Saturday 9 November 2019

घरे ,शहर आणि शहराचे नवीन पालक !

























स्मार्ट शहराच्या प्रिय नवनिर्वाचित आमदारांनो,

“कुठल्याही मुलांच्या पालकांना विचारा त्यांची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी कशाची गरज असते, तर बहुतेक जण एकाच शब्दात उत्तर देतील...त्यागब्रायन के. वॉन

ब्रायन केलर वॉन (जन्म 17 जुलै, 1976) हे अमेरिकी कॉमिक पुस्तक व दूरचित्रवाहिनी लेखक आहेत. त्यांच्या द लास्ट मॅन, एक्स मशिन व रनअवेज इत्यादी कॉमिक पुस्तक मालिका अतिशय प्रसिद्ध आहेत. म्हणूनच तेलहान मुलांच्या आयुष्यात पालकांची भूमिका काय आहे हे एकाच शब्दात सांगू शकतात.आता लहान मुलांच्या जागी आपलं स्मार्ट शहर असेल तर  त्यांच्या पालकांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे कळलं ना? होय मी आपल्या शहरातल्या नवनिर्वाचित आमदारांविषयी बोलतोय, जे एकप्रकारे आपल्या शहराचे पालकही आहेत. राज्यातल्या विधानसभा निवडणुका संपल्यात, आपल्याकडे सत्तापालट हा विषय बाजुला ठेवला तरीही काही चेहरे वगळता बरेचसे पालक नवीन आहेत.म्हणूनच या स्मार्ट शहराचा रहिवासी या नात्यानं मला माझ्या भावना लिहून त्यांना सांगाव्याशा वाटल्या.या निवडणुकीनंतर मुख्यालयात म्हणजेच मंत्रालयात ज्याप्रकारे कामकाज चालतं त्यात बरेच बदल होऊ शकतात.मात्र एक शहर म्हणून आपले डोळे, कान, नाक (थोडक्यात सगळी ज्ञानेंद्रिये) आपण निवडून दिलेल्या व विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व करणाऱ्या पालकांवर केंद्रित असतील.मला राजकीय पक्षांविषयीच्या वादात पडायचं नाही, कारण निवडणूक लढण्यासाठी पक्ष आवश्यक असतात मात्र ज्याप्रमाणे एखादी आई लहान बाळाला वाढवताना कधी वडिलांचीही भूमिका पार पाडते किंवा वडिलही आईची भूमिका पार पाडतात तसंच तुम्हीही एकदा जिंकल्यानंतर शहराचा (बाळ समजून) चांगल्याप्रकारे विकास व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व काही करणे महत्त्वाचे आहे. यात बऱ्याचदा व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, आवडनिवड, अहंकार, छंद, एखाद्या गोष्टीचं वेड मुलासाठी बाजूला ठेवावं लागतं, यालाच आपण पालकांचा त्याग असं म्हणतो. 

नवीन पालक येण्याआधी म्हणजे या निवडणुकांपूर्वीची परिस्थिती कशी होती यावर एक नजर टाकू. मी असं म्हणणार नाही की सगळं काही आलबेल होतं (छान चाललं होतं), पण इतर शहरांची तुलना करता पुणं बऱ्याच बाबतीत सुदैवी आहे. तुम्हाला आधीच्या पालकांकडून सगळं श्रेय काढून घेता येणार नाही हे नक्की. आपली परिस्थिती इतरांएवढी वाईट नाही, असं आपल्याला म्हणता येईल, नाही का? आपल्याकडे आकाराने आपल्याएवढ्या इतर शहरांच्या तुलनेत सर्वोत्तम पाणीपुरवठा यंत्रणांपैकी (यंत्रणेपेक्षाही स्रोत म्हणणं अधिक योग्य ठरेल) एक आहे. आपल्याकडे अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा (सशुल्क असल्या तरीही) आहेत. आपल्याकडे मुंबईएवढी कार्यक्षम नसली तरीही सार्वजनिक वाहतूक यंत्रणा आहे. जवळपास दहा लाख लोक दररोज तिचा वापर करतात व आता मेट्रोही येऊ घातलीय.आपल्याकडे चोवीस तास वीज पुरवठा होतो, राज्यातल्या अनेक शहरात हे सुख नाही.पावसाळ्यात थोडा त्रास होत असला तरीही आपल्याकडचा वीज पुरवठा बराच चांगला आहे.आपल्याकडे रस्त्याचे बरेच चांगले जाळे आहे. हे ऐकून बऱ्याच नागरिकांच्या भुवया उंचावल्या जातील. पण तुम्ही जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या मध्यम आकाराच्या ईतर शहरांमध्ये जा व मग तिथली रस्त्यांची परिस्थिती सांगा.आपल्याकडे आपला कचरा उचलण्यासाठी एक यंत्रणा आहे. ती यंत्रणा कचऱ्याचं काय करते व एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा तयारच कसा होतो असे प्रश्न विचारू नका.चांगल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे व आपलं शहर रोजगार निर्मितीमध्ये राज्यातलंच नाही तर देशातलं सर्वात मोठं शहर आहे.मुलाच्या (म्हणजेच शहराच्या) विकासामध्ये हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, यामुळेच अनेक लोक इथे स्थलांतर करतात व त्यांच्या उदरनिर्वाहामुळे तसंच त्यांच्या उत्पन्नामुळे शहराच्या संपत्तीत भर पडते.

आता या सगळ्या चांगल्या गोष्टी वाचल्यानंतर एखादा म्हणेल की मग आधीच्या पालकांना जनता जनार्दनाने का नाकारले. असा प्रश्न विचारण्यात तुमची काहीही चूक नाही.मी काही कुणी राजकीय विश्लेषक नाही. मात्र वर दिलेल्या चांगल्या गोष्टींच्या यादीनंतरही नागरिकांनी नव्या पालकांना निवडून दिलंय (त्यांची निवड केलीय) याचा अर्थ शहरात अजूनही काही गोष्टींची कमतरता आहे ज्या देण्यात आलेल्या नाहीत. मुलांनी पालकांना बदलून आपला निषेध नोंदवला आहे.

पालकांनी (नवनिर्वाचित आमदारांनी) नेमकं हेच विसरून चालणार नाही. यासाठी राजकीय पक्ष, इर्षा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, विरोधकांशी असलेले जुने तंटे, मुलांना गृहित धरणे, तसेच हव्यास (कशाचा ते विसरू नका) अशा गोष्टी विसराव्या लागतील. वर्षानुवर्षे याच व अनेक अशा कारणांमुळे आपल्या जुन्या पालकांना घरी जावे लागले आहे, पण यामुळे शहराचा मात्र अतिशय तोटा झाला आहे .आपल्याकडे पाणी भरपूर आहे मात्र आपल्याकडे ते पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या जलवाहिन्या नाहीत. म्हणूनच आपल्या शहरात टँकर माफिया (पाण्याचे टँकर) नावाच्या नव्या जमातीचा सुळसुळा झालाय.त्यानंतर आपल्याकडे हजारो शाळा व रुग्णालये आहेत. मात्र जिथे शिक्षण व वैद्यकीय उपचारांचा दर्जा चांगला आहे ती ठिकाणं सामान्य माणसाला परवडणारी नाहीत ही वस्तुस्थिती आहे व जी परवडणारी आहेत त्यांच्या दर्जाविषयी न बोललेलं बरं ! आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक यंत्रणा आहे, मात्र तिची परिस्थिती कुटुंबातल्या म्हाताऱ्या माणसासारखी आहे कारण ती अस्तित्वात तर आहे मात्र तब्येत अतिशय खराब असल्याने कुटुंबातील कुठलीही जबाबदारी घेऊ शकत नाही. आपल्याकडे विजेचा पुरवठा सुरळीत आहे मात्र पाण्याच्या पुरवठ्याप्रमाणेच, विद्युत वाहिन्यांचे जाळे अपुरे आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय किंवा कारखान्यापर्यंत वीज यावी यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. खरंतर वीज वाहिन्या टाकणं हे सरकारचं (म्हणजेच आपल्या पालकांचं) काम आहे, मात्र त्यासाठी नागरिकांनाच मोठा खर्च करावा लागतो.ज्याकाही वीज वाहिन्या आहेत त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे त्यामुळे थोडासाही पाऊस पडला की वीज पुरवठा खंडित होऊन शहर अंधारात बुडून जाते. आपल्याकडे रस्त्यांचे जाळे आहे मात्र रस्त्यांची अवस्था, वाहतुक सिग्नल, दुभाजक, चौक यांची परिस्थिती दयनीय आहे. यामुळे पावसाळ्यातच काय वर्षभर कोणत्याही कामाच्या किंवा शाळेच्या वेळांमध्ये वाहतुकीची कोंडी होते.या शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी दिवसाच्या कोणत्याही वेळी दोन तास लागतात (तुमचं नशीब वाईट असेल तर जास्तीही लागू शकतात)वाईट गोष्ट म्हणजे शहराचं नियोजनच असं करण्यात आलं आहे की नागरिकांना नोकरी, शिक्षण, आरोग्य सेवा किंवा अगदी मनोरंजन अशा विविध कारणांसाठी सतत एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जावं लागतं. शहर सकृतदर्शनी स्वच्छ वाटतं, मात्र त्याने भुलू नका. कचरा डेपोचा वाद सतत डोकं वर काढत असतो व त्यानंतर तुम्हाला सगळीकडे कचऱ्याचे ढीगच्या ढीग दिसू लागतातआपल्याला अनेक दशकं उलटून गेल्यानंतरही आपल्या शहरातल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी योग्य जागा मिळालेली नाही. खरंतर आपण आपला कचरा जिथे नेऊन टाकतो तिथल्या लोकांची शांतता भंग न करता (आरोग्याला धोका निर्माण न करता) कचऱ्याची निर्मिती नियंत्रित ठेवू शकतो किंवा त्यावर प्रक्रिया करू शकतो ही वस्तुस्थिती आहे.शहरातल्या सार्वजनिक शौचालयांचीही अशीच परिस्थिती आहे, तुम्ही कधी नैसर्गिक विधीसाठी त्यांचा  वापर करून पाहिलात तर पुढील वेळेस तुम्ही सार्वजनीक स्वछतागृहात पाऊलही टाकणार नाही याची मला खात्री आहे. त्यानंतर सुरक्षा तसंच पोलीस व अग्निशामक दलांसारख्या महत्वाच्या दलांसाठीच्या निकृष्ट पायाभूत सुविधा हीसुद्धा एक समस्या आहेजैवविविधता धोरणांमधल्या त्रुटींमुळे केवळ शहरातल्याच टेकड्या व जलस्रोतांचे (नदी हा शब्द वापरू शकत नाही) नाही तर आजूबाजूच्या परिसराचेही नुकसान होतेय. इतरही अनेक समस्या आहेत. या सगळ्या नकारात्मक बाबींमध्येही या शहरात होणारी रोजगार निर्मिती ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र एखादंअनाथ मूलही वाढतं, तो निसर्गनियम आहे, मात्र त्याची वाढ किती सुदृढपणे होते हे त्याच्या पालकांवर अवलंबून आहे.

शहरातल्या वर नमूद केलेल्या सगळ्या सकारात्मक व नकारात्मक बाबी नागरिकांसाठी एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी जबाबदार असतात, ती म्हणजे घर. जर अधिकाधिक लोक या शहरात स्थलांतरित होत असतील तर त्यांची दुसरी गरज आहे घर (पहिली गरज ही नेहमी रोजगार असते) व इथेच आपण अतिशय कमी पडतोयबरेच जण म्हणतील की, हजारो सदनिका (म्हणजेच घरे) ताबा देण्यासाठी तयार अवस्थेत पडून आहेत. मात्र बांधकाम व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये मंदी आहे म्हणून सैरभैर झाले आहेत. अशावेळी घरांच्या आघाडीवर आपण अपयशी झालो आहोत असं कसं म्हणता येईलहजारो सदनिका (कदाचित जास्तीही) पडून आहेत, त्याचशिवाय अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. शहरासाठी हे चांगलं लक्षण नाही. रिअल इस्टेटमधली मंदी ही शहरामध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या असमान वितरणामुळे आहे, केवळ घरांचे दर किंवा विक्रीसाठी अतिरिक्त घरे उपलब्ध झाल्यामुळे नाहीहेच मुख्य कारण आहे. साधारण तीन दशकांपूर्वी अवैध घरात राहणारी लोकसंख्या (ज्यामध्ये झोपडपट्ट्यांचाही समावेश होतो) जेमतेम 15-25% होती, तीच आता जवळपास 45झाली आहे. म्हणजेच या शहरातली जवळपास निम्मी लोकसंख्या अवैध घरांमध्ये राहते व पालकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.कुणालाही अर्थातच अवैध घरांमध्ये किंवा झोपडपट्टीत आपणहून राहायचं नसतं. ते वेळोवेळी पालकांवरील राग एकमेव मार्गाने व्यक्त करतात तो म्हणजे विद्यमान पालकांविरुद्ध मतदान करून, ही संधी पाच वर्षातून एकदाच येते.कायदेशीर घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कष्टाचे पैसे खर्च केल्यानंतरही (जे बरेच करावे लागतात) चांगल्या सेवा मिळत नसतील तर ते सुद्धा हाच मार्ग पत्करतात.नुकत्याच आलेल्या पुरानं कायदेशीर व बेकायदेशीर दोन्ही घरांमध्ये हाहाकार उडाला, मात्र शहराच्या पालकांनी नागरिकांची काळजी घेतली नाही हे अतिशय बोलकं उदाहरण आहे. लाखो कुटुंबांना या पुराचा विविध प्रकारे फटका बसला. प्रियजनांचा जीव गेला, मौल्यवान वस्तू वाहून गेल्या, पुरामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीने व वीज पुरवठा खंडित झाल्याने जीव मेटाकुटीला आला. म्हणूनच हे सगळे नागरिक पालकांविरुद्ध मतदान करून बंड करणार हे स्वाभाविक होतं व आपल्याला या निवडणुकीमध्ये हेच दिसून आले.

आपल्या नवीन पालकांनी या सगळ्या घटनांचा अभ्यास केला पाहिजे कारण पाच वर्षं हां हां म्हणता निघून जातील. माध्यमांना, शासनकर्त्यांना व बिझनेस गुरुंना वाटते तेवढे लोकांची स्मरणशक्ती अल्पकालीन नसते.जे पालक (आमदार, खासदार, नगरसेवक) पुन्हा निवडून आले आहेत त्यांनी त्यांच्या नशीबाचे आभार मानले पाहिजेत. कारण मताधिक्य कमी झालं आहे याचा अर्थ लोक त्यांच्यावर पूर्वीसारखे खुश नाहीत आणि  नवीन चेहऱ्यांना जबाबदारी देण्यात आलीय किंवा ते काहीतरी चांगला बदल घडवतील असा विश्वास दाखवण्यात आलाय. इथेच शहराच्या पातळीवर पालकांचा त्याग महत्त्वाचा ठरतो.आम्ही तुमच्याकडे आमचे पालक म्हणून पाहतो, म्हणूनच तुम्हीज्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकलाय त्याला नाही तर नागरिकांना जबाबदार आहात.तुम्ही पक्षाच्या चौकटीतून बाहेर पडून शहराच्या भल्यासाठी एकजुटीनं काम करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही काही मूठभर नागरिकांच्या नाही तर संपूर्ण शहराच्या भल्यासाठी काम केलं पाहिजे.त्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकजण या शहराचा अविभाज्य भाग झाला पाहिजे तसंच स्वतःला समाजासाठी उपलब्ध करून दिले पाहिजे. तुम्हाला पालकाची भूमिका तसंच व्याख्या समजली तरंच हे शक्य आहे.पालक हा आधी कुटुंबाचा सदस्य असतो, तुमच्या बाबतीत सांगायचं तर तुम्ही या स्मार्ट शहराचे आधी नागरिक आहात म्हणूनच पालक झाला आहात.आपण जेव्हा म्हणतो त्याग तेव्हा तुम्ही महत्त्वाकांक्षी होऊ नका किंवा संपत्ती, नाव अथवा प्रसिद्धी मिळवू नका असं आमचं म्हणणं नाही.पण एक लक्षात ठेवा ही सगळी तुम्ही पालक म्हणून तुमचं कर्तव्य करत असतानाची उपउत्पादनं आहेत, उद्दिष्टं नाहीत. आम्ही तुम्हा सगळ्यांवर जो विश्वास दाखवलाय त्या बदल्यात या शहराला तुमच्याकडून असा त्याग अपेक्षित आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य चोख पार पाडलं तर तेच नागरिक तुम्हाला पुन्हा पुन्हा त्यांचे पालक बनवतील. या निवडणुकीत आपल्याला अशा चेहऱ्यांची उदाहरणं राज्यभरात दिसून आली आहेत.

म्हणूनच पालकांनो तुम्हाला तुमची जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. हा अतिशय अद्भुत देशआहे, इथे लोक जसं जीवापाड प्रेम करतात तसंच टोकाचा तिरस्कारही करतात; विशेषतः ज्यांना ते पालक म्हणतात (किंवा असल्याचं मानतात) त्यांचा.एक लक्षात ठेवा ज्याप्रकारे आम्ही आमचे देव तयार करतो, त्याच प्रकारे आम्ही आमचे पालकही घडवतो किंवा बिघडवतो.

 संजय देशपांडे
संजीवनीडेव्हलपर्स












No comments:

Post a Comment