Monday, 24 February 2025

परिकथा उमरेड करंडलाच्या वाघिणीची..!!

      

                                                             















































परिकथा उमरेड करंडलाच्या  वाघिणीची..!!

तुम्हाला तुमची मुले हुशार असावीत असे वाटत असेल, तर त्यांना परीकथा वाचून दाखवा. ते खुप  हुशार व्हावेत असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यांना आणखी भारत  परीकथा वाचून दाखवा.”
― 
अल्बर्ट आइस्टाईन.

आईनस्टाईन यांची काही ओळख करून देण्याची गरज नाही, या जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती असण्यासोबतच ते एक तत्वज्ञ सध्या  होते, अतिशय संवेदशील  होते तसेच एक चांगली व्यक्ती होते व त्यांचा परीकथांसारख्या गोष्टींवर विश्वास होता. मी त्यांचे विद्वत्तापूर्ण शब्द अनेकदा वापरले आहेत परंतु वरील शब्द या लेखासाठी अगदी चपखल आहेत जो पऱ्यांविषयी, म्हणजेच येथे  वाघीणींविषयी (दुसरे काय) आहे, आता एखादाजण (किंबहुना अधिक) कदाचित असे म्हणू शकतो की वाघासारख्या भीतीदायक, हिंस्र, धोकादायक प्राण्याला कुणीही परी कसे म्हणू शकते! परंतु अशा कुणाही व्यक्तींना (म्हणजे माणसांना) एकतर परीची संकल्पना समजली नाही किंवा वन्यजीवन समजलेले नाही, असेच मी म्हणेनतर, हा लेख वन्यजीवनाविषयी, वाघिणीविषयी व जंगलाभोवतालच्या लोकांविषयी आहे (काळजी करू नका, तो ताडोबाविषयी नाही) व यावेळी जंगल आहे उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य जे यूकेडब्ल्यूएस म्हणून ओळखले जाते, परंतु ते अलिकडे का चुकीच्या कारणांसाठी बातम्यांमध्ये आहे. तुमच्यापैकी बहुतेकांनी समाज मध्यमाथून  एका ध्वनीचित्रफित पाहिली असेल ज्यामध्ये एक वाघीण तिच्या पाच बछड्यांसोबत जिप्सींच्या गर्दीतून चालत  जात असल्याचे दिसत आहे ज्यासाठी असा मथळा देण्यात आला होता की ताडोबातील सहा वाघांचे दुर्मिळ दृश्य. या ध्वनीचित्रफितीतून अधिकाऱ्यांनी चुकीचा निष्कर्ष काढला की बछड्यांसोबत चाललेल्या वाघीणीचा रस्ता पर्यटकांच्या वाहनांमुळे अडवला गेला वगैरे वगैरे. अर्थात हा लेखाचा विषय नाही कारण मी याविषयी आधीच माझे मत व्यक्त केले आहे, परंतु विषय आहे त्या ध्वनीचित्रफितीतील वाघीण, तिचे नाव एफ२, वन विभाग व स्थानिक तिला फेअरी २ नावाने ओळखतात, म्हणून परीकथांचा संदर्भ दिला आहे!

फेअरी २ हे नाव तिला तिच्या वारश्यावरुन  देण्यात आले कारण तिच्या आईचे नाव फेअरी होते, या वाघीणीने उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभरण्याला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले. जवळपास आठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा अशी वेळ होती, जेव्हा एक वाघीण पाच बछड्यांना बेधडकपणे उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील चिंचोळ्या रस्त्यांवरून (हे तपशील लक्षात ठेवा) जात असतानाची छायाचित्रे समाज माध्यमांवर दिसली होती, त्या काळी केवळ फेसबुक होते. दुर्दैवाने आपले (भारतातील) वन्यजीवन व्याघ्र केंद्रित आहे व ते योग्य किंवा अयोग्य याचा निवाडा मी करत नाही परंतु त्याने वस्तुस्थिती बदलत नाही. अभयरण्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पक्षी निरीक्षण किंवा अभयारण्यातील जलचरांचा अपवाद वगळता वाघच पाहायचा असतो व तुम्हाला सहा वाघ एकत्र आहेत हे दृश्य वारंवार पाहायला मिळत नाही. यामुळे केवळ उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्य केवळ वन्यजीवनाच्या नकाशावरच आले नाही तर त्यामुळे इथले संपूर्ण समाज जीवनच बदलले कारण त्याने इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला व त्यांच्यासोबत पैसा आला. तुम्हाला उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याच्या भौगोलिक स्थानाविषयी माहिती नसेल (तुमच्यापैकी बहुतेकांना नसेल) उमरेडमधील जमीन ही खनिज समृद्ध म्हणून ओळखली जाते. परंतु आता अनेकांना माहिती आहे की जंगलांचे पट्टे वर्षानुवर्षे ताडोबा किंवा आंध्र प्रदेशातील जंगलांना किंवा अगदी मध्य प्रदेशातील जंगलांना जोडतात. इथे वाघ नेहमीच असायचे परंतु त्यांच्यापैकी बहुतेक स्थलांतर करताना इथे येत असत व ते क्वचितच या जंगलांमध्ये वास्तव्य करत असत. म्हणूनच उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याचे स्थान वन्यजीवप्रेमींसाठी कधीही आवर्जून पाहण्यासारख्या ठिकाणांच्या यादीत वरचे नव्हते. परंतु इथे फेअरीने प्रवेश केला व इथली परिस्थिती बदलली... याचे कारण म्हणजे भोवताली जिप्सींचा वावर असतानाही बेधडपणे दिमाखात चालत येणारी ही वाघीण व तिचे झपाट्याने वाढणारे बछडे. जवळच्याच ताडोबाच्या जंगलामध्ये बछडी त्यांच्या आईपासून दीडवर्षातच वेगळी होत असताना, इथे मात्र भोवताली अनेक नर वाघ असल्यास त्या  सगळ्यांना योग्य येणारा ताण नव्हता, त्यामुळे ही बछडी जवळपास अडीच वर्षे फेअरीसोबत राहिली. रातगावर ठेवण्यासाठी आणि या सगळ्यांना एकत्र पाहणे  म्हणजे सहा मोठे वाघ घोळक्याने चालत असल्याप्रमाणे दृश्य होते. पर्यटक हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होत असत व मीसुद्धा त्यापैकीच एक होतो. मी फेअरीला तिच्या पाच बछड्यांसोबत पाहिले आहे जेव्हा तिची बछडी दीड वर्षांची होती व उमरेड कऱ्हांडला वन्यजीन अभयारण्यातील रस्त्यांशी जुळवून घेताना सुद्धा पाहिले आहे !

याच कारणाने या वाघीणीला फेअरी हे नाव देण्यात आले असावे कारण उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्य हे अतिशय गरीब अभारण्य आहे कारण त्याचे ठिकाण विकसित शहरी जगापासून तुटलेले आहेत, इथे पैसाही तुरळक होता व वाघ दिसण्याचे प्रमाणही कमी होते परंतु  फेअरीमुळे हे दृश्य एका रात्रीत बदलले. ज्या ठिकाणी निवासासाठी एक चांगले हॉटेलही नव्हते तिथे आता एमटीडीसीसह जवळपास वीस रिसॉर्ट आहेत. आता तुम्हाला लो तिला प्रेमाने फेअरी म्हणून का ओळखतात यामागच्या भावना कळल्या असतील, कारण तिने इथल्या हजारो लोकांच्या आयुष्याचे भले केले, तिच्या केवळ अस्तित्वाने त्यांच्या कुटुंबांमध्ये आनंद आणला. ज्या लोकांना उमरेड कऱ्हांडलाचे तपशील माहिती नसतील, त्यांच्यासाठी सांगतो की इथे कऱ्हांडला व गोठणगाव असे दोन विभाग आहेत त्यांचे आणखी एक प्रवेशद्वारे म्हणजे पवनी जे महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला आहे. परंतु फेअरीने गोठणगाव व कऱ्हांडला या विभागांना फेरीने  घर बनवले, हा संपूर्ण भाग फक्त तिचाच होता . ही झाली फेअरी १ची गोष्ट व यातील समस्या अशी आहे की एकदा बछडी मोठी झाली व आपापल्या क्षेत्राच्या शोधात विखुरली की अचानक ते कमी नजरेस पडतात व यामुळे पर्यटकांची संख्या रोडावते, विशेषतः जेव्हा तुमच्या जंगलाचा विस्तार उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्याइतका लहान असतो. फेअरीने एक अतिशय अभूतपूर्व अशी गोष्ट केली ते म्हणजे तिने तिच्या दोन बछड्यांना संपूर्ण जंगलातील दोन भाग देऊन टाकले, त्यातील एक बछडी फेअरी २ आहे. आता उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्यामध्ये तीन वाघीणी व त्यांचे बछडे आहेत, तर कऱ्हांडाला विभागातील  वाघीणीला एक्स१ म्हणून ओळखले जाते, तर गोठणगावाच्या भागावर एफ२चे म्हणजेच फेअरी२ चे राज्य आहे. फेअरीने जंगलाच्या एका कोपऱ्यामध्ये आसरा घेतला आहे जे पवनीचे प्रवेशद्वार आहे व अगदी बफर क्षेत्रापर्यंतही विस्तारले आहे.

या परीकथेची सर्वोत्तम बाब म्हणजे एफ२ही ही परंपरा पुढे चालवत आहे, जो सर्व वन्यजीव प्रेमींसाठी आश्चर्याचा सुखद धक्का आहे, काही महिन्यांपूर्वी एफ२ ही वाघीण उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्याच्या चिंचोळ्या रस्त्यांवर (इथे पुन्हा एकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करू नका) तिच्या पाच बछड्यांसह दिसून आली व पाहिले तर स्थानिकांना असे वाटले की फेअरी स्वतःच पुन्हा  अवतरली आहे. हेच दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असत व अनेक दिवस वाट पाहात असत. पर्यटकांनी अशीच एकदा गर्दी केलेली असताना आधी नमूद केलेली ध्वनीचित्र व्हायरल झाली व ती वन विभाग तसेच स्थानिकांसाठीही डोकेदुखी होऊन बसली. आता फेअरी होण्याची काय किंमत मोजावी लागते याविषयी, ज्यात अनेक पर्यटकांना रस नसतो परंतु ती खरोखरच मोजावी लागते जे मी गोठणगावला अलिकडेच दिलेल्या भेटीत पाहिले. एकाच वेळी पाच बछड्यांना जन्म देणे व त्यांचे पालनपोषण करणे हे किती कठीण काम आहे याची कल्पना आपल्या मानवी बुद्धीला करताच येणार नाही. एकतर या बछड्यांना एकटीने जन्म द्यायचा, त्यानंतर त्या बछड्यांची देखभाल करण्यासाठी सोबत कुणी नोकर-चाकर नसतात व त्यानंतर त्यांची भूक व तहान यासारख्या मूलभूत मागण्या पूर्ण करायच्या. जेव्हा पाच बछडी असतात तेव्हा वाघीण त्यांना फार काळ स्तन्यपान देऊ शकत नाही कारण त्यामुळे तिची सगळी शक्ती   नष्ट होतेत्याचवेळी, दररोज तुम्हाला सहा पोटे भरायची असतात तीसुद्धा वाघांची, त्यामुळे गररोज एफ२ ला (व त्याआधी एफ म्हणजे फेअरीला) शिकारासाठी भटकंती करावी लागत असे व या काळात तिच्या सर्वत्र बागडणाऱ्या लहानग्या बछड्यांचे रक्षण करण्यासाठी कुणी नसताना त्यांना एकटे सोडून शिकारीला जात असल्याचा ताण असे. ताडोबाच्या उलट उमरेड कऱ्हांडला वन्य अभायारण्यामध्ये सुदैवाने इतर हिंस्र श्वापदे व नर वाघ कमी आहेत तरीही बछड्यांना सर्प दंश व जलाशयात पडणे यासारखे कितीतरी धोके असतात. आईला स्वतःला सुरक्षित व तंदुरुस्त ठेवावे लागते, कारण तुम्ही जंगलाची राणी असलात करीही, ते केवळ एक बिरुद आहे इथे तुम्हाला आयते जेवण देण्यासाठी कुणीही नोकर चाकर नसतात. अलिकडेच एफ२ ला एका रात्री अपरात्री  शिकार करताना इजा झाली व तिचे नाक सुजलेले होते व त्याला जखमही झालेली होती, जी मी तिचे जे छायाचित्र काढले त्यात स्पष्टपणे दिसून येत होती. तिला वेदना होत होत्या परंतु तिची पाच बछडी खेळत होती व आईला तिच्या वेदना बाजूला ठेवून तिचे आईपणाची  काम करावे लागत होते. बिचारी राणी थोडा वेळ बछड्यांसोबत खेळली व गाईडने मला सांगितले की तिने आधीच्या शिकारीतून फारसे काही खाल्लेले नव्हते कारण ते हरिणाचे एक छोटेसे पाडस होते जे तिच्या बछड्यांसाठी जेमतेम पुरेसे होते, त्यामुळे तिला भूक लागलेली होती. परंतु ती केवळ थोडा वेळ बछड्यांपासून बाजूला गेली व तिच्या वेदनेपासून आराम मिळावा यासाठी जलाशयात विश्रांती घेतली. ती जखम तिच्या नाकावर असल्याने ती चाटूही शकत नाही, जे वन्य प्राण्यांसाठी सर्वोत्तम औषध असते व तरीही ती तिच्या बछड्यांसाठी धीर धरून होती, फेअरी अशीच आहे.

आता पर्यटन व त्यामुळे येणारा तथाकथित अडथळा, या बाबी मी लेखात टाळू शकत नाही. आम्ही संपूर्ण दिवसाची सफारी घेतली होती याचाच अर्थ असा होतो की सकाळच्या सफारीनंतर संपूर्ण जंगलामध्ये केवळ दोनच वाहने होती पूर्ण दुपारभर आम्ही एफ२ ला विश्रांती घेताना पाहिले व तिची बछडी तिच्या भोवती खेळत होती व परंतु वाघीण गाढ झोपलेली होती. दुपारची सफारीची वाहने ज्या क्षणी जंगलात आली ती आपणहून उठली व रस्त्यावर आली, जणूकाही ती पर्यटकांना आपला  कार्यक्रम दाखवण्याचीच ती वाट पाहात असावी. तिला जणू स्थानिक लोकांप्रति असलेली तिची जबाबदारी माहिती असावी, कारण त्यांचे उत्पन्न (म्हणजेच जीवन) पर्यटकांना वाघ दिसण्यावर अवलंबून असते. मी काही भावनिक माणूस नाही व वन्यजीवन किती खडतर असते हे जाणतो परंतु मी जेव्हा एफ२ ला माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्ससाठी धाडसाने तिची सर्व वेदना व अडी-अडचणी बाजूला ठेवून सर्व आघाड्यांवर तोंड देताना पाहिले, माझे डोळे नकळत पाणावले. उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्याची राणी होण्यासाठी तिला होत असलेले त्रास व तोंड द्याव्या लागत असलेल्या अडीअडचणी पाहून मी तिला मनःपूर्वक सलाम केला. त्याचवेळी जे म्हणतात की वन्यजीव पर्यटन हा वाघांसाठी अडथळा आहे त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखून असे म्हणावेसे वाटते की एफ२ ला तिच्या अवती-भोवती माणसांचा वावर आवडत असावा  व तिला त्यांच्या हजेरीत, पर्यटकांच्या, गाईड व जिप्सी चालकांच्या नजरेसमोर तिची बछडी सुरक्षित आहेत असे वाटत असल्यासारखे वाटते. याचे कारण म्हणजे आमच्या पुढ्यात तिचे बछडे सोडून ती शिकारीसाठी गेली, हे माझे प्रत्यक्ष जंगलातील निरीक्षण आहे एखाद्या कार्यालयामध्ये बसून चॅट-जीपीटीवर लिहीलेला लेख नाही. त्याचवेळी मला एफ२ चे हे वर्तन कदाचित अपघाताने जाणवले असावे परंतु गाईड व जिप्सी चालकांनीही ती नेहमी अशीच वागत  असल्याची खात्री केली. याचाच अर्थ असा होतो की सफारीच्या वाहनांमुळे वैतागण्याऐवजी किंवा भेदरण्याऐवजी ही वाघीण त्यांच्यासोबत सहजपणे तिथे वावरते. तिला पर्यटक घुसखोर वाटत नाही तर त्यांच्या उपस्थितीत तिला तिचे बछडे सुरक्षित वाटतात. माझ्या विधानाची खात्री करणारा आणखी एक तर्क म्हणजे जर एफ२ ला ती तिच्या बछड्यांसोबत चालत असताना जिप्सींनी तिची वाट अडवत असल्याचे वाटत असते तर तिने तिच्या बछड्यांना आजूबाजूला वाहने असताना बाहेरही पडू दिले नसते. परंतु परिस्थिती वेगळीच आहे, दररोज ती जिप्सी भोवती असताना त्यांना रस्त्यावर आणत असते, यातून काय दिसून येते असा प्रश्न मला ज्यांना वन्य पर्यटन हा वन्यजीवनासाठी अडथळा आहे असे वाटते त्या सगळ्यांना विचारासा वाटतो. एक कारण म्हणजे, एफ२ ला अगदी ती बछडी असल्यापासून सफारीची वाहने व तिच्या प्रत्येक हालचालीवर रोखलेले पर्यटकांचे कॅमेरे ओळखीचे आहेत व तिची त्याला काहीच हरकत नाही, आता याला आपण सहजीवनाशिवाय दुसरे काय म्हणू शकतो.

अर्थात याचा अर्थ असा होत नाही की आम्ही वाघांचा मार्ग अडवू शकतो किंवा त्यांना अडथळा येईल असे करू शकतो किंवा कोणत्याही वन्य प्राण्याला जंगलातील त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवू शकतो. परंतु काही मूलभूत नियमांचे पालन केल्याशिवाय हे साध्य होणार नाही जे प्रत्येक अभयारण्यामध्ये संबंधित जंगलाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार वेगळे असू शकतात. उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्यातील रस्ते अतिशय चिंचोळे आहेत व आपण ते थोडेसे रुंद करू शकतो किंवा आपण स्वयं-शिस्तीचे पालन करू शकतो ज्याद्वारे प्रत्येकाला आळीपाळीने वाघ पाहता येईल व सर्वोत्तम छायाचित्रे घेता यावीत यासाठी आपली हाव बाजूला ठेवली पाहिजे. तेथील परिस्थिती अशी आहे की जर एफ२ किंवा कोणताही वाघ रस्त्यावर असेल तर केवळ दोन किंवा तीन जिप्सीतील पर्यटक वाघाला पाहू शकतात व जे मागे उरतात त्यांना केवळ वाघांचा केवळ काही भागच समोर दिसतो व जर त्यांनी अशाप्रकारे वाघ दिसल्याची छायाचित्रे काढली तर ते वाघांसाठी किंवा वन्य प्राण्यांसाठी अडथळा असल्याचा शिक्का बसतो जी प्रत्यक्षात परिस्थिती नसते. वन विभागाने आता तज्ञांची एक समिती तयार करण्याची वेळ आली आहे  अशी एखादी घटना घडल्यास  जी वन्यजीव पर्यटनाच्या कोणत्याही पैलूविषयी पक्षपातीपणे धोरणे तयार करणार नाही व योग्य प्रकारे चुकीची  वन्यजीव पर्यटन आनंदादायक होईल व त्याच्याशी संबंधित सर्वांना सहजीवनाचा मार्ग खुला होईल. जर वन विभागाला यासंदर्भात काही समस्या असतील, तर माननीय उच्च न्यायालयाने कृपया आपणहून हस्तक्षेप केला पाहिजे व प्रत्येक जंगलासाठी तसेच एकूणच सर्वांसाठी योग्य मार्गदर्शक तत्वे तयार केली पाहिजेत.परंतु त्यासाठी वन्यजीवनाच्या एखाद्याच पैलूविषयी नव्हे तर एकूणच वन्यजीवनाविषयी योग्य मानसिकता असली पाहिजे आणि  कोणत्याही घटकावर अन्या होऊ नये  हीच त्यामागची अपेक्षा .

सरतेशेवटी माझ्या बारा वर्षांच्या लेखनाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच लेखाचा शेवट करण्यासाठी मी एखादया  अवतरणाचा वापर करतो

परीकथा या वास्तवापेक्षाही बरेच काही असतात: केवळ ड्रॅगन अस्तित्वात असतात असे त्या आपल्याला सांगतात म्हणून नव्हे, तर ड्रॅगनचा पराभव केला जाऊ शकतो असेही त्या आपल्याला सांगतात म्हणून.”― नील गेमनउमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील फेअरीच्या गोष्टीमध्ये, ड्रॅगन म्हणजे आपल्या संपूर्ण वन्यजीवनाविषयीचा चुकीचा दृष्टीकोन असेच मला म्हणावेसे वाटते, व त्यांचा पराभवर  हाच उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील फेअरीच्या कथेचा योग्य शेवट किंबहुना योग्य सुरुवात असेल, एवढे सांगून निरोप घेतो!

 या परिकथेतील काही बहुमूल्य क्षण सोबतच्या लिंक वर पाहू शकता

https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720323886782/


संजय देशपांडे 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in













Monday, 17 February 2025

घराची सुरक्षितता आणि आपली जबाबदारी!



























 


















घराची सुरक्षितता आणि आपली जबाबदारी!

“सुरक्षितता हा जीवनाविषयीचा दृष्टिकोन आहे केवळ एखादी यंत्रणा किंवा नियम नव्हे”… मी.

हे केवळ एक अवतरण किंवा केवळ काही शब्द नाहीत तर इमारतीची सुरक्षितता याविषयी जेव्हा मला बोलायचे होते किंवा माझे विचार मांडायचे होते जेव्हा माझ्या मनात आलेल्या या भावना होत्या. माझ्या घरापासून अगदी जवळच असलेल्या एका सोसायटीमध्ये तिच्या प्रवेशद्वारापाशीच एका रहिवाशाची गळ्यातील साखळी ओढण्याची घटना, संध्याकाळच्या वर्दळीच्या वेळी घडली. त्यानंतर त्या सोसायटीच्या वॉट्सॲप ग्रूपवर जोरदार चर्चा सुरू झाली. त्या सोसायटीमध्ये आमचीही एक लहान सदनिका आहे त्यामुळे मीदेखील त्या वॉट्सॲप ग्रूपचा सदस्य आहे. या सगळ्या चर्चेचा भर प्रामुख्याने अर्थातच सोसायटीची सुरक्षा व यंत्रणेवर होता. मी तेथील सदस्यांना सांगितले की मला या क्षेत्रातील थोडा अनुभव असल्यामुळे ज्या सदस्यांना इमारतीची सुरक्षितता याविषयावर जाणून घ्यायचे असेल त्यांच्यासाठी मी एक छोटेसे सादरीकरण देऊ शकतो व त्यानंतर पुढे काय पावले उचलायची हे त्यांनी  ठरवावे, मी जाणीवपूर्वक हे लिखाण पीपीटी स्लाईडच्याच स्वरूपात देत आहे व मुद्दे सविस्तरपणे सांगत आहे, जेणेकरून वाचकांना सर्व मुद्दे सखोलपणे समजून घेता  येतील. त्याचवेळी माझ्यासाठीही हा बरेच काही शिकवणारा किंवा नाविन्यपूर्ण अनुभव होता. माझ्या मते जवळपास पन्नास टक्के सुरक्षा ही प्रकल्पाचे नियोजन करतानाच साध्य करता येते व उर्वरित जेव्हा लोक या इमारतीमध्ये राहण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या घर वापरताना साध्य होते. त्यामुळे सुरक्षिततेविषयीचे हे सादरीकरण माझ्या चमूसाठी तसेच आमच्या प्रकल्पातील रहिवाशांसाठीही उपयोगी ठरेल असे मला वाटले. अलिकडे (कोरोनानंतर) काही कारणांनी गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे मग ते सायबर गुन्हे असोत किंवा साखळी खेचणे असो किंवा घरफोडी असो, मोठ्या लोकसंख्येकडे रोजगारच नाही किंवा त्यांना झटपट पैसा कमवण्यामध्ये रस आहे म्हणुन असेल. म्हणूनच तुम्ही कोणतेही वर्तमानपत्र उघडा, तुम्हाला शहरातील बातम्यांच्या पानावर घरफोडीच्या व तत्सम गुन्ह्यांच्या अनेक बातम्या वाचायला मिळतात ही वस्तुस्थिती आहे. अर्थात माझ्या लेखाचा तो विषय नाही व अनेकजण म्हणतील की पोलीस काय करत आहेत, त्याचे असे आहे की तुम्ही वाहन चालवत असताना हेल्मेट तुम्हीच घालणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे घर तुमचे असल्यामुळे त्याच्या सुरक्षिततेसाठी तुम्हीच काहीतरी खबरदारी घेणे आवश्यक आहे, त्यालाच सुरक्षितता असे म्हणतात.
१. सुरक्षा यंत्रणेचा उद्देश.
चोरी, दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती, जीवास धोका, मालमत्तेचे नुकसान, वस्तुंचे नुकसान (कार/बाईक) व इतर. आपण एखादी यंत्रणा बसविण्याआधी त्याचा उद्देश काय आहे किंवा त्यातून आपल्याला काय साध्य करायचे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर मराठीतल्या “आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी” या म्हणीसारखी परिस्थिती होते. म्हणजेच आपण पैसे खर्च करूनही आपल्या मनामध्ये जो उद्देश आहे त्यासाठी कुचकामी ठरणारी एखादी यंत्रणा बसवतो. ही वस्तुस्थिती सोसायटीतील लोकांनीच नव्हे तर अगदी इमारतीच्या/प्रकल्पाच्या नियोजनकर्त्यांनीही समजून घेतली पाहिजे.
२. निवासी सोसायटी.
आपण निवासी संकुलावर लक्ष केंद्रित करू कारण व्यावसायिक इमारतींमध्ये वापरकर्ते वेगळे असतात त्यामुळे त्यांच्या उपाययोजनाही वेगळ्या असतील. इथे पहिला उद्देश आहे चोरी रोखणे, आपल्या मौल्यवान वस्तुंचे संरक्षण करणे व रहिवाशांच्या जीवाचे व त्यानंतर आपल्या मौल्यवान वस्तुंचे संरक्षण करणे.
३. प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुधारणात्मक उपाययोजना.
सुरक्षा ही दोन प्रकारची असते, एक दुर्घटनेच्या आधीची व एक नंतरची. याचाच अर्थ असा होतो की आपण जशी एखादा आजार होऊ नये यासाठी लस घेतो, लसीमुळे आपल्याला कधीही संसर्ग होणार नाही याची खात्री केली जात नाही तर त्यामुळे त्या आजाराविरुद्ध आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते व जर आपल्याला तो आजार झाला तर आपल्याला आवश्यक ती औषधे घ्यावीच लागतात. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या उपाययोजना चोरीविरुद्ध एखाद्या लसीप्रमाणे असतात व त्याला प्रतिबंधात्मक उपाय असे म्हणतात, परंतु तरीही चोरी झाली तर आपण त्यासाठी नंतर काही उपाययोजना करू शकतो.
४. प्रतिबंधात्मक उपाययोजना.
सोसायटीचा आराखडा व नियोजनाचा अभ्यास करा. तुमचा जो उद्देश आहे त्या अनुषंगाने असलेल्या त्रुटींची नोंद करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही वाईट घटना टाळण्यासाठी व वाईट लोकांना त्यांची गाठ कुणाशी आहे हे समजण्यासाठी, सोसायटीने घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांना समजल्या पाहिजेत, कारण त्यामुळे गुन्हेगारांच्या मनामध्ये दहशत निर्माण होते. कोणतीही चोरी किंवा घरफोडी यासारखे गुन्हे योगायोगाने किंवा अपघाताने घडत नाहीत. त्या ठिकाणी चोराने त्याचा जीव पणाला लावलेला असतो व तो रिकाम्या हाताने परतू शकत नाही. तो किंवा ती (टोळी) सामान्यपणे लक्ष्याचा म्हणजे तुमच्या घराचा किंवा सोसायटीचा अभ्यास करतात व ते सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वात कमकुवत असलेल्यावर घाव घालतात. सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजना ठळक अक्षरात दिसतील अशा जागी लावा. ज्याप्रमाणे एखाद्या बंगल्यावरची “कुत्र्यांपासून सावध राहा” ची पाटी तुम्हाला बंगल्यामध्ये शिरताना अधिक सावध करते, त्याचप्रमाणे तुम्हीही बेसावध नाही याची चोराला जाणीव करून देण्यासाठी सुरक्षिततेच्या कोणत्या उपायोजना आहेत हे पुरेसे दिसेल अशाप्रकारे लावा. दुर्दैवाने, वर उल्लेख केलेल्या सोसायटीमध्ये जिथे साखळी खेचण्याची घटना घडली तिथे सीसीटीव्ही होता परंतु तो आहे असे दाखवणारी पाटी नव्हती.
प्रवेशाच्या व बाहेर पडण्याच्या ठिकाणी व्यवस्थित तपासणी झाली पाहिजे. प्रत्येक प्रवेश व बाहेर पडण्याची तपासणी झाली पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे योग्य सुरक्षा कर्मचारी असले पाहिजेत तसेच त्यांच्याकडे शिट्टी, काठी, टॉर्च इत्यादी सामग्री असली पाहिजे. बहुतेक सोसायट्यांमधील हा सर्वात कमकुवत दुवा आहे विशेषतः एकेकट्या इमारतींमधील. तुम्ही जर पैसे वाचवण्यासाठी एखाद्या सुरक्षा रक्षकाला कमी पैशांवर ठेवले तर तो त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याचवेळी आणखी एखादी नोकरीही शोधेल (आयटीतील लोकांच्या मून वॉकिंगसारखी) ज्यामुळे सुरक्षा लक्षक म्हणून काम करताना तो कमी सावध असेल. दुसरे म्हणजे, जेव्हा गरज पडेल तेव्हा तो त्याचा जीव धोक्यात घालणार नाही, म्हणजे चोरांना किंवा गुंडांना तोंड देण्यासाठी. त्यामुळेच नेहमीच योग्य क्वालिटीची सुरक्षा सेवाच घ्या.एकच प्रवेश व एकच बाहेर जाण्याचा मार्ग ठेवा. नियोजनामध्ये हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण त्यामुळे सुरक्षा संघ आवारामध्ये कुणी प्रवेश केला व कोण बाहेर पडले यावर व्यवस्थित लक्ष ठेवू शकतात, ज्या अनेक इमारतींमध्ये विशेषतः ज्या प्रकल्पांमध्ये इमारतींची संख्या जास्त आहे तिथे पालन केले जात नाही, त्यांना केवळ त्यांच्या इमारतीपाशी किंवा विंगपाशी सोयीचा होईल असा प्रवेशाचा व बाहेर पडण्याचा मार्ग हवा असतो.
कुंपणाच्या भिंतींवर व प्रत्येक इमारतीच्या सुरक्षित प्रवेशावर खर्च करा. बांधकाम व्यावसायिकाने तुम्हाला सुरक्षित व व्यवस्थित कुंपणाची भिंत दिली नसली तरीही सोसायटी तिची उंची वाढवू शकते, कारण चोराला ती एखाद्या अडथळ्यासारखी वाटली पाहिजे.अधिकृत/वैध रहिवाशांनाच मुक्त प्रवेश हवा. कोणत्याही इमारतीमध्ये त्यातील खऱ्या रहिवाशांना किंवा वापरकर्त्यांनाच मुक्त प्रवेश हवा व तो देखील कार्ड किंवा काही ओळख देऊन देण्यात यावा.सर्व आगंतुकांची प्रवेशापाशी तपासणी केली जावी. हे अनेक लोकांना अतिशय वैतागवाणे किंवा गैरसोयीचे किंवा अपमानास्पद वाटते परंतु याच लोकांची मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये तपासून घ्यायला काही हरकत नसते. सुरक्षितता ही भावनांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे हे आधी आपण स्वीकारले पाहिजे, तरच ती परिणामकारक होऊ शकेल.
प्रत्येक लॉबीमध्ये व प्रवेशापाशी आणीबाणीतील संपर्क क्रमांकांची पाटी असावी. स्थानिक पोलीस व असे सर्व आवश्यक क्रमांक ठळक अक्षरात लॉबीमध्ये तसेच सुरक्षा रक्षकाजवळही लावलेले असावेत. तसेच सुरक्षा रक्षकाचा कक्ष शौचालयापासून जवळ असावा म्हणजे तो तिकडे गेला असल्यास त्या वेळेतही प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकाविना नसावे व ते त्याच्या डोळ्यासमोर राहावे.
५. सुरक्षित प्रवेश लॉबी.
प्रत्येक इमारतीच्या प्रवेशासाठी एमएस ग्रील लावलेली प्रवेश लॉबी व हाताने लावता येईल अशा कुलुपाची व्यवस्था ही सर्वोत्तम व मूलभूत गोष्ट आहे. तुम्ही रात्री उशीरा कुलुप लावू शकता व रात्री उशीरा येणाऱ्या व्यक्तींसाठी त्याच्या किल्ल्या प्रत्येक सदनिकाधारकाला दिल्या जाऊ शकतात.
अंगठ्याच्या ठशाने उघडणारी यंत्रणा. हे कुलुप केवळ अधिकृत रहिवाशांच्या अंगठ्याच्या ठशानेच उघडते. परंतु समस्या अशी आहे की त्यामध्ये वृद्ध व्यक्तींच्या बोटाचा ठसा नीट उमटत नाही.
इंटरकॉमद्वारे खात्री करून प्रवेश. सर्वोत्तम व सर्वात परिणामकारक, इमारतीच्या आवारामध्ये येणाऱ्या कुणाही आगंतुकाला सुरक्षा रक्षकाने संबंधित सदनिका धारकाकडून इंटरकॉमवरून कॉल करून खात्री करून घेतल्यानंतरच प्रवेश दिला जातो. यासाठी थोडासा वेळ लागतो परंतु ही अतिशय प्रभावी यंत्रणा आहे.
प्रवेश ओळख पत्राद्वारे प्रवेश. पंचतारांकित हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणे सर्व रहिवाशांकडे त्यांचे मॅग्नेटिक कार्ड असते ज्याद्वारे त्यांना त्यांच्या इमारतीच्या लॉबीचा दरवाजा उघडता येतो.
सुरक्षा रक्षकासाठी आपत्कालीन परिस्थिती वाजवायचा गजर. सुरक्षा रक्षकाच्या जवळ आपत्कालीन परिस्थितीमध्ये वाजवायच्या गजराचे एक बटण असले पाहिजे, जेणेकरून अशी कोणतीही परिस्थिती आल्यास तो एका झटक्यात सोसायटीला इशारा देऊ शकतो.
आणखी एक गोष्ट म्हणजे, सोसायटीने सुरक्षा रक्षकाला एक स्वतंत्र मोबाईल त्यामध्ये सिमकार्ड घालून द्यावे, मग ते अगदी साधे मॉडेल असले तरी चालेल. या मोबाईलमध्ये सोसायटीतील महत्त्वाच्या व्यक्तींचे क्रमांक घातलेले असतील, म्हणजे त्यांना सुरक्षा रक्षकाशी संवाद साधण्यास मदत होईल.
६. मालमत्तेची म्हणजेच वाहनांची सुरक्षितता.
सोसायटीद्वारे जॅमर. दीर्घकाळ बाहेरगावी जाताना सोसायटी वाहनांना त्यांची कुलुपे लावू शकते व सदस्य अतिरिक्त सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीसांच्या जॅमरप्रमाणे ती लॉक करू शकतात.
सोसायटीचे स्टिकर. प्रत्येक वाहनावर सोसायटीने दिलेले स्टिकर असले पाहिजेत, शक्य असल्यास त्या स्टिकरवर बारकोडही असावेत.
सर्व वाहनांमध्ये चोरीस-प्रतिबंध करणारे गजरही बसवले जावे म्हणजे चुकीच्या किल्लीने किंवा बळजबरीने एखादे वाहन उघडण्याचा किंवा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास समजू शकेल.
विशेषतः कारसाठी तिचा मागोवा घेणारी साधने अत्यावश्यक असतात. तसेच तुम्ही आता तुमच्या दुचाकींवरही ती आता लावून घेऊ शकता. त्याचप्रमाणे वाहनतळाच्या जागी या सर्व बाबी ठळक अक्षरात प्रदर्शित करण्यात याव्यात.
७. सुधारणात्मक उपाययोजना.
सीसीटीव्हीची सोय आजकाल सगळीकडेच असते परंतु कुणीही त्यातील दृश्ये किती परिणामकारक आहेत हे तपासण्याची तसदी घेत नाही. चांगल्या दर्जाचे रात्रीचीही दृश्ये व्यवस्थित दिसतील असे कॅमेरे व नियमितपणे देखभाल व यंत्रणेचे निकाल ही इथे चिंतेची बाब आहे.
प्रवेश/बाहेर पडण्याची योग्यप्रकारे व जाणीवपूर्वक केलेली नोंद आवश्यक आहे व शक्य असल्यास, ती सोसायटी कार्यालयाच्या संगणकावर करा. त्याचवेळी घरकामाच्या बायका/वाहन चालक/आगंतुक या सगळ्यांची माहिती तसेच स्थानिक पोलीसांकडून घेतेले चारित्र्य प्रमाणपत्र सांभाळून ठेवा.
 ८. रहिवाशांचा वैयक्तिक दृष्टिकोन
एखादी आपत्ती आल्यास सर्व रहिवाशांची तपशीलवार माहिती हा अतिशय महत्त्वाचा डेटा आहे व तो सोसायटीच्या संगणकांमध्ये संग्रहित करून ठेवला पाहिजे. जर सोसायटी लहान असेल तर आपण समितीच्या सदस्यांचा किंवा कार्यालयीन पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पीसीचा/लॅपटॉपचाही यासाठी वापर करू शकतो.
नियमितपणे येणाऱ्या बाहेरील व्यक्ती, घरकाम करणाऱ्या बायका, वाहनचालक व स्थानिक पोलीसांकडून घेण्यात आलेले त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र, ही प्रत्येक सदनिकाधारकाची जबाबदारी आहे.
तुमच्या शेजाऱ्यांविषयी माहिती असू द्या व आजूबाजूला कोणतीही अनियमित हालचाल होत असेल उदाहरणार्थ एखादी संशयास्पद व्यक्ती, सदनिकेचा दरवाजा तुटलेला किंवा उघडा असेल तर त्यावर लक्ष ठेवा. लहान गोष्टींमुळेही बराच फरक पडतो उदाहरणार्थ, रात्री येणाऱ्या आगंतुकांसाठी तुमच्या प्रवेशद्वाराबाहेर दिवा बसवून घ्या व त्याचे बटण घरात सदनिकेमध्ये ठेवा म्हणजे जर लॉबीतील दिवे बंद असतील तरीसुद्धा रात्री मुख्य दरवाजापाशी कोण उभे आहे हे तुम्हाला तपासता येईल. त्याचप्रमाणे दुहेरी कडी/कोयंडा असलेले सुरक्षा/सुरक्षितता प्रवेशद्वार लावा म्हणजे तुम्हाला कुणीही आतून लॉक करू शकणार नाही. शौचालयाच्या खिडक्यांना एमएस सुरक्षा ग्रिल असणे व ग्रिलचे डिझाईन योग्य असणे महत्त्वाचे आहे. तसेच ते मजबूतपणे उभे राहतील व सहजपणे हलवता येणार नाहीत अशाप्रकारे बसवले पाहिजेत.
ठराविक काळाने सुरक्षा यंत्रणेची उलट तपासणी करणेही आवश्यक आहे व त्यासाठी सर्वसाधारण सभेची बैठक घेऊन एक समिती स्थापन करा व त्यांना पुरेसे अधिकार द्या.
९. सुरक्षा यंत्रणेसाठी निधी
दोन प्रकारचे खर्च असतात, एक म्हणजे एकदाचं केला जाणारा व दुसरा म्हणजे नियमितपणे करावा लागणारा. एकदा करावा लागणारा खर्च म्हणजे बांधकाम व सीसीटीव्हीसारख्या यंत्रणांचा व तत्सम खर्च. नियमितपणे करावा लागणारा खर्च म्हणजे या सर्व यंत्रणांच्या देखभालीसाठी व तुम्ही नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षक वगैरे कर्मचाऱ्यांसाठीचा मासिक खर्च. तुम्ही नेहमी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता, तसेच त्यांच्याकडून सुरक्षेचे लेखापरीक्षण करून घेऊ शकता व अगदी स्थानिक पोलीसांकडूनही मदत घेऊ शकता.
१०. मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे सुरक्षा हा एक दृष्टिकोन आहे व तो सतत बदलत जातो व तुम्ही एखाद्या चोरासाठी किंवा घरफोडी करणाऱ्यासाठी तुमच्या घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये घुसणे किती अवघड करता हे तुमच्या दृष्टिकोनावरच अवलंबून असेल; एवढे सांगून मी तुमचे आभार मानतो व हे सादरीकरण संपवतो!

या सादरीकरणाची ध्वनीचित्रफित तुम्ही यूट्यूबच्या खाली दिलेल्या दुव्यावर पाहू शकता व इतरांना जाणीव करून देण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी कृपया तो आवर्जून शेअर करा…

https://www.youtube.com/watch?v=6aj3AAD1lmA&t=1s

संजय देशपांडे 
www.sanjeevanideve.com




Friday, 7 February 2025

ग्रासलँड्स, तरस, लांडगे आणि निसर्गाचा लढा !



































ग्रासलँड्स, तरस, लांडगे आणि निसर्गाचा लढा !

जेव्हा मानवता जंगलाविरुद्धचे युद्ध जिंकेल, तेव्हा तो विजय मानवतेचा सर्वात मोठा पराभव असेल!”―…  मेहमत मूरत इल्दान
मेहमत हे महान तुर्की नाटककार, कादंबरीकार व विचारवंत आहेत व त्यांच्या या विचारधनामुळे मला अलिकडचे अनेक लेख लिहीताना खुप मदत झाली आहे, विशेषतः जेव्हा विषय जंगल किंवा एकूणच निसर्ग व त्याचा माणसांसोबत म्हणजे आपल्यासोबत टिकून राहण्यासाठीचा संघर्ष असा असतो! खरेतर मेहमतसारख्या अनेक विचारवंताचे लेखन वाचल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आहे जे त्यांनी वरील अवतरणामध्ये समजून सांगितले आहे. जंगलांची माणसांविरुद्धची लढाई किंवा संघर्ष कायम सुरू असला तरीही या लढाईमध्ये माणसे कधीही जिंकणार नाहीत. कारण ज्यादिवशी आपण शेवटचे झाड तोडू किंवा गवताचे शेवटचे पाते कापू, आपले आयुष्य केवळ काळे व पांढरे उरेल, किंबहुना केवळ काळेच उरेल, असे असले तरीही माणूस हा लढा कधीही सोडून देत नाही ही खरी समस्या आहे! म्हणूनच माझ्या अशा लेखांचा एकमेव उद्देश असतो, कुणीतरी, कुठेतरी हे वाचून समजून घेईल व जंगलांविरुद्धचा संघर्ष थांबवण्याच्या लढ्यात  सहभागी होईल, परंतु आत्तापर्यंत तरी अशा लोकांची संख्या अतिशय कमी आहे, त्यामुळे असो, मेहमत यांचे आभार मानू!

तर आता तुम्हाला तत्वज्ञानाचे हे डोस खूप जास्त झाले असतील तर, तुमच्यासाठी एक छान, उत्तम, भारी, आश्चर्यकारक बातमी आहे (म्हणजे थोडी वेगळी सुरुवात आहे) व ती जंगलांविषयी आहे जी तुम्हाला गवताळ कुरणांच्या स्वरूपात भेट देतात व ती आपल्या काँक्रिटच्या जंगलापासून म्हणजे पुण्यापासून जेमतेम १०० किलोमीटर लांब आहेत (रस्त्यावर वाहतुकीची कोंडी असल्यामुळे अगदी १०० किलोमीटरही १००० किलोमीटर असल्यासारखे वाटतात, उपरोधिकपणासाठी माफ करा) व यासाठी वन विभागाचे आभार मानलेच पाहिजेत की सीसीएफ एन. आर. प्रवीण, डीसीएफ महादेव मोहिते, आरएफओ सूर्यवंशी व गार्ड गणेश बागडे (वन विभागातून), आणि राजू पवार यांच्यासारख्या स्थानिकांनी जंगलाशीच हातमिळवणी करून त्याच्याविरुद्धची लढाई चक्क जिंकली आहे व त्याचा परिणाम अतिशय आश्चर्यकारक आहे. खरंतर पहिल्या नजरेत येथे तुम्हाला सगळीकडे फक्त पिवळे काळे वाळलेले गवत, काटेरी झुडुपे, मोठे-मोठे दगड असलेल्या निषपाणं  टेकड्या व या पार्श्वभूमीवर काही जंगली कडुनिंबाची झाडे दिसतात. तुम्ही पहाटे ३ वाजता उठून, छान मऊ उबदार अंथरूण सोडून, १०० किलोमीटरचा प्रवास करून इथे का आलात असा प्रश्न स्वतःलाच पडतो. मात्र आकाशामध्ये सूर्य उगवताच, तुम्हाला काळे व करडे पट्टेरी काहीतरी विचित्र प्रकारे चालताना दिसते, दूरवर कुठेतरी लांडग्यांची कुईकुई सुरू होते व तुम्हाला निरभ्र निळ्या आकाशात पंख पसरून मुक्तपणे विहार करणारे शिकारी पक्षी दिसू लागतात. पुण्याच्या गवताळ पट्ट्यांमध्ये तुमचे स्वागत आहे, असे वैशिष्ट्यपूर्ण भूदृश्य असलेला अधिवास महाराष्ट्रातील इतर जंगलांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. इथे तुम्हाला तरस, लांडगा, कोल्हा, चिंकारा असे प्राणी व अनेक पक्षी पाहायला मिळतात. इथल्या तरसाच्या कुटुंबाचेच उदाहरण घ्या, माझ्या ३० वर्षांपेक्षाही अधिक वन्यजीवनात, मला हा प्राण्याची जेमतेम एकदा किंवा दोनदा भेट झाली ती सुद्धा ओझरती. परंतु इथे कडबनवाडीमध्ये मला त्यांची निवांतपणे छायाचित्रे काढता आली, कारण त्यांचीही त्यासाठी मानसिक तयारी होती, हे दृश्य दुर्मिळ होते व तुम्हाला अजूनही अशा बऱ्याचशा गोष्टी येथे पाहायला मिळतील!!

हे सर्व काही दिवसात किंवा महिन्यात किंवा वर्षांमध्ये झाले नसले तरीही हा जवळपास सातत्याने एक दशकभर केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे त्यामुळे हे गवताळ प्रदेश केवळ टिकूनच राहिलेले नाही तर समृद्धही होत आहे. हा संपूर्ण परिसर पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेपासून ते पूर्वेला शेकडो किलोमीटर परिसरात पसरलेला आहे, जे कमी पर्जन्य छायेचे क्षेत्र आहे व खरेतर म्हणूनच येथील जीवसृष्टी, झाडे-झुडुपे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. असे तर मी जवळपास दीड दशकभरापासून या गवताळ कुरणांना भेट देत आलोय जेव्हा ती अस्तित्वात आहेत हे किंवा त्याचे महत्त्व फारसे कुणाला माहितीही नव्हते. परंतु कोव्हिडनंतर पर्यटनावर झालेल्या परिणामामुळे (चांगल्या अर्थाने) व या गवताळ पट्ट्यांमध्ये खऱ्या अर्थाने रस असलेल्या काही अधिकाऱ्यांमुळे हे पट्टे येथील वन्यजीवांना आवडू लागले आहे व त्यामुळे ते वन्यप्रेमींच्याही आवडीचे झाले आहेत. सकाळी जेव्हा मी इंदापूरच्या बाजूने कडबनवाडीच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो (बारामतीच्या बाजूने म्हणजे शिरसुफळ येथे दुसरे प्रवेशद्वार आहे), तेव्हा प्रवेशद्वारावर एसयूव्हीच्या (या रस्त्यांवर सामान्य गाड्या चालू शकत नाहीत) रांग पाहून खुप छान वाटले व प्रवेश तिकीटांची पूर्णपणे विक्री झाली होती. नंतर आम्ही एका पाणवठ्यावर वाट पाहात असताना, छायाचित्रकार त्यांच्या टेलिफोटो लेन्स रोखून बसलेले पाहून समाधान वाटले कारण हे दृश्य अगदी ताडोबा किंवा कान्हामधल्यासारखे वाटावे असे होते. या गवताळपट्ट्यांमध्ये आत्तापर्यंत याचीच कमतरता होती व यामुळेच त्यांचे संवर्धन अधिक चांगल्याप्रकारे होईल असे मला वाटले!

आधीसुद्धा तरस, लांडगे, खोकड, कोल्हे, चिंकारा तसेच अनेक शिकारी पक्षी जे तुम्हाला केवळ या अधिवासांमध्येच पाहता येतील ते इथले निवासी होतेच पण या भागात माणसांची सतत वर्दळ असल्यामुळे हे प्राणी लपून रहात. यापैकी बहुतेक प्राणी लाजाळू व निशाचर असतात (केवळ किंवा बहुतेकवेळा अंधारात किंवा रात्रीच फिरतात) त्यामुळे त्यांचे दिसणे नेहमीच दुर्मिळ असते परंतु आता सफारीची योग्य व्यवस्था असल्यामुळे, मार्ग आखून दिलेले असल्यामुळे तसेच या भागातील बऱ्याचशा पट्ट्यामध्ये माणसांना ये-जा करण्यास मनाई असल्यामुळे, हळूहळू प्राणी सरावताहेत व म्हणूनच मला तरसाची छायाचित्रे काढता आली, जी मी कधी काढू शकेन असा विचारही केला नव्हता! या गवताळ पट्ट्यांच्या आत व भोवताली होणारी खाजगी शेती ही एकप्रकारे वरदान असली तरीही एकप्रकारे शापसुद्धा आहे. वरदान यासाठी की जेव्हा उन्हाळ्यात गवत वाळते तेव्हा हिरव्या पिकामध्ये लांगडे व खोकड विश्रांती घेतात व या आसऱ्याचा वापर त्यांनी प्रजननासाठी केला. त्याचप्रमाणे चिंकारा उन्हाळा असेल किंवा भोवताली रखरखीत असेल तेव्हा हिरवी पाने खातात कारण हा भाग पर्जन्य छायेच्या क्षेत्रात येतो व यापैकी कोणतेही प्राणी केवळ तुम्ही कृत्रिम पाणवठे तयार केले म्हणून राहात नाहीत. त्याचवेळी, हा शाप आहे कारण या शेतजमीनी खाजगी आहेत व इथे माणसांची नेहमीच वर्दळ असते ज्यामुळे प्राण्यांना अडथळा येतो व ते पर्यटकांसाठी चांगले नाही. त्याचप्रमाणे इथल्या सीमा आखून घेतलेल्या नसल्यामुळे मालकी हक्कासाठी खाजगी शेतमालक व वनविभागामध्ये हमरातुमरी सुरू असते, ही आणखी एक समस्या आहे. मला असे वाटते आपण ज्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्पामध्ये केले त्याचप्रमाणे या जमीनी अधिग्रहित करणे हा एकमेव उपाय असेल व त्यासाठी हे गवताळ पट्टे लांडग्यांचा प्रकल्प म्हणून घोषित करा. यात अडचण अशी आहे की विदर्भातील शेतकऱ्यांच्या उलट येथील शेतकरी सधन आहे व अतिशय सबळ राजकीय पाठिंबा असलेला आहे, त्यामुळे त्यांना समजवणे व त्यांना या गवताळ पट्ट्यांमधून हलवणे हे सोपे काम नाही, परंतु म्हणूनच सरकारने असे कठोर निर्णय घेणे अपेक्षित असते, बरोबर? या गवताळ पट्ट्यातील प्राण्यांना त्यांची जागा हवी आहे कारण ते इथे शेकडो वर्षांपासून आहेत आणि ते इतर कुठेही जगू शकत नाहीत, हे घर त्यांचेच आहे! 

या गवताळ पट्ट्यांमधील आणखी एक पैलू ज्यासंदर्भात अलिकडेच वन विभागाने सकारात्मकपणे केलेली अतिशय लक्षणीय कृती म्हणजे, वनजीवनाविषयी स्थानिकांना जागरुक करणे, हे सूत्र ताडोबामध्ये यशस्वी ठरले कारण एकदा स्थानिक वन्यजीवनावर प्रेम करू लागल्यावर, निम्मी लढाई तिथेच जिंकली जाते. म्हणूनच, पुढचे पाऊल म्हणजे इथल्या वन्य पर्यटनामध्ये व्यावसायिकता आणणे ज्यामध्ये योग्य वाहनांचा समावेश होतो (उदाहरणार्थ जिप्सी) कारण सुदैवाने इथे वाघासारखे मोठे हिंस्र प्राणी नसल्याने सुरक्षितता हा काही फार मोठा मुद्दा नाही व आपण थोडेफार प्रयोग करून पाहू शकतो. त्याचवेळी येथील सफारीचा मार्ग व वेळा वाढवा कारण जेव्हा एखादी व्यक्ती प्रवास करून इथे येण्यासाठी वेळ व पैसा खर्च करते तेव्हा तिला काही वेळ जंगलामध्ये घालवता आला पाहिजे तरच तिला जो काही पैसा तिने खर्च केला आहे त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे निवासाचा, मी वर नमूद केलेले सर्व सस्तन प्राणी तुम्हाला सकाळी भल्या पहाटे व संध्याकाळी उशीरा पाहायला मिळतात, त्यामुळे तिथे राहण्यासाठी चांगली व्यवस्था हवी, जी सध्या दिसत नाही. आपण गवताळ पट्ट्यांच्या भोवती असलेल्या खाजगी जमीनी खरेतर रिसॉर्ट किंवा घरगुती निवासव्यवस्थेसाठी वापरू शकतो व वन विभाग त्यावर काम करत आहे!

अलिकडेच अशा आडबाजूच्या पण निसर्गरम्य ठिकाणी लग्नसोहळे आयोजित केले जात असल्याची व लोक हे लग्न सोहळे व कार्यक्रमांवर लक्षवधी रुपये खर्च करत असल्याची बातमी माझ्या वाचण्यात आली, हे गवताळ पट्टे कार्यक्रम, संमेलने, सोहळे व कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी अतिय उत्तम स्थळ होऊ शकतात अर्थात कुठेही वन्यजीवनाला कुठल्याही प्रकाराचा त्रास न होता!

 वन्यजीवन म्हणजे केवळ वाघ व हत्ती नव्हेत, त्याचा अर्थ तुमच्याभोवती असलेल्या जैवविविधतेचा आनंद घेता येणे. फक्त कल्पना करा, तुम्ही खुल्या आकाशाखाली बसलेला आहात, थंड वाऱ्याची झुळुक तुम्हाला स्पर्श करतेय, आकाश स्वच्छ आहे व तारे चमकत आहेत, भोवताली अंधार आहे कारण तुमची शहरी नजर कधीच मिट्ट काळोखाला सरावलेली नाही व लांबवर लांडग्यांच्या कळपाची आरोळी ऐकू येतेय व त्याच्या जोडीला रातकिड्यांचे पार्श्वसंगीत आहे व तसेच सोबत तरसांचे भयाण हास्यही आहे; लोकहो फक्त विचार करा, तुमच्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव असेल. यामुळे गवताळ पट्ट्यांमधील पर्यटनाला तसेच संपूर्ण वन्यजीवनाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. अर्थात हे सगळे तिथल्या अधिवासाचा समतोल बिघडू न देता करायचे आहे व सहजीवन यालाच म्हणतात, एवढे बोलून निरोप घेतो!

खाली दिलेल्या दुव्यावर गवताळ पट्ट्याची डादू थोडी आणखी अनुभवा व आवर्जुन शेअर करा...

https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720323118163/

संजय देशपांडे 

www.sanjeevanideve.com  / www.junglebelles.in