Monday 1 April 2024

पुणेकर भावी खासदार, मतदान आणि शहर !

 

























तुम्ही एखाद्या शहरातील रस्त्यांवर राहणाऱ्या माणसांना भेटल्याशिवाय तुम्हाला ते शहर समजू शकत नाही.”

― इरोल ओझान

शहर आपला भूतकाळ सांगू शकत नाही, परंतु शहरातील रस्ते हे तळ हातावरील रेषांप्रमाणे असतात, जे आपल्याला शहराचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळाविषयी सर्व काही सांगतात
― 
इटॅलो कॅल्व्हिनो

ही दोन वेगळ्या व्यक्तींची दोन अवतरणे आहेत यातील इरोल हे लेखक, वैज्ञानिक, विचारवंत, भविष्यवेत्ता व साल्सा नर्तक सुद्धा  आहेत व नॉर्थ कॅरोलिनाच्या (यूएसए) रॅलिग येथे राहतात; तर इटॅलो हे इटालियन लेखक व पत्रकार होते, ज्यांच्या सर्वोत्तम लेखनामध्ये अवर अँसेस्टर्स ही मालिका समाविष्ट आहे. दोघेही एकमेकांपासून हजारो मैल लांब राहात होते व वेगवेगळ्या कालखंडातील असले तरीही, त्यांच्यातील साम्य म्हणजे शहराविषयीची त्यांची व्याख्या. म्हणूनच माझ्या लेखाची सुरुवात करण्यासाठी मी त्यांचे शब्द निवडले. हा लेख म्हणजे सदस्य  भावी बॉस (म्हणजे खासदारीसाठी) लिहीलेले मुक्त पत्र आहे. त्यांना प्रस्तावित वडीलअसे म्हणणे योग्य ठरेल कारण मराठीमध्ये जेव्हा आपण भावी असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ संभाव्य असा होतो, तर भविष्यातील या शब्दातून निश्चितता व्यक्त होते, मात्र इथे तशी परिस्थिती नाही. मला खात्री आहे की तुम्ही अशी गुंतागुंतीची सुरुवात वाचून गोंधळून गेला असाल, वैतागला असाल ( किंवा चिडला असाल) परंतु हे आपल्या महान भारतीय राजकारणाच्या सामन्या विषयी (अगदी जादुगाराच्या खेळाप्रमाणे) आहे, तो म्हणजे लोकसभा निवडणुका व आपल्या शहराचा खासदार निवडणे, म्हणूनच मी संभाव्य असा शब्द वापरला कारण ती व्यक्ती कोण असेल ते आपल्याला माहिती नाही. आता इथे लिंगभेद करणे हा हेतू नाही परंतु दोन मुख्य उमेदवार पुरुष आहेत व आत्तापर्यंत तरी कुणा महिला उमेदवाराने नामांकन भरलेले नाही, त्यामुळेच पुण्याच्या संभाव्य खासदाराचा उल्लेख करण्यासाठी वडील असा उल्लेख केला आहे.

आता लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, माझा लेख वाचताना बहुतेक वाचक असा विचार करतील की या पत्रातून काय सांगायचे आहे हे त्यांना माहिती आहे किंवा हा एकप्रकारे वेळेचा अपव्यय आहे. कारण सर्वप्रथम कोण उमेदवार हे सगळे  वाचणार आहे व त्याने वाचला तरीही त्याने असा कितीसा फरक पडणार आहे वगैरे वगैरे बोलले जाईल, तरीही हे लिहीत आहे म्हणून मी वेडा आहे का (काही शंका आहेत का?). मला तुमचे मुद्दे मान्य आहेत परंतु सर्वप्रथम निवडणुकीतील लोकशाहीचा मुद्दा समोर येतो व जर कुणाही उमेदवाराने हा लेख वाचला नाही तरी हरकत नाही परंतु तुम्ही लोक हा लेख वाचत आहात नाही का? आणि  तुम्ही काही बदल घडवून आणू शकत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लेख वाचणे लगेच थांबवू शकता, किंबहुना काहीच वाचू नका, केवळ इन्स्टावर पाचकळपणाचे रिल्स बघत राहा, तुम्ही त्यासाठीच आहात! उपरोधिकपणे बोलल्याबद्दल क्षमस्व, पण पुणेकर या बिरुदासोबत तो आपसूकच येतो, म्हणूनच आपल्या भावी खासदारांना हे खुले पत्र लिहीण्याची इच्छा झाली. देशातील इतर अनेक संवेदनशील किंवा सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या मतदारसंघांपेक्षा पुण्याने आघाडी घेतली आहे, कारण दोन्ही मोठ्या  प्रतिस्पर्धी पक्षांनी मतदानाचा दिवस जवळपास दोन महिने लांब असताना आधीच त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे, ही दुर्मिळ गोष्ट आहे. एकीकडे हे उमेदवारांसाठी आव्हान असते कारण एकीकडे मतदानासाठी तयार केलेली वातावरण निर्मिती इतका काळ कायम ठेवणे हे आव्हानात्मक तसेच कठीण काम आहे (उपरोधिकपणे बोलायचे तर खिशासाठीही). तर दुसरीकडे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची व त्यांना काय हवे आहे (म्हणजे त्यांच्या अपेक्षा काय आहेत) हे जाणून घेण्याची संधी मिळते. इथेच इरोल व इटॅलो यांची अवतरणे माझ्या मदतीला आली कारण माझे पत्र याचसंदर्भात आहे.

मी स्वतःला आता पुण्याचा नागरिक (अर्थात माझी नागपुरातली पाळेमुळे कधीच तुटणार नाहीत) समजतो, कारण मी इथे शिकलो, मला इथे नोकरी मिळाली व आता इथेच व्यवसाय चालवत आहे म्हणजे माझी उपजीविका इथेच आहे व या प्रक्रियेमध्ये शहराविषयी काही गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळाली आहे, कारण शहरामध्ये इमारती बांधणे हा माझा व्यवसाय आहे व माझ्या शिक्षणाचा संबंध पर्यावरणाशी आहे. तर, आता आपण हे पत्र वाचू या

पुण्याचे प्रिय भावी खासदार,

तुमच्या निवडणुकीसाठी आमच्या शुभेच्छा, तुम्ही तुमच्या प्रचारमोहिमेमध्ये पुढील काही मुद्दे (तुम्ही त्यांना सूचनाही म्हणू शकता) लक्षात ठेवू शकता

सर्वप्रथम, तुमची अशी अपेक्षा असेल की मी आता शहरातील समस्यांचा पाढा वाचेन तर तुम्ही चूक आहात कारण मला माहितीय तुम्ही माझ्यापेक्षाही पक्के पुणेकर आहात व तुम्ही निश्चितच शहराच्या समस्या जास्त चांगल्या प्रकारे जाणता, म्हणूनच मी आधी शहराची बलस्थाने सांगत आहे. पुण्याची सर्वोत्तम बाब म्हणजे, या शहराची संस्कृती, जो आपल्या समाजाचा कणा आहे, गणेश उत्सवाचेच उदाहरण घ्या, देशातील इतर कोणत्या शहरामध्ये लाखो लोक संपूर्ण रात्र रस्त्यांवर एकत्र येऊन अशाप्रकारे उत्सव साजरा करतात? सवाई गंधर्व, फिरोदिया, पुरुषोत्तम (ही कशाची नावे आहेत हे तुम्हाला माहिती नसेल तर कृपया त्याविषयी गूगल करा) व इतरही अनेक कार्यक्रम हजारो कलाकारांना त्यांची कला व कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात. त्यामुळे कृपया शहराच्या संस्कृतीचा हा कणा तुमच्या कालावधीत अधिक सशक्त होईल याकडे लक्ष द्या कारण                         तरच शहराचीही संस्कृतीसोबत सौहार्दपूर्ण वाढ होईल. संस्कृतीनंतर शहराचे दुसरे बलस्थान म्हणजे शिक्षण, या शहरामध्ये

लाखो विद्यार्थी इथे शिकून एक चांगला माणूस बनण्यासाठी येतात, इथे त्यांना ही आपली सांस्कृतिक परंपरापणा अनुभवता येते. परंतु आजकाल शहराची ही बलस्थाने झपाट्याने नष्ट होऊ लागली आहेत, कारण आता काहीही साजरे करणे म्हणजे कर्कश्श संगीत, स्पीकरच्या भिंती, झिंगून नाचणे, सायलेन्सरमधून कान किटवणारे आवाज काढणाऱ्या मोटरबाईकवर काढलेल्या मिरवणुका, यामुळे असे सोहळे संपूर्ण समाजासाठी त्रासदायकच ठरले आहेत. त्याशिवाय शिक्षण व्यवस्थेला अंमली पदार्थांचा विळखा पडल्याचे अलिकडे प्रकर्षाने जाणवू लागले आहे तसेच गुन्ह्यांमधील अल्पवयीन मुलांचा (विद्यार्थ्यांचा) वाढलेला सहभागही शहरातील शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, तुम्हाला यासदंर्भात सर्वाधिक काम करावे लागेलत्यानंतर मुद्दा येतो पर्यावरणाचा किंवा शहरातील हवामानाचा, या शहराला गेल्या काही दशकांपर्यंत उन्हाळा माहिती नव्हता व साधारण शंभर वर्षांपूर्वी ब्रिटीश राजवटीच्या काळात तर, हे शहर पंखामुक्त शहर म्हणून ओळखले जात असेल, म्हणजे इथले हवामान तेव्हा इतके अल्हाददायक होते की कृत्रिमपणे हवा खेळती ठेवण्याची गरजच पडत नसे व आपण आज या शहराचे काय करून ठेवले आहे ते पाहा !

पुणे शहराची आणखी एक जमेची बाजू म्हणजे, या शहरामध्ये तो किंवा ती कोणत्याही वयोगटातील असली तरीही त्या व्यक्तीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत व देशातील या आकाराच्या इतर शहरांच्या तुलनेत हे शहर सर्वात शांत असण्याचे हेदेखील एक कारण आहे.  जेव्हा बहुतांश लोक आपापले करिअर घडविण्यात व्यग्र असतात (अर्थातच कायदेशीर मार्गाने) तेव्हा समाजामध्ये शांतता नांदते, कामकाजाच्या चांगल्या संस्कृतीचा हा एक परिणाम आहे.  दरवर्षी लाखो स्थलांतरित शिक्षणासाठी, रोजगारासाठी या शहरात येतात. तसेच उद्योग, सेवा क्षेत्र, कंपन्या इथे येण्याचे कारण म्हणजे इथे मनुष्यबळ उपलब्ध आहे व या कंपन्या व उद्योग इथे असल्यामुळे लोक इथे येतात. म्हणूनच विकसनशील किंवा अविकसित देशांसाठी जगामध्ये अमेरिकेचे जे स्थान आहे तेच संपूर्ण मध्य भारतामध्ये पुणे शहराचे आहे. याच कारणामुळे गेल्या काही दशकांपासून ज्याप्रमाणे साखळी प्रतिक्रिया अविरतपणे सुरू असते, त्याचप्रमाणे पुण्याचीही भरभराट सुरू आहे व या शहराचे बॉस म्हणून तुम्हाला केवळ ही साखळी प्रतिक्रिया सुरू ठेवायची आहे. शेवटचा परंतु तितकाच महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला कोव्हिडचा फटका बसेपर्यंत कुणीही याची दखल घेतली नव्हती किंवा कुणालाही फिकीर नव्हती. आता अचानक सगळ्यांना आरोग्य व आरोग्य देखभाल सुविधांविषयी काळजी वाटायला लागली आहे, देशातील इतर कितीतरी शहरांच्या तुलनेत पुण्यामध्ये या सुविधा उत्तम आहेत. लोकांना इथे स्थायिक व्हायचे असते याचे हे आणखी एक कारण आहे, त्यांना असे वाटते की हे शहर त्यांना आवश्यक असेल तेव्हा चांगले आरोग्य सेवा केंद्र पुरवू शकेल. म्हणूनच, शहराच्या भावी खासदार साहेब या शहराच्या सार्वजनिक आरोग्य नावाची शाखा अधिक बळकट करण्याकडे लक्ष द्या, कारण त्यामुळे शहराची वाढ होण्यास अतिशय मदत झाली आहे. तसेच आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शहराचा गुन्हेगारी दर, जो सकृतदर्शनी अतिशय जास्त असल्याचे वाटू शकते (तो आहे, परंतु वेगळ्या स्वरूपात), परंतु शहराची लोकसंख्या व आकाराचा विचार करता तो प्रत्यक्षात कमी आहे. तरीही या शहराला गुन्हेगारीपासून सुरक्षित ठेवण्याचे आव्हान असेल, कारण सामान्यपणे जेथे पैसा असतो तेथे गुन्हे वाढतातच. म्हणून तुम्ही हे शहर सधन बनवले तर गुन्हेगारांपासून ते सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष योजना कराव्या लागतील, विशेषतः झपाट्याने वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांसाठी. ज्याप्रमाणे आपल्याला शिकवले जाते की कोणत्याही परीक्षेमध्ये आधी सोपे प्रश्न किंवा आपण ज्या भागाची उत्तम तयारी केली आहे त्यावरील प्रश्न आधी सोडवा व त्यानंतर अवघड प्रश्नांना वेळ द्या, त्याप्रमाणे आता शहराच्या अवघड भागाची वेळ आली आहे, हाहाहा! मी म्हटल्याप्रमाणे, शहरातील या सर्व समस्या तुम्ही माझ्यापेक्षा चांगल्याप्रकारे जाणता ज्यांची सुरुवात वाहतुकीपासून होते व शेवटही वाहतुकीमध्येच होतो, कारण अनेक समस्या या थेट पुण्यातील वाहतुकीच्या समस्येशी निगडीत आहेतवाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन लोक वैतागतात व त्यामुळे चिडून रस्त्यावर भांडणे होण्याच्या घटना (गुन्हे) घडतात त्याचप्रमाणे लाखो वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे नागरिकांचा श्वास कोंडतो, तसेच कार्बन मोनॉक्साईडच्या उत्सर्जनामुळे संपूर्ण शहराचे तापमान वाढते यामुळे आता पंखारहित शहरापासून हे आता वातानुकूलन यंत्र अत्यावश्यक असलेले शहर झाले आहे. यावरील एकमेव उपाय म्हणजे केवळ सार्वजनिक वाहतूक नाही तर ती नागरिकांची जीवनशैली बनवणे ही आहे, तो अधिक अवघड भाग आहे. कारण तुम्ही मेट्रो उभारू शकता परंतु नागरिकांना त्या मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी थोडे चालायला कोण शिकवेल, ही समस्या आहे.  सार्वजनिक वाहतुकीच्या दयनीय अवस्थेशिवाय, ज्याप्रकारे महाभारतातील कर्णाला त्याच्या शरीराचाच एक भाग असलेली कवच कुंडले होती, पुणेकरांना त्यांच्या दुचाकी किंवा चार-चाकी त्यांच्या शरीराचा अविभाज्य भागच वाटतो. यामुळे संपूर्ण शहर एकाच वेळी एक  वाहनतळ व महामार्ग असल्याप्रमाणे झाले आहे, ही खरी समस्या आहे. त्यासाठी वाहतुकीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून वाहतूक पोलीसांची काटेकोर देखरेख, तितकीच महत्त्वाची आहे, त्यांना योग्य मूलभूत सुविधा पुरविणे हे सुद्धा !

फक्त नवीन  रस्ते फ्लॅयओव्हरस बांधून वाहतूक कमी नियंत्रित नाही होणार !  तीन समस्यांवर मी टिप्पणी करायची गरज नाही, ते म्हणजे पाणी, सांडपाणी व कचरा, कारण त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी रॉकेट सायन्स गरज नाही केवळ तीव्र इच्छाशक्ती हवी, माझी तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. आणखी एक पैलू म्हणजे, शहराच्या हरित आच्छादनामध्ये घट, परंतु त्यावरील तोडगा म्हणजे केवळ वृक्ष धोरण तयार करणे व नवीन वृक्षारोपण करणे हे नाही. तर त्यासाठी योग्य गृहबांधणी धोरण तयार केले पाहिजे ज्यामध्ये झाडे व नागरिक दोघांचाही समावेश असेल व गृहबांधणीची गरज समजून घेतली पाहिजे. शहराची लोकसंख्या वाढतेय व त्यांच्यासाठी घरांची आवश्यकता आहे व ती मोठ्या संख्येने हवी आहेत. आपण ज्याप्रकारे ही घरे बांधतो त्यावरून शहराचे भवितव्य ठरते. भावी खासदार साहेब, हा आपल्या शहराचा सर्वात कमकुवत दुवा आहे व म्हणून तो सर्वात शेवटी मांडतोय कारण तो सर्वात कठीण आहे. तुमच्या मतदारांची पहिली मूलभूत गरज अन्न किंवा वस्त्र नाही कारण त्याची सोय ते आपणहून करू शकतात, तर घर ही त्यांची मुख्य समस्या आहे. जेमतेम वीस टक्के नागरिकच इथे स्वतःचे कायदेशीर घर आहे व व लाखो लोक एकतर अवैध घरे घेण्याच्या मोहाला बळी पडतात किंवा झोपडपट्ट्यांमध्ये भाड्याने राहतात, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला असे वाटत असेल की मी अतिशयोक्ती करतोय तर तुम्ही स्वतः सर्वेक्षण करा व हे तपासा. जेव्हा या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे म्हणजे ओला उबेर वाहन चालक, मोलकरीण, डिलेव्हरी बॉय, शिपाई यासारख्या लोकांचे या शहरामध्ये स्वतःचे घर असेल तेव्हाच ते शांतपणे जगू शकतील. शहराला सध्या ज्या अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेय त्यांचे या प्रक्रियेमध्ये निराकरण होईल; तुम्ही या शहराविषयी व त्यातील लोकांविषयी हे मूलभूत तथ्य समजून घेण्याची वेळ झालीय असे मला वाटले, म्हणूनच हा पत्र प्रपंच!

शेवटी पुण्याच्या नागरिकांसाठी (म्हणजे मतदारांसाठी), मला माहितीय या शहरातील अनेक तथाकथित सुशिक्षित लोकांसाठी  या शहरामध्ये असे अनेक आहेत ज्यांना राजकारणाचा व राजकारण्यांचा तिटकारा आहे व निवडणुकीमुळे काहीही बदलणार नाही असे त्यांना वाटते व सगळे सारखेच आहेत असेही त्यांना वाटते वगैरे, वगैरे. परंतु खरे सांगायचे तर तुम्ही मतदान न केल्यामुळे नक्कीच काहीच बदणार नाही ही वस्तुस्थिती आहे ! नोटा (म्हणजेच वरील उमेदवारांपैकी कोणीही नाही) म्हणजे कुठल्याही उमेदवाराला मतदान न करण्याची निवड करण्याचाही पर्याय आहे. अनेक लोक त्यांनी हा पर्याय निवडल्याचे अभिमानाने सांगतात, परंतु वैयक्तिकपणे सांगायचे तर माझा या पर्यायाला विरोध आहे. तुमच्या मताने निश्चितपणे फरक पडतो, तुम्हाला पडत नसेल परंतु तुमच्या शहराला नक्कीच पडतो. परंतु मतदान न करण्याचा पर्याय किंवा नोटा निवडून तुम्ही निवड करण्यापासून पळ काढताय, तुमच्यासमोर कितीही वाईट पर्याय असले तरीही सर्व पर्यायांमधून त्यातल्या त्यात जो चांगला पर्याय असेल, त्याची निवड करा. पुणेकरांनो, तुम्ही शहराचे भवितव्य एका व्यक्तीच्या हाती देणार आहात, त्यामुळे हुशारीने निवड करा व केवळ तुमचे मत दिल्यामुळे तुमच्या शहराप्रती तुमचे कर्तव्य संपत नाही, तर किंबहुना त्यानंतर ते सुरू होते, हे लक्षात ठेवा; तुम्हाला मतदानासाठी शुभेच्छा, एवढे बोलून निरोप घेतो !

संजय देशपांडे

smd156812@gmail.com