Wednesday, 13 December 2023



7/11/23, अशक्य ते शक्य, आणि ग्लेन मॅक्सवेल !









7/11/23, अशक्य ते शक्य, आणि ग्लेन मॅक्सवेल !


“तुमचा स्वतःवर संपुर्ण विश्वास असल्याशिवाय तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकत नाही”…

    हे काही कुणा मोठ्या व्यक्तीचे अवतरण नाही,मी 7/11/23 रोजी पुरुषांच्या आयसीसी मर्यादीत षटकांच्या विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला खेळताना पाहिल्यावर मला हे जाणवले. साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडूंच्या दृष्टिकोनाविषयी मी माझ्या लेखाची सुरुवात करणार तेवढ्यात ग्लेनच्या खेळामुळे,भारतीय संघाविषयीचा लेख मागे पडला व मी त्याच्याविषयी लिहायला सुरुवात केली, इतकी त्याची खेळी जबरदस्त होती. मला खात्री आहे की त्याचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण ऑस्ट्रेलिया देश त्या डावामध्ये साधारण दोन तास पूर्णपणे थांबला असावा. क्रिकेटप्रेमी नसलेल्या सर्वांसाठी (असे अनेक आहेत),सध्या भारतामध्ये पुरुषांची आयसीसी (ज्याप्रमाणे ऑलिम्पिकसाठी आयओसी किंवा फुटबॉलसाठी फिफा आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या प्रशासनासाठी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे) विश्वचषक स्पर्धा सुरू आहे व सध्या आपला संघ गुणतालिकेमध्ये सर्वोच्च स्थानी आहे व ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, या दोन्ही संघांचे उपांत्यफेरीतील स्थान निश्चित आहे. सर्वप्रथम, मला सर्व वाचकांना सांगावेसे वाटते ( विशेषतः ज्यांना क्रिकेट आवडत नाही व या खेळाचा उदो उदो केलेलाही ज्यांना आवडत नाही) की मला क्रिकेट आवडते परंतु त्याहीपेक्षा मला प्रत्येक मैदानी खेळ आवडतो किंवा खेळामध्ये होणारा शारीरिक व्यायाम आवडतो (बुद्धिबळाविषयी पूर्णपणे आदर आहे). मॅक्सवेलच्या खेळाविषयीचा हा लेख केवळ क्रिकेटचे चाहते किंवा क्रिकेट प्रेमींसाठी नाही तर प्रत्येक क्रिडाप्रेमीसाठी आहे व प्रत्येकाने एखादा खेळ का खेळला पाहिजे याविषयी आहे. त्यामुळे या खेळातून आपल्याला  जो काही धडा मिळाला आहे किंवा आपण धडा घेतला आहे यावरून त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी खुल्या मनाने वाचा. आत्तापर्यंत माध्यमांनी मॅक्सवेलचे व त्याच्या विक्रमी खेळीचे भरभरून कौतुक केले आहे. परंतु एक व्यक्ती म्हणून मला त्यातून काय मिळाले आहे हे मला इथे सांगायचे आहे.

    मला असे वाटते की क्रिकेटप्रेमी नसलेल्यांनाही हा खेळ समजतो कारण तो एवढा अवघड नाही व आपल्यापैकी बहुतेकजण (भारतीय) आयुष्यात कधी ना कधी क्रिकेट खेळले असतात. त्यामुळे मी खेळाचे नियम किंवा तपशील समजून सांगण्यात वेळ वाया घालवणार नाही. परंतु अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर धावांचे माफक उद्दिष्ट ठेवले होते. जवळपास दोन तृतीयांश ऑस्ट्रेलियन संघ एक तृतीयांश धावांमध्येच गारद झाला होता. म्हणजे जेमतेम ९० धावांवर ७ गडी बाद अशी अवस्था होती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून २०१ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियन संघाच्या कट्टर समर्थकांनाही जिंकण्याची कोणतीही आशा वाटत नव्हती व अशा परिस्थितीतही ऑस्ट्रेलियन संघ हा सामना तीन गडी राखून जिंकला. अशा वेळी मॅक्सवेलने केवळ १२८ चेंडूंमध्ये २०१ धावा केल्या (दुहेरी शतक) व लक्ष्य साध्य केले. हे आकडे सांख्यिकी तज्ञांना त्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी कदाचित पुरेसे असतील, परंतु हे कसे साध्य झाले यातून प्रत्येक खेळाडूला तसेच माणसाने शिकण्यासारखे आहे. मॅक्सवेल जेव्हा खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा आधीच त्याच्या संघाने तीन किंवा चार गडी गमावले होते, आवश्यक असलेली धाव संख्या वाढत चालली होती व मोठे उद्दिष्ट गाठायचे होते. त्यानंतरही दोन गडी बाद झाले व मॅक्सवेलच्या जोडीला केवळ गोलंदाज उरले होते. हा सामना मुंबईमध्ये होता, त्यामुळे हवामान अत्यंत दमट होते व हवेतील प्रदूषणाची पातळीही अतिशय जास्त होती. मॅक्सवेलला त्याच्या देशामध्ये ज्या वातावरणाची सवय आहे त्यापेक्षा निश्चितच या दोन्ही गोष्टीही त्याच्या विरोधात जाणाऱ्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाला मात्र या हवामानाची सवय होती, किंबहुना अफगाणिस्तानमध्ये यापेक्षाही खराब हवामान असते, त्यामुळे हवामानाच्या बाबतीतही त्यांचे पारडे जड होते. 

आता, त्यावेळी परिस्थिती कशी होती हे मी तुम्हाला समजून सांगितले आहे, मॅक्सवेलच्या खेळीतून मी जे काही शिकलो ते येथे देत आहे …

१. मॅक्सवेलला  झेल सुटल्यामुळे दोन किंवा तीन वेळा जीवदान मिळाले व त्याच्या डावाच्या सुरुवातीलाच एक एलबीडब्ल्यूचे अपील करण्यात आले होते ते देखील फेटाळले गेले. परंतु त्यानंतर त्याचे लक्ष खेळावर अधिक केंद्रित झाले कारण शेवटचा झेल सुटल्यानंतर, त्याने अफगाणिस्तान संघाला एकही संधी दिली नाही. आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर आपण सगळे नशीबाला दोष देतो, परंतु नशीब तुमचे वा माझे असे काही नसते ते दोन्ही बाजूंवर कृपा करते परंतु जे सक्षम असतात व मिळालेल्या संधीचे सोने करायची ज्यांची तयारी असते तेच शेवटी विजेते होतात, जसा मॅक्सवेल झाला. नशीबाने अफगाणिस्तान संघालाही संधी दिली होती, कारण मॅक्सवेलने चुकीचे फटके लगावले परंतु अफगाणिस्तानने झेल सोडून त्या संधी गमावल्या, तर मॅक्सवेलने त्या संधींचे सोने केले आपण त्याच्याकडून हेच शिकले पाहिजे. आपल्या सगळ्यांनाच संधी मिळते परंतु काही वेळा आपण ती पाहू शकतो व काही वेळा आपण ती पाहू शकत नाही, परंतु त्यामध्ये संधीचा दोष नसतो, तर दोष आपला असतो कारण आपण ती संधी पाहू किंवा अनुभवू शकत नाही. मॅक्सवेलच्या खेळीमुळे मला संधींचे महत्त्व, त्या संधी घेण्याची व त्यांचे सोने करण्याची माझी तयारी याविषयी शिकवले.

 २. मॅक्सवेलच्या पुर्ण शरिरात उष्म्याने  पेटके येत असल्यामुळे वेदना होत होत्या, शरीरातली पाण्याची पातळी कमी झाली होती व तो दमला होता, इतर कोणत्याही वेळी त्याने या वेदनांमुळे सामन्यातून माघार घेण्याचा व त्याची शक्ती पुढील खेळासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला असता. परंतु तो बाद झाल्यास संघामध्ये आणखी चांगला खेळाडू नाही, त्यामुळे त्याला पुढाकार घेऊन, टिकून राहणे आवश्यक आहे हे त्याला माहिती होते, जे त्याने करून दाखवले. आयुष्यातही तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला इतर कुणातरी तुमच्यासाठी करेल अशी वाट न पाहता, आपणहून पुढाकार व जबाबदारी घ्यावी लागते, विजेते व इतरांमध्ये नेमका हाच फरक असतो !

३. तुमच्या वेदनेला आणि दमछाकीलापण  तुमची ताकद बनवा, त्यासाठी रडत बसू नका. मॅक्सवेलला वेदना होत होत्या व त्याने खेळताना त्याला त्रास होतोय हे लपवले नाही, तर त्याने त्याचा वापर साधन म्हणून केला. त्या माध्यमातून त्याने त्याची ताकद दाखवून दिली. त्याने तो जे फटके मारू शकतो त्यावर लक्ष केंद्रित केले, इजेमुळे किंवा वेदनेमुळे जे फटके तो खेळू शकत नाही त्याची काळजी तो करत बसला नाही. त्याचवेळी, आपण धावू शकत नाही याची जाणीव झाल्यावर त्याने, एका किंवा दोन धावा घेण्याऐवजी मोक्याच्या चेंडूंवर जोरदार फटके मारून त्याची शक्ती वाचवली. आपण सगळ्यांनी हेच शिकले पाहिजे, आपण नेहमी आपल्यातील कमतरतेला दोष देत बसतो व ते झाकण्याचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेमध्ये, आपण आपल्या बलस्थानांकडे दुर्लक्ष करतो व अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचा जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे वापर करून घेत नाही, मग ते शरीर असो किंवा मन, नेहमी आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा. मॅक्सवेलला वेदना होत असताना व दमलेले असतानाही खेळताना पाहून मी हाच धडा शिकलो.

४. आपल्या प्रतिस्पर्ध्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आपल्या कमजोरीचा वापर करा. मॅक्सवेलने त्याला झालेल्या इजेमुळे होणारा त्रास दाखवल्यामुळे गोलंदाजांनी त्यांची रणनीती बदलली ज्याचा त्यांनी विचार केला नव्हता, त्यांनी चेंडूचा वेग व टप्पा बदलला. यामुळे उलट मॅक्सवेलला त्याच्या बलस्थानांचा वापर करता येईल अशीच गोलंदाजी त्यांच्याकडून झाली.

    मी जॅकी चेनच्या कराटे किड या चित्रपटामध्ये हे पाहिले आहे, जॅकीचा एक वयाने लहान विद्यार्थी मार्शल-आर्टच्या विजेतेपदासाठी लढत असतो व आधीच्या फेऱ्यांमध्ये डाव्या पायाला इजा झाल्यामुळे त्याला अतिशय वेदना होत असते. परंतु जॅकी त्याच्या विद्यार्थ्याला ती वेदना लपवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पायाला झालेल्या इजेमुळे होणारा त्रास प्रतिस्पर्ध्याला दाखवायला सांगतो,ज्यामुळे प्रतिस्पर्धी त्याच्या सर्व हालचाली त्या इजा झालेल्या पायावर केंद्रित करतो व या प्रक्रियेमध्ये त्या विद्यार्थ्याचा जो पाय व्यवस्थित असतो त्याने केल्या जाणाऱ्या हल्ल्याकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो. सरते-शेवटी केवळ एका ठिक असलेल्या पायाचा वापर करून जॅकीचा विद्यार्थी तो सामना जिंकतो. मॅक्सवेलनेही नेमके तेच केले, परंतु अफगाण गोलंदाजांनी, ज्या गोलंदाजीमुळे आधी गडी बाद होत होते तीच पुढे सुरू ठेवण्याऐवजी, मॅक्सवेलला त्याच्या इजेमुळे जी गोलंदाजी खेळणे अवघड जाईल असे त्यांना वाटले ती करत राहिले व इथेच त्यांची मोठी चूक झाली.

५. निर्धार व सामन्यातील शेवटचा चेंडू खेळला जाईपर्यंत हार न मानण्याचा दृष्टिकोन. मॅक्सवेलला जेवढ्या वेदना होत होत्या तेवढे त्याचे लक्ष अधिक केंद्रित व त्याचा निर्धार अधिक दृढ होत होता. आयुष्यात तुम्हाला जो काही त्रास होत आहे त्यामुळे रडत बसण्यापेक्षा तुम्ही असेच असले पाहिजे. यामुळे दोन गोष्टी होतील, तुमचे मन वेदनेवर केंद्रित राहणार नाही व तुम्ही फक्त तुम्हाला कोणते अंतिम उद्दिष्ट गाठायचे आहे याचा विचार कराल.

६. शेवटचा, परंतु तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन, इतक्या निर्धाराने लढत असताना दुसऱ्या बाजूने तुम्हाला मिळणारा पाठिंबा, कारण तुमच्या संघातील इतर खेळाडूंसाठी त्यांचा खेळ अधिक चांगला व्हावा यासाठी ती सगळ्यात मोठी प्रेरणा असते. मॅक्सवेलने दिलेल्या लढ्यामुळे त्यांचा कप्तान, पॅट कमिन्स जो दुसऱ्या बाजूला खेळत होता त्यालाही आपला बळी जाऊ न देता टिकून राहणे भाग पडले. संघातील एका खेळाडूचा निर्धार ठाम असेल आणि तो स्वतः झोकुन  देऊन  खेळत  असेल तर संघातील इतरांवरसुद्धा त्या खेळीचा असा चांगला परिणाम होतो !

७. सरतेशेवटी जेव्हा लक्ष्य साध्य झाले तेव्हा त्याचा आनंद सगळीकडे उड्या मारून व शारीरिक हावभावांनी प्रतिस्पर्ध्यांना चिडवून साजरा करण्यात आला नाही तर अत्यंत संयमी व शांत हास्य देऊन व प्रेक्षकांच्या दिशेने हात उंचावून करण्यात आला ; एक व्यावसायिक विजयी खेळाडू अतिशय कष्टाने मिळलेले यश असेच साजरे करतो. अनेक तरुणांनी यातून धडा घ्यावा जे थोड्याशा यशाने वाहावत जातात व मी इथे एखाद्या विशिष्ट खेळातील एखाद्या विजयाविषयी बोलत नाही तर आयुष्याच्या अनेक आघाड्यांविषयी बोलतोय !

      क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने स्वतः मॅक्सवेलची खेळी त्याने एक दिवसीय खेळामध्ये आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम खेळांपैकी एक होती अशी प्रतिक्रिया दिली आहे व ही प्रतिक्रिया खुद्द सचिनकडून आलेली असल्यामुळे,मॅक्सवेल कसा खेळला याची कल्पना आपण करू शकतो ! अफगाणिस्तानच्या संघानेही अटीतटीची लढत दिली व मॅक्सवेलला त्याचा संघ वाचवण्यासाठी काहीतरी चमत्कार करणेच भाग होते, दोन्ही संघांमधील भौगोलिक, व्यावसायिक तसेच अनुभवाच्या बाबतीत असलेली प्रचंड तफावत विचारात घेता हे देखील अफगाणिस्तान संघाचे यशच म्हणावे लागेल. तेही यातून खेळामध्ये आलेल्या संधीचा वापर कसा करायचा याविषयी धडा शिकले असतील व या सामन्यामुळे त्यांना एक अधिक चांगला संघ होण्यासाठी मदत होईल, एखाद्या खेळाडूची अशी खेळी (तो प्रतिस्पर्धी असला तरीही) तुम्ही हरलात तरीही तुम्हाला अशाप्रकारे शिकवून जाते.

    क्रिकेट नावाच्या खेळामध्ये जबरदस्त जिद्दीचे प्रदर्शन केल्याबद्दल ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स व अफगाण क्रिकेट संघाचे आभार, यामुळे मला जीवनाच्या विषयी माझ्या दृष्टिकोनाचा परत एकदा  आढावा घ्यावसा वाटला . यातून मला आयुष्याने किती संधी दिल्या आहेत व आयुष्याने मला जे दिले नाही त्याबाबत आसवे गाळण्याऐवजी त्या संधींचे सोने केले पाहिजे याची जाणीव झाली, या कृतज्ञतेच्या जाणीवेवरच या लेखाचा समारोप करतो ! 


संजय देशपांडे

smd156812@gmail.com














 







Friday, 8 December 2023





घर घेतांनायोग्य प्लॅनींगचे महत्व !












घर घेतांना, योग्य प्लॅनींगचे महत्व !


मी सहमत आहे मान्य करतो की विचार करणे नियोजन (प्लॅनींग) मोफत आहे. त्यामुळेच कदाचित बहुतेकांना या दोन गोष्टींचे मोल वाटत नाही!” ...  इस्रायलमोअर एइव्हर.

    विचार व नियोजन यावर भर देणाऱ्या सर्वात सुंदर अवतरणांपैकी हे एक आहे व म्हणूनच इस्रायलमोअर हे तरुणांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करणारे प्रशिक्षक, आघाडीचे उद्योजक, लेखक व वक्ता आहेत. ते तरुण नेत्यांना व उद्योजकांमधून स्वयंपूर्ण नेतृत्व, जागतिक सहकार्य करणारे नेते व शाश्वत परिणाम करणारे नेते घडविण्यासाठी अतिशय तळमळीने प्रेरित करतात, प्रशिक्षण देतात व मार्गदर्शन करतात. रिअल इस्टेटसारख्या उद्योगामध्ये बहुतेक गोष्टी देवाच्या कृपेने (उपहास, म्हणजे नशीबाने) होत असतात, म्हणुनच वरील दोन्ही शब्दांचा येथे टेबलाच्या दोन्ही बाजूंकडून म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांकडून व ग्राहकांकडून क्वचितच आदर केला जातो, व तुम्ही ज्याचा आदर करत नाही त्याचे तुम्ही पालन करत नाही हा निसर्गनियम आहे, पुण्याच्या वाहतुकीच्या कोंडीचेच उदाहरण घ्या (हा हा हा,पुन्हा उपहास)! शालजोडीतला मारण्यासाठी असलेला माझा उसना पुणेरीपणा जरा बाजूला ठेवूया, माझ्या उद्योगाविषयी पूर्णपणे आदर राखत,एक व्यक्ती म्हणून तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून सर्वाधिक महत्त्व (म्हणजे आदरनियोजनाला असते विचार केल्याशिवाय तुम्ही नियोजन करू शकत नाही,त्यामुळे विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,किंबहुना रिअल इस्टेटच्या अंतिम उत्पादनाचा म्हणजे घरांचा तोच आत्मा आहे असे मला वाटते (पुन्हा विचार करतोय जाणवतेही!

     आत्तापर्यंत, आपण रिअल इस्टेटशी संबंधित बहुतेक योग्य घटकांविषयी बोललोय. मला मान्य आहे शेवटी तुम्हाला तुमच्या खिशाप्रमाणे तसेच तुमच्या घराबाबतच्या योग्य त्या निकषांप्रमाणे निर्णय घ्यावा लागतो उदाहरणार्थ योग्य जागा, योग्य वेळ व अशा इतरही अनेक गोष्टी असतात. परंतु एका योग्य गोष्टीकडे बांधकाम व्यावसायिकांचे तसेच ग्राहकांचे दुर्लक्ष होते किंवा त्याकडे काणाडोळा केला जातो ते म्हणजे घराचे योग्य नियोजन. बांधकाम व्यावसायिक नियोजनाच्या पैलूकडे दुर्लक्ष करतात कारण एकतर बांधकाम व्यावसायिक स्वतःच योग्य नियोजनाबाबत जागरुक नसतो किंवा नियोजनाच्या मुद्द्याची तो फारशी फिकीर करत नाही कारण बहुतेक ग्राहकच नियोजनाच्या मुद्द्याविषयी अज्ञानी असतात हे त्याला माहिती असते. तुम्हाला एक साधे उदाहरण द्यायचे झाले, तर जगामध्ये आज प्रत्येक उत्पादनाविषयी कितीतरी माहिती उपलब्ध आहे, तरीही दहा ग्राहकांपैकी केवळ एक ग्राहक मला (किंवा माझ्या चमूला) त्यांच्या घराविषयी चौकशी करताना सदनिकेच्या नियोजनाविषयी प्रश्न विचारतात. बहुतेक प्रश्न हे सुविधा, गुणवत्ता (ती देखील वरवरची), कोणते टाईल्स वा फिटिंग वापरले यांच्याविषयी असतात व दरासाठी घासाघीस केली जाते, बस्स. मी व माझ्या चमूने या प्रकल्पाचे नियोजन कसे केले आहे, घरातील खोल्यांचे नियोजन एक विशिष्ट प्रकारे का करण्यात आले आहे, हवा खेळती राहण्याचे काय, खोल्या आतून एकमेकांना कशा जोडलेल्या आहेत, प्रसाधनगृहाचा आकार किंवा खिडक्यांची रचना, सदनिकेमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी करण्यात आलेला विचार व इतरही अनेक गोष्टी असतात. हे झाले सदनिकेच्या आतील बाजूच्या नियोजनाविषयी, सदनिकेच्या बाहेरील बाजूच्या नियोजनाविषयी बोलायचे तर इमारतीच्या दिशेविषयी करण्यात आलेला विचार, तसेच प्रत्येक मजल्याचा आराखडा, तुमच्या सदनिकेचा खाजगीपणा, तसेच आतून दिसणारे बाहेरील दृश्य, इमारतीच्या भोवती असणाऱ्या खुल्या जागा व सामाईक जागा, उदाहरणार्थ इमारतीच्या वरती असलेली गच्ची, बाजूला सोडलेल्या जागा किंवा लॉबी, अशाच व आणखी अनेक बाबी ,कारण जेव्हा तुम्ही त्या इमारतीमध्ये अनेक दशके राहणार असता व जेथे तुमच्या काही पिढ्या लहानाच्या मोठ्या होणार असतात तेव्हा प्रत्येक लहान गोष्ट महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे, सर्व दृश्य व अदृश्य सेवांच्या नियोजनाविषयी विचार करणेही तुमच्या दैनंदिन जीवनातील आरामासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. सकृतदर्शनी घर म्हणजे फक्त भिंती, रंग, टाईल्स, सॅनिटरी वेअर, फर्निचर असू शकते, परंतु याशिवाय घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या दृष्टीस पडत नाहीत. यामध्ये भिंतीतील विजेच्या वाहिन्या, त्याचशिवाय नळजोडणीसाठीच्या वाहिन्या, गॅसच्या वाहिन्या, मुख्य वीज वाहिन्या, जनरेटर बॅकअप, सांडपाण्याच्या वाहिन्या, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, पाण्याच्या वाहिन्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेआड असतात परंतु तुम्हाला घरात आरामशीरपणे राहता यावे यासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्याचशिवाय वाय-फाय, लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा, वातानुकूलन यंत्रणा, सौर उर्जेवर चालणारी पाण्याची तसेच विजेची उपकरणे यासारख्या सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधांसाठी नियोजनाची गरज असते. त्याचप्रमाणे एखादे घर किमान पन्नास वर्षे तरी उभे राहावे व या पन्नास वर्षांच्या काळात सेवांमध्ये जे बदल होतील त्यांचा समावेश त्याला करून घेता येईल अशाप्रकारचे त्याचे नियोजन असावे. उदाहरणार्थ, तीस वर्षांपूर्वी कुणीही आपल्या पार्किंगच्या गरजेचा विचार करत नसे, केवळ तीन बीएचके सदनिकांसाठी पार्किंगची सोय असायची, आजकाल १ बीएचके सदनिकेसाठीही कार पार्किंग हवे असतेत्याचप्रमाणे जेमतेम दहा वर्षांपूर्वी कुणीही बॅटरीवर चालणारी वाहने चार्ज करण्यासाठी नियोजन करावे लागेल अशी कल्पना केली नव्हती आज जवळपास तीस टक्के वाहने किंवा ईव्हींसाठी चार्जिंगचे पॉईंट तसेच पार्किंगसाठी जागा आवश्यक असते जी आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही कारण आपण भविष्यासाठी,भूतकाळात नियोजन करण्यात अपयशी ठरलो आहोत.

      अनेकदा मला प्रश्न विचारला जातो की घराचे नियोजन वास्तुशास्त्राप्रमाणे आहे का? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, माझा वास्तुशास्त्रावर विश्वास नाही परंतु माझा नियोजनावर विश्वास आहे. तसेच मला वास्तुशास्त्राविषयी जे काही थोडेफार माहिती आहे त्यानुसार यामध्ये तुमच्या नियोजनामध्ये निसर्गाचा समावेश करून घेतला जातो. यासंदर्भातील बाकी सर्व गोष्टी मिथके आहेत व प्रत्येकाच्या वैयक्तिक विश्वासाचा किंवा श्रद्धेचा भाग आहेत, ज्याला मला अजिबात आव्हान द्यायचे नाही. इमारतीच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये केवळ एखादी मूर्ती ठेवल्यामुळे किंवा वायव्य कोपऱ्यामध्ये जल (पाणी) ठेवल्यामुळे कुणाला काही अडचण येत नाही केवळ तुमचा तसा विश्वास असेल तर तुम्ही जरूर विश्वास ठेवा ! खरे सांगायचे, तर घराचा दरवाजा दक्षिणेला असल्यामुळे त्या घरातल्या रहिवाशांवर काहीही वाईट परिणाम होत नाही, तसेच उत्तरेकडे दरवाजा असल्यामुळे त्यांची भरभराट होईल याची काही शाश्वती नसते. अर्थात तुमचा नशीबावर विश्वास असेल किंबहुना मी म्हणेन की तुम्ही नशीबावर विसंबून असाल तर गोष्ट वेगळी. असे असेल तर मग या जगात चूक किंवा बरोबर काही नसते, तुमच्या नशीबाला तुमचे भविष्य ठरवू दे, असे माझे मत आहे, जे तुम्ही फेटाळू शकता व माझी त्याला काही हरकत नाही कारण हे तुमच्या घरासाठी आहे, माझ्या नव्हे. परंतु तुम्हाला निसर्गाची खरोखरच काळजी असेल ज्याचा संबंध सर्वार्थाने तुमच्या जीवनशैलीशी असतो व तुम्ही तुमच्या नियोजनामध्ये त्याचा विचार केला नाही तर मी त्याला कधीही अचूक नियोजन म्हणणार  नाही. निसर्ग म्हणजे झाडे, तसेच चिमण्या, राघू, फुलपाखरे आणि हो सूर्यप्रकाशही. मला माहितीय तुमच्यापैकी बरेचजण हसतील व मला वेडा म्हणतील कारण अशा गोष्टींचा घर खरेदी करताना कोण विचार करतो. परंतु लक्षात ठेवा निसर्गाचा समावेश करून केलेल्या योग्य नियोजनामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळू शकते व त्यामुळे तुमचे अनेक शारीरिक व्याधींपासूनही रक्षण होऊ शकते. कारण एकीकडे आपण आपल्या आरोग्यासाठी प्रथिने व जीवनसत्वे घेतो, परंतु योग्य नियोजनामुळे आपल्या खोल्यांमध्येच थोडा सूर्यप्रकाश येणार असेल तर आपल्याला ती घेण्याची गरज पडणार नाही. आणि योग्य नियोजन केलेले घर व ईमारतीत तुम्ही रहात असाल तर नक्कीच मनःशांती सुद्धा त्या घराचा भाग बनते आणि जेथे मनःशांती आहे तेथे सुख नक्कीच आहे ना, घराकडुन यापेक्षा काय चांगली आपल्याला अपेक्षा असु शकते! विकासक (अभियंता म्हणूनही) म्हणून योग्य नियोजनाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या सदनिकाधारकांना (म्हणजे घराच्या ग्राहकांनात्यांनी खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला देणे.पुण्यातील भोवतालच्या घरांचे दर पाहता,प्रत्येक चौरस फुटासाठी तुम्हाला रुपयांमध्ये किमान चार आकडी रक्कम तरी मोजावी लागत असेल.त्यामुळे आपण त्या चौरस फुटाचा वापर योग्यप्रकारे केला पाहिजे कारण कुणीतरी तरी कष्टाने कमावलेला पैसा त्यासाठी लावला आहे आपण चुकीच्या नियोजनामुळे तो वाया घालवू नये असे माझे मत आहे.

     मित्रांनो, तुम्ही कधीही तांत्रिक तपशील किंवा वैशिष्ट्ये, तसेच तुम्हाला मिळणाऱ्या सेवा (म्हणजेच सुविधा) जाणून घेतल्याशिवाय सेल फोन खरेदी केला आहे का किंवा एखादी कार तिचे इंजिन कसे चालते किंवा तिच्यामध्ये सुरक्षिततेसाठी कोणत्या खबरदाऱ्या घेण्यात आल्या आहेत याचा विचार न करता केवळ तुमच्या खिशाला परवडते म्हणून किंवा केवळ तिच्या बाह्य रूपावरून तुम्ही खरेदी केली आहे का, मला खात्री आहे की याचे उत्तर नाही असेच असेल. किंवा तुम्ही तुमची पत्रिका तुमच्या आय-फोनच्या मॉडेलशी किंवा कारच्या बांधणीशी जुळते का हे पडताळून पाहिले आहे का (कारचा क्रमांक मी एकवेळ समजून घेऊ शकतो) किंवा तुम्ही तुमच्या कोणत्या खिशामध्ये सेल फोन ठेवता किंवा तुम्ही तुमच्या गॅरेजमध्ये कोणत्या दिशेला तुमची कार पार्क करता हे तपासता का, या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात काहीही फऱक पडतो का, मला खात्री आहे की त्यांचे उत्तरही नाही असेच असेल. असे असेल तर मग घर खरेदी करताना, तुम्ही नियोजनाविषयी प्रश्न न विचारून कसे चालेल जो कुठल्याही इमारतीचा आत्मा असतो, घराच्या योग्य नियोजनाविषयी मला तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो. अचूक नियोजनाविषयी तुमच्या विकासकांच्या कल्पना जुळणार नाहीत हे मान्य आहे,परंतु त्यासाठी तुम्हाला तुमची अचूक नियोजनाची व्याख्या काय आहे हे आधी समजून घेतले पाहिजे,बरोबर? एवढे बोलून निरोप घेतो,तुमच्या योग्य घरासाठी तुम्हाला शुभेच्छा!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com