिल्या पाच फलंदाजांमध्ये केवळ एकच नाव होते व तो देखील पाचव्या क्रमांकावर होता. सर्व संघांमध्ये सीएसकेच्या खेळाडूंचे सरासरी वय कमाल होते व त्याचशिवाय रविंद्र जडेजा वगळता जो दुखापतीमुळे जवळपास वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर होता, सीएसकेच्या संघातील कोणताही खेळाडू कोणत्याही राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत नव्हता. बेन स्टोक्स होता परंतु दुखापतीमुळे तो सध्या एकही सामना खेळू शकला नाही व धोनीही स्वतः गुडघ्याच्या इजेमुळे पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. या सगळ्या सांख्यिकीमुळे, धोनीचे अगदी निस्सीम चाहतेही सीएसकेला यावर्षी  जिंकायला काही संधी आहे असा विश्वास ठेवायला तयार नव्हते व हा संघ गेल्या वर्षी गुणसंख्येमध्ये चक्क तळाला होता. अशा परिस्थितीमध्ये केवळ धोनीच तुम्हाला तो चषक जिंकून देऊ शकतो. हा विश्वास, हाच फरक आहे!

सर्वप्रथम, धोनी इतर सर्व महान खेळाडूंपेक्षा अतिशय वेगळा आहे, आपल्या नैसर्गिक अंतःप्रेरणेचा वापर करण्याच्या बाबतीत केवळ कपील देवच त्याच्या श्रेणीत येऊ शकतो. परंतु कपील देवच्या वेगळा म्हणजे  धोनीकडे अतिशय थंडपणे आडाखे बांधणारे डोके आहे जे एखाद्या सैन्याच्या सेनापतीसारखे चालते व अतिशय निष्ठूरपणे तो त्याचा वापर करतो. कारण एकीकडे धोनीचा त्याच्या जुन्या सैनिकांवर विश्वास असला व त्यांच्याकडून उत्तम कामगिरी करून घेत असला, तरीही कुणाला कधी वापरायचे याविषयी त्याचे मत अगदी स्पष्ट असते. अगदी आपला सर्वोत्तम खेळाडू जडेजा यालाही तो बाजूला ठेवू शकतो, ज्यामुळे तो रागवला तरी, म्हणूनच धोनी विशेष आहे. धोनी जाणतो की त्याच्याकडे सचिन किंवा सेहवागसारखे महान खेळाडूचे उपजत कौशल्य नाही अथवा राहुल द्रविडसारखे तंत्र नाही. परंतु इतर भारतीय खेळाडूंकडे जे नाही ते त्याच्याकडे भरपूर आहे म्हणजे खेळासाठी आवश्यक असलेली चतुराई व आत्मविश्वास, जो त्याच्या नेतृत्वाचे लोखंड लोकांच्या अपेक्षांच्या आगीत तावून-सुलाखून निघाल्यावर विकसित झाला आहे. वारंवार पराभूत होऊनही आपला संघ बदलत नसल्यामुळे सीएसकेवर नेहमी टीका व्हायची. रागवला तरी समुद्रांच्या लाटांप्रमाणे असते ज्या वारंवार किनाऱ्यावर येऊन आदळत असतात, त्यांच्या सततच्या माऱ्यामुळे अगदी कणखर खडकही फुटतो! आपणही हेच पाहिले आहे, गुजरात टायटन्सने त्यांना सलग तीनवेळा पराभूत केले, तरीही धोनीने पात्रता फेरीत व अंतिम सामन्यातही त्याच्या संघात काही बदल केले नाहीत, यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये मोठा फरक पडतो. हा मोजून-मापून पत्करलेला धोका होता कारण आधीच प्रतिस्पर्धी संघाने मात केल्यामुळे खेळाडू त्यांचा बदला घेण्यासाठी उत्सुक होते व या प्रक्रियेत ते त्यांची सर्वोत्तम कामगिरी करून दाखवतील हे मानसशास्त्र माहिती असणे हेच धोनीचे वेगळेपण आहे. म्हणूनच या संघामध्ये कोणतीही मोठी नावे नाहीत व कुणीही विशेष कामगिरी केलेली नाही जी गुजरात टायटन्स व आरसीबीसारख्या संघांना लोळवू शकेलसीएसके मोठ्या गव्याच्या शिकारीसाठी निघालेल्या रान कुत्र्यांच्या कळपासारखी होती ज्यांचा शिकारी करायला अगदी वाघही घाबरतो, म्हणूनच धोनी विशेष आहे. या आयपीएलमध्ये त्याने विविध संघाना पराभूत करण्यासाठी याच चातुर्याचा वापर केला व त्याच्या संघानेही त्याला उत्तम प्रतिसाद दिला कारण त्याचा त्यांच्यावर भरवसा होता; प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक बळीचे, तसेच संघ कशाप्रकारे फलंदाजी करेल किंवा क्षेत्ररक्षण करेल याचे नियोजन या संघाच्या कर्णधाराने केले होते. मग ते प्रत्येक गोलंदाजाने घेतलेले एखाद-दोन बळी असतील किंवा झटपट केलेल्या वीस किंवा तीस धावा, उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी संघाची अक्षरशः धूळदाण उडवली, ज्यामुळे सरतेशेवटी त्या संघांना सपशेल शरणागती पत्करावी लागली.

त्याशिवाय धोनी समाजाच्या अशा वर्गातून आला आहे की लाखो भारतीयांना तो त्यांच्यातलाच वाटतो, सलीम-जावेद यांनी ७०च्या दशकात बिग बीच्या बाबतीत जे काही केले त्यासारखेच हे थोडेफार आहे. त्यांच्या कथांमध्ये एक तरूण, दिसायला अगदी सामान्य नायक होता जो तुम्हाला आपलासा वाटे व आपला राग व बुद्धिमत्तेच्या जोरावर संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध तो लढत असे, हे पाहायला लोकांना अतिशय आवडे व यामुळेच तो महानायक झाला. क्रिकेटचे जग वास्तव आहे परंतु पटकथा तशीच आहे, एक तरुण खेळामध्ये विशेष काही कौशल्य नसताना सरकारी नोकरी सोडून देतो व एक खेळ खेळण्याचा निर्णय घेतो जो लाखो लोक त्यांच्या बालपणी खेळले आहेत. तो तिथे केवळ टिकून राहात नाही तर एका मागून एका संघ पराभूत करतो, त्यासाठी तो देशाच्या विविध भागांमधून इतर सामान्य खेळाडूंना गोळा करतो, त्यांना स्वतः सुप्रसिद्ध खेळाडू होण्यासाठी मदत करतो, तरीही स्वतः मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहण्याचे चातुर्य त्याच्याकडे आहे, म्हणूनच धोनी अतिशय विशेष आहे. आयपीएल २३ चा चषक स्वीकारतानाही त्याने हे पुन्हा एकदा दाखवून दिले, त्याने अंतिम सामन्यात विजय साकार करणारा जडेजा व अंतिम सामन्यापूर्वी निवृत्तीची घोषणा करणारा रायडू यांना बोलावले व चषक स्वीकारायला लावला, किती कर्णधार असे करू शकतात, म्हणूनच धोनी विशेष ठरतो.

हे कोणतीही उपाधी किंवा संघाच्या पलिकडे जाणारे काहीतरी आहे व म्हणून धोनीचा संघ कोणत्याही मैदानावर खेळला तरीही तिथे त्यांना चाहत्यांचा पाठिंबा मिळत होता, हे दृश्य कोणत्याही खेळामध्ये दुर्मिळच असते. अंतिम सामान्याच्या समालोचनाच्या अखेरीस, समालोचक म्हणाला (मला अजूनही हिंदी समालोचन पाहायला व ऐकायला अतिशय आवडते), “टीमों के शहर होते हैं, एमएसडी का पूरा देश हैकोणत्याही खेळाडूचा या सारख्या क्षणांपेक्षा दुसरा मोठा गौरव काय असू शकतो व म्हणूनच कदाचित धोनीने पाणवलेल्या डोळ्यांनी (हे देखील दुर्मिळच), माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा खेळणे हीच माझी भेट असेल असे म्हणून आपल्या निवृत्तीची घोषणा करण्यास नकार दिला. सगळ्या सामान्यांमध्ये जेव्हा कॅमेरा प्रेक्षकांचे चित्रण करत होता तेव्हा चे एक दृश्य व्हायरल झाले ते म्हणजे, एका मुलीच्या हातात एक पोस्टर होते ज्यावर एमएसडी तुला माझे आयुष्य लाभो, पण तू पुढची वीस वर्षे खेळत राहा अशा शुभेच्छा दिलेल्या होत्याते वाचून माझ्याही डोळ्यात पाणी आले. कारण यापूर्वीही अनेक महान खेळाडू होऊन गेले आहेत व त्यांचे याहूनही अधिक चाहते होते परंतु फार कमी जणांना या प्रेमाचे व अपेक्षांचे ओझे फार काळ वागवता येते, जे  जपता पण येते धोनीने करून दाखवले आहे व म्हणूनच तो अतिशय विशेष आहे. काळ हा प्रत्येक सजीवाचा सर्वात मोठा व सर्वात कट्टर शत्रू आहे कारण काळागणिक तुमचे वय वाढत जाते, परंतु काळाच्या ओघात पराभूत होण्यापेक्षाही तुम्ही काळाविरुद्ध किती चिवटपणे झुंजलात, यावरून तुमची जीत ठरते व त्या बाबतीत धोनीने काळालाही मात दिली आहे. वैयक्तिकपणे सांगायचे तर, धोनीची इतकी प्रदीर्घ कसोटी घेतल्याबद्दल मी काळाचा सदैव ऋणी राहीन कारण माझ्यासाठी त्याची संपूर्ण गोष्ट एखाद्या शाळेसारखी आहे तिने मला मी माझ्या स्वतःच्या जीवनाचा किती वाईट कर्णधार आहे, परंतु मला अजूनही किती चांगले होण्याची संधी आहे हे शिकवले आहे. धोनीने उद्या खेळायचे थांबवले तरीही, त्याची गोष्ट अजरामर राहील व लाखोंना प्रेरणा देत राहील, म्हणूनच तो खूप खूप विशेष आहे!

 

 

संजय देशपांडे

Smd156812@gmail.com





Monday 19 June 2023

कान्हा , बाघ और बहोत कुछ !





















अगर कोई जंगल में जाकर शिकायत करता है कि उसे कुछ नहीं दिखा वहा इसका मतलब वह अंधा, बहरा और सूंघने में अक्षम है; संक्षेप में, वह एक मूर्ख है

मैं उपरोक्त उद्धरण के लेखक का नाम नहीं लूंगा क्योंकि इस कथन से बहुत से लोग बहुत नाराज होंगे। लेकिन मैं इस उद्धरण से पूरी तरह सहमत हूं, इसलिए मैंने इसके साथ लेख शुरू करने का फैसला किया, चाहे यह कितना भी कठोर क्यों लगे। मैं लेख की शुरुआत एक अच्छे, सुंदर उद्धरण से कर सकता था क्योंकि लेख का विषय मेरे बहुत करीब है यानि कान्हा का जंगल। इसलिए मैंने जो भी जंगल देखा है, मुझे उससे प्यार है, लेकिन जैसे एक माँ को अपने एक बच्चे से बहुत लगाव होता है, वैसे ही मेरे लिए कान्हा भी हैं। कान्हा के इत्मीनान से दर्शन के बाद किसी कारणवश यह एक लंबा समय हो गया था, वास्तव में सबसे लंबा समय। क्योंकि मैं 2000 से नियमित रूप से कान्हा जाता रहा हूं और वह भी साल में एक से अधिक बार, भले ही कोविड के बाद से यात्रा थोड़ी बाधित रही हो। मैं पिछले साल कान्हा गया था, लेकिन वहां केवल चार सफारी थीं और उनमें से तीन बारिश (मई में) के कारण जलमग्न हो गई थीं। यह कितना भी अजीब क्यों हो, पिछले आठ वर्षों से मैं जिस भी मौसम में कान्हा के पास गया, शायद वैश्विक तापमान में वृद्धि के कारण बारिश और बादल हमेशा मेरे साथ रहे। मैं इस समस्या का सामना करने वाला अकेला नहीं हूं, जैसा कि मैंने पिछले लेखों में उल्लेख किया है, पूरे मध्य भारत में वन्यजीव पर्यटन बारिश के इस बदले हुए पैटर्न और प्रभाव (यानी साइड इफेक्ट) से प्रभावित हुआ है, क्योंकि यह बाघों के देखे जाने को प्रभावित करता है। मैंने बारिश में बाघ और चीते देखे हैं। मौसम की अचानक ठंडक और बादल इन शिकारि जाणवरो कीं ऐसी  जगह को आराम करने और सोने के लिए मजबूर करते हैं जहां वे दिन के दौरान आराम कर रहे हैं, अन्यथा तीव्र गर्मी उन्हें पानी की सतह पर आने के लिए मजबूर कर देती और उस समय उनकी दिखाई देने की संभावना अधिक होती, जो अब नहीं हो रहा है। इसलिए मैंने उपरोक्त उद्धरण का उपयोग किया क्योंकि मेरा ड्राइवर, जो कई वर्षों से कान्हा में रहता है, कहता है, "सर, आजकल  पुनासे  से आने वाले पर्यटकों की संख्या बहुत कम हो गई है"। ऐसा इसलिए है क्योंकि कान्हा से नागपुर की दूरी में कम से कम पांच घंटे लगते हैं (यानी एक सुरक्षित गति से), गो-एयर के बंद होने के साथ, पुणे-नागपुर हवाई से यात्रा करने के लिए केवल एक उड़ान विकल्प उपलब्ध है (वह भी बहुत असुविधा वाले समय पर) और ऐसा मौसम, कान्हा के जंगल और हरे-भरे वनस्पतियों की सीमा बाघों के देखे जाने की संभावना को कम कर देती है। इसके अलावा, ताडोबा नागपुर से केवल दो घंटे की ड्राइव पर है, जहां बाघ के दिखने की संभावना अधिक होती है। समृद्धि हाईवे के लिए धन्यवाद, आप सीधे दस घंटे की ड्राइव में पुणे से ताडोबा पहुंच सकते हैं, जिससे छह लोंगो के समूह के लिए यह आसान और सस्ता भी हो जाता है। ये सभी मेरे तार्किक कारण हैं लेकिन अगर कान्हा के अधिकारी अपने राज्यो के "आओ बाघ देखे" के नारे पर खरा उतरना चाहते हैं, तो उन्हें कुछ करना चाहिए, क्योंकि मौसम तो एक कारक बन गया है लेकिन पर्यटन के प्रति फॉरेस्ट वालों का सदियों पुराना नकारात्मक रवैया मुख्य कारण है जो सीधे तौर पर पर्यटकों की जंगल की यात्रा करने की इच्छा को प्रभावित करता है। मैं जानता हूं कि सिर्फ बाघों को देखने के लिए जंगल जाना गलत है, लेकिन सच तो यह है कि सरकार भी वन्यजीव पर्यटन को बढ़ावा देने के साथ-साथ बाघों पर ही ध्यान देती है, तो सिर्फ पर्यटकों को ही दोष क्यों दें, है न? इसके अलावा, मैं व्यक्तिगत रूप से महसूस करता हूं कि वन्यजीव पर्यटन के केंद्र में बाघों को रखने में कुछ भी गलत नहीं है।

मुझे लगता है कि कई वन्यजीव प्रजनकों के साथ-साथ वन अधिकारी, वास्तविक वन्यजीव प्रेमी, जो संख्या में बहुत कम हैं, भौहें चढ़ाएंगे और कहेंगे, "संजय, आपसे यह उम्मीद नहीं थी"! लेकिन लगभग 1.5 अरब लोगों के इस देश में केवल 3,500 बाघ हैं, जो कुछ लाख वर्ग किलोमीटर में फैले हुए हैं, इसलिए यह एक मानव प्रवृत्ति है कि वे विशेष होने पर ही बाघों का सम्मान (या सम्मान करना चाहते हैं) करते हैं। उन्हें बाघों को देखने के लिए जंगल जाना पड़ता है जो मुझे लगता है कि वन्यजीवों के लिए मददगार है। क्योंकि अगर हम चाहते हैं कि पर्यटक बाघों को देखें तो पहले हमें उनके आवास को बचाना होगा, और उस आवास को इस तरह से व्यवस्थित करना होगा कि बाघों को रहने के लिए पर्याप्त जगह मिले, क्योंकि एक तरह से बाघ जंगल को बचाते हैं और जंगल बाघ को। यदि आप भ्रमित हो गए हैं, तो मैं समझाता हूँ, यदि किसी जंगल में बाघ जैसे मांसाहारी नहीं होंगे, तो शाकाहारी जीवों की संख्या बहुत अधिक होगी और आसपास की मानव बस्तियों (खेतों) के लिए सिरदर्द बन जाएगी। बाघों के भय के अभाव में, मनुष्य शाकाहारी जीवों के साथ-साथ जंगल को भी नष्ट कर देगा।

जंगल में बाघों की उपस्थिति के कारण, बाघ की वजह से   ईन्सान कुछ हद तक ऐसे जंगलों से दूर रहते हैं, और जंगल भी बाघों को जीवित रहने और उनकी संख्या बढ़ाने के लिए आवश्यक जगह देकर उनकी रक्षा करते हैं। इसलिए कान्हा बाघों के लिए वरदान है, लेकिन दूसरी तरफ बाघों के दर्शन के मामले में पर्यटन के लिए अभिशाप है। चूंकि बाघ का विश्राम स्थल बहुत  बड़ा होता है, इसलिए उसे बाहर खुले में आने की जरूरत नहीं पड़ती। यही वजह है कि हजारों रुपए खर्च कर बाघ को देखने वाले पर्यटक इसे आसानीसे नहीं देख पाते।

यहीं पर वन विभाग की भूमिका महत्वपूर्ण हो जाती है, उनके प्रति पूरे सम्मान के साथ, चाहे कान्हा अभयारण्य कितना ही सुंदर और दर्शनीय क्यों न हो। हालांकि, अधिकांश पर्यटक दूर-दूर तक फैले जंगलों, हरे-भरे इलाकों, बारासिंगा और कई अन्य जंगली जानवरों को देखने नहीं (हालांकि मेरे जैसे कुछ इसे देखने ही जाते हैं) बल्कि बाघों को देखने आते हैं और तभी वे ऊपर वाले की सराहना कर सकते हैं। इसलिए, इन क्षेत्रों में नए पर्यटन मार्ग खोलने, नए बफ़र्स बनाने और गाँवों को स्थानांतरित करने पर विचार करके, वन विभाग हमेशा सर्वोच्च न्यायालय के मानदंडों (जिस पर बाद में चर्चा की जा सकती है) का उल्लंघन किए बिना पर्यटन क्षेत्रों में बाघों के देखे जाने की संभावना को बढ़ाने का प्रयास कर सकता है। लेकिन हकीकत यह है कि ऐसा होता नहीं दिख रहा है। हम सड़क के किनारे और जल निकाय बनाने के साथ-साथ कुछ सड़कों को बंद करने पर भी विचार कर सकते हैं जहां बाघ नियमित रूप से नहीं देखे जाते हैं, नई सड़कें बनाने पर जहां बाघ दिखाई देते हैं, ताकि अधिक से अधिक पर्यटक जंगल के राजा को उसके असली रूप में देख सकें। एक अन्य पहलू अभयारण्यों का समय और पूरे मानसून के दौरान उनके बंद होने का है, क्योंकि कान्हा जैसे बड़े अभयारण्यों में कुछ मार्ग और खंड निश्चित रूप से पूरे वर्ष खुले रह सकते हैं। तो अभयारण्य को साल के सभी 365 दिन खुला रखने में क्या गलत है, क्या आपने कभी सुना है कि डिज्नी थीम पार्क छुट्टियों पर बंद रहते हैं, मरम्मत और रखरखाव के लिए कुछ सवारी बंद हो सकती हैं, लेकिन पूरा पार्क साल भर खुला रहता है, क्योंकि वे जानते हैं कि व्यापार कैसे करना है। अब यहां भी वन्य जीव प्रेमी और वन्य प्राणी पालक यही कहेंगे कि यह व्यवसाय नहीं प्रकृति है। उस पर मेरा  जवाब है कि इसे हमेशा के लिए बंद कर दें, क्योंकि प्रकृति सभी मौसमों में एक जैसी है तो सर्दी और गर्मी में इसे खुला रखने की क्या जरूरत है ना? दोस्तों, हम संरक्षण के बारे में बात कर रहे हैं और हमें सभी पहलुओं को खुले दिमाग से देखना चाहिए, इसके फायदे और नुकसान का अध्ययन करना चाहिए, न कि केवल अस्वीकार करना और निष्कर्ष पर पहुंचना चाहिए।कान्हा जैसे बड़े जंगल में और उसके आसपास रहने वाले लोगों की आजीविका जंगल द्वारा प्रदान की जाने वाली नौकरियों, वन्य जीवन, पर्यटन सेवाओं पर निर्भर करती है और ये लोग जो वास्तव में कान्हा जंगल का हिस्सा हैं, वे जंगल के संरक्षक भी हैं। तो, मेरा कहना यह है कि अगर बाघों की बढ़ती संख्या इन लोगों को बेहतर जीवन यापन करने की अनुमति देती है, तो इसमें गलत क्या है? पूरी दुनिया में वन्य जीव पर्यटन को वन्य जीव संरक्षण के सर्वोत्तम साधन के रूप में इस्तेमाल किया जाता रहा है, दुर्भाग्य से हमारे अपने देश में इसे वर्जित माना जाता है और इसके परिणामस्वरूप जो लोग वन के सच्चे संरक्षक हैं, उन्हें कई बाधाओं का सामना करना पड़ता है, एकमात्र कारण यह है कि हमारे वन्यजीव संरक्षण के प्रति दृष्टिकोण संतुलित नहीं है यही मेरे लेख का सार है। कान्हा जैसे वनों में न केवल वन्य जीवन पर्यटन के लिए अपितु वन की सुंदरता और महत्व को बताने की अपार क्षमता है, यह जंगल यहां की समृद्ध प्रकृति के लिए एक खिड़की की तरह है, केवल इस खिड़की को ठीक से प्रदर्शित करने की आवश्यकता है।

अब फिर से जंगली जानवरों (सिर्फ बाघ ही नहीं) के देखे जाने की बात करते हैं, यह मई का अंत था फिर भी बेमौसम बारिश की कृपा के साथ (सही में?), घास सदाबहार साल के पेड़ों के साथ हरी और सुनहरी थी इस सुंदर कैनवास पर बारहसिंगा को देखना हर किसी के लिए एक सुंदर अनुभव होगा हम अक्सर बाघ देखते थे लेकिन कान्हा में भालुओं का दिखना दिलचस्प (और अच्छा) हो गया है। कई पर्यटक इस अजीब जानवर की दृष्टि को गंभीरता से नहीं लेते हैं, लेकिन जंगल में बाघ के दर्शन की तुलना में भालू के दर्शन दुर्लभ हैं और इस बार कान्हा ने मेरी विशलिस्ट से एक और इच्छा पूरी करने में मेरी मदद की (जंगल आपको लालची बनाताहै) और वह था भालू को पेड़ पर चढ़ते देखना। आपको हंसी आएगी, लेकिन एक भालू को दिन के उजाले में स्पष्ट रूप से देखना मुश्किल होता है, फिर पेड पे चढता देखणा बहोत दुर्लभ है ! एक ऐसा दृश्य जो आपको हर दिन देखने को नहीं मिलता हैं। लेकिन इस बार घास के मैदान में एक सुबह के सैर के दौरान जब हमने एक बरगद के पेड़ के पास एक भालू को देखा, तो मैं बहुत उत्साहित था जब उसने अचानक उस पेड़ पर चढ़ने की कोशिश की, हालांकि पेड़ का घेरा भालू के लिए बहुत बड़ा था आधे रास्ते में उसने हार मान ली और नीचे उतर गया, यह सबसे मजेदार दृश्य था!  वास्तव में हमें ऐसे दृश्यों के महत्व से पर्यटकों को अवगत कराना चाहिए। गाइड ऐसा करने की कोशिश करते हैं, लेकिन क्योंकि सभी पर्यटक बाघ पर ध्यान केंद्रित करते हैं, जबकि हम भालू को देखने में व्यस्त थे, कुछ जिप्सी बिना रुके निकल गई क्योंकि वे बाघ को देखना चाहते थे वे एक छोटे से काले प्यारे प्राणी को पेड़ पर चढ़ते हुए देखने में अपना समय बर्बाद नहीं करना चाहते थे। यहां भले ही गाइड पर्यटकों को भालू जैसे जानवरों और उनके महत्व के बारे में बताने की कोशिश करता है, लेकिन पर्यटकों में जागरूकता की कमी के कारण वे सबसे पहले बाघ को देखने में रुचि रखते हैं, यहीं से बाघ को देखने के महत्व को समझा जा सकता है।

 

एक बार जब कोई पर्यटक बाघ को देख लेता है तो वह वन्य जीवन के अन्य पहलुओं के बारे में और जानने के लिए उत्सुक होता है और मैं इस मानसिकता को समझ सकता हूं, लेकिन यह एक बिंदु है जिसे वन विभाग को भी समझना चाहिए।

हमारे सामने एक बाघिन नीलम का एक सुंदर दृश्य था, जो अपने सामने के पैर में गहरी   चोट लगने के बावजूद अपने शावकों के लिये शिकार कर रही थी। जब मैं यह ब्लॉग लिख रहा था, तब (फेसबुक पर) एक खबर आई थी कि नीलम दूसरी बाघिन से लड़ाई में गंभीर रूप से घायल हो गई है। कान्हा के विशाल विस्तार के बावजूद, बाघों की बढ़ती संख्या के कारण, जगह एक बड़ी समस्या है और बाघों के अस्तित्व के लिए उनके बीच क्षेत्रीय विवाद एक बड़ी समस्या है।

साथ ही जंगली जानवरों (हिरण) का कम जंगली स्थानों पर स्थानांतरण साथ ही और अधिक वाटरशेड बनाने की जरूरत है ताकि बाघों को समान पैमाने पर तितर-बितर किया जा सके, यह होना चाहिए और इसे तेजी से होना चाहिए।

एक आखिरी बात का जिक्र करना है कि हमने कान्हा वन गाइडों को सर्दियों के कपड़े मुहैया कराए क्योंकि साल के पेड़ों के इस जंगल में सर्दियां बहुत तेज होती हैं। हर साल हजारों पर्यटक हमारे जंगलों में आते हैं और प्रकृति के सानिध्य में खुद को तरोताजा करते हैं और हमारे करोड़ों डॉलर के कैमरों द्वारा ली गई तस्वीरें सोशल मीडिया की जगह भर देती हैं।  लेकिन इन पलों को संभव बनाने वाले लोगों के योगदान की बात कोई नहीं करता। एक गाइड ने कहा, "लोग यहां पूरे दिन की सफारी पर लाखों रुपये खर्च करते हैं।" लेकिन बहुत कम लोग हमारी जरूरतों के बारे में सोचते हैं , मित्रों, यदि कान्हा की तरह वनों को बचाना है तो यह याद रखना क्योंकि इससे बाघों का भाग्य तय होगा; इतना कहकर मैं आपसे अलविदा लेता हूँ ...!

संजय देशपांडे

संजीवनी डेवलपर्स

smd156812@gmail.com