Friday 20 September 2024

UDCPR, पाऊस आणि शहर !!


































UDCPR, पाऊस आणि शहर !!

पॅरिस, लंडन व रोम यासारख्या काही प्रमाणात सांस्कृतिक बांधिलकी जपणाऱ्या, जगातील महान शहरांसाठी नियोजन सुसंस्कृतपणाला धरून असते. दुसरीकडे, डेट्रॉईट हे अमेरिकी शहर होते व त्यामुळेच तेथील नियोजन पूर्णपणे पैशालाच समर्पित होते, व तेथील नगर रचनांमध्येही फक्त नफा तोट्याचा विचार करण्यात आला आणि परिणाम आपण बघितला जेफ्री युजेनीडेस

जेफ्री केंट युजेनीडेस हे अमेरिकी लेखक आहेत. त्यांनी अनेक लघुकथा व निबंध, तसेच कादंबऱ्या लिहीलेल्या आहेत. ते डेट्रॉईचे रहिवासी आहेत, जे एकेकाळी अमेरिकेच्या सर्वात समृद्ध शहरांपैकी एक होते, जगामध्ये स्वयंचलित वाहनांची निर्मिती करणारे एक प्रमुख केंद्र होते. मी म्हटल्याप्रमाणे त्याचे नियोजनविषयीचे वरील अवतरण नंतरच्या काळात डेट्रॉईटच्या खालावलेल्या स्थितींविषयी सांगते. मला जेफ्री यांचे वरील अवतरण आठवण्याचे कारण म्हणजे, अलीकडेच पुण्यातील पावसामुळे शहरातील मालमत्तांचे बरेच नुकसान झाले व त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत पुणेकरांच्या प्रतिक्रिया व त्यांनी एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन (UDCPR) नियमांना दिलेला दोष ! आपण सगळ्यांनी पाहिले आहे (किंबाहुना, पाहात आहोत) की पुण्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात केवळ सखल भागांमध्येच नव्हे तर उंच व त्यावरील भागांमध्ये काय होते.  नेहमीप्रमाणे स्थानिक प्रशासकीय संस्था व सरकारने पावसामुळे होणाऱ्या नुकसानासाठी निसर्ग देवतेला जबाबदार धरले व ज्यांनी हा त्रास सहन केला (म्हणजे नागरिक) त्यांनी त्यांच्या नशीबाला दोष दिला व पुण्याच्या बुद्धिवादींना (हा नागरिकांचा एक स्वतंत्र वर्ग आहे) शहरामध्ये होणाऱ्या अशा प्रत्येक वाईट गोष्टीसाठी एखाद्या यंत्रणेला दोष द्यायला आवडते व यावेळी त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहनाला (UDCPR) जबाबदार धरले. ज्या सुदैवी जीवांना UDCPR म्हणजे काय हे माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की याचा संबंध बांधकाम व्यावसायिक किंवा उद्योगाच्या कोणत्याही घटकाशी नाही तर शहरी नगर नियोजनाच्या धोरणाविषयी आहे ज्यासंदर्भात आपल्या राज्य सरकारने जवळपास तीन वर्षांपूर्वी एका धोरणास मंजुरी दिली होती व ते मुंबई महानगरपालिकेसारखे (काही जण म्हणतील की ती दुरुस्त करण्याच्या पलिकडे आहे, परंतु तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे) काही प्रदेश वगळता राज्यातील बहुतेक शहरे व गावांना लागू होतात. आता तुम्ही बुचकळ्यात पडला असाल की नागरी नियोजनाशी संबंधित एखादे धोरण पावसासाठी व त्यामुळे येणाऱ्या पुरासाठी जबाबदार कसे असू शकते. माझा लेख याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी आहे म्हणूनच तुम्हाला स्वारस्य असेल तर पुढे वाचा.

सर्वप्रथम, आपण पाऊस व पूरस्थिती दरवर्षी अधिक बिकट का होत चालली आहे हे समजून घेतले पाहिजे, कारण पाऊस प्रत्येकवर्षी जवळपास सारखाच पडत आहे (सरासरी) परंतु त्याचे स्वरूप बदलत आहे व हे जगभरात सर्वत्र होत आहे. देव काही पुण्यालाच सावत्र वागणूक देत नाही, हे लक्षात घ्या. तर मग रस्त्यावर पूर येणे, पुराचे पाणी निवासी सोसायट्यांमध्ये शिरणे, नद्या तसेच नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढणे व तसेच इमारतींच्या कुंपणाच्या भिंतींचे नुकसान होणे यासारख्या घटना अचानक का घडू लागल्या असा पुढचा प्रश्न तुम्ही मला विचाराल. इथेच नगर रचना महत्त्वाची ठरते त्यामुळे आपण एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमांची पूर्तता करू शकतो. मी गेली ३० वर्षे पुण्यामध्ये राहतो आहे व खरोखरच पावासाच्या सरासरी प्रमाणाचा विचार करता पाऊस एवढाच पडायचा. परंतु त्याचे स्वरूप असे होते की मध्यम स्वरूपाची संततधार दीर्घकाळ पडत असे, आजकाल जसा पडतो तसा अचानक मुसळधार पाऊस कोसळत नसे. अशाप्रकारच्या पावसामुळे जमीनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणे अवघड होते, ज्याला आपण पाण्याचा प्रवाह (रनऑफ) म्हणतो. पाण्याच्या या लोंढ्यामुळेच नुकसान होते व हा आपल्या शहर नियोजनाच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे असे विविध विचारवंतांचे गट म्हणत आहेत. पावसाच्या स्वरूपातील बदलाव्यतिरिक्त गेल्या ३० वर्षात आणखी एक गोष्ट बदलली आहे व ती म्हणजे या वर्षात ज्याप्रकारे शहराचा विकास झाला आहे त्यामुळे पृष्ठभागावर वाहणारे पावसाचे पाणी शोषून घेण्यासाठी जमीनीचा व जमीनीच्या सर्वात वरच्या थराचा फार थोडा भाग खुला राहिला आहे. हे काही दोन-तीन वर्षात झालेले नाही व UDCPR तर केवळ गेल्या तीन वर्षांपूर्वी आले आहेत. मी काही UDCPR समर्थन करत नाही किंवा त्याला पाठिंबाही देत नाही, मी केवळ विश्लेषणासाठी तथ्ये मांडत आहे कारण मी देखील एक स्थापत्य अभियंता, बांधकाम व्यावसायिक आहे परंतु त्यापेक्षाही मी या शहराचा नागरिक आहे व मला या शहराची काळजी आहे, हे मी आधीच सांगू इच्छितो. तरीही, विचारवंतांचा असा दावा आहे की UDCPR हेच मॉन्सूनदरम्यान होणाऱ्या पुणे शहराच्या दयनीय स्थितीचे एकमेव कारण आहे. म्हणूनच UDCPR कशाप्रकारे व का दोष दिला जात आहे हे आपण पाहू.

UDCPR शहराच्या नियोजनावरील परिणामाचे विश्लेषण करण्यापूर्वी आपण पुणे शहराच्या नागरी वाढीचा इतिहास पाहू. ही वाढ गेल्या तीस वर्षात अधिक आहे. UDCPR असो किंवा UDCPR नसो आपण कधीही जमीनीचा पृष्ठभाग खुला ठेवणे किंवा त्याचे काय महत्त्व आहे याबाबत विचार केला नाही ही वस्तुस्थिती आहे. जमीनीच्या पृष्ठभागावरील मातीचा थर हटवल्याशिवाय कोणत्याही नवीन इमारती बांधल्या जाऊ शकत नाहीत व आपल्याला तर घरे हवी होती त्यामुळे जमीनीवरील हा मातीचा थर जाणार हे ओघानेच आले. हे गेल्या तीस वर्षात प्रत्येकवर्षी होत राहीले हे आपण लक्षात घेत नाहीये. त्याचवेळी जिथे शक्य आहे तिथे आपण ईमारती बांधण्यास सुरुवात केली, जिथे कायदेशीरपणे घरे बांधणे शक्य नव्हते तिथे बेकायदेशीरपणे बांधण्यास सुरुवात केली (व अजूनही बांधत आहोत). यामुळे फक्त जमीनीवरील मातीच्या आवरणाचेच अतोनात नुकसान झाले नाही तर पाण्याच्या प्रवाहाचा नैसर्गिक मार्ग व जलसाठे ज्यांना आपण ओढे, नद्या व तलाव असेही म्हणतो त्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले. शहराची भरभराट होत होती व आहे कारण आपल्या सगळ्यांना शैक्षणिक संस्था, आयटी पार्क, उद्योग व बरेच काही हवे होते कारण यामुळे आपल्या विकासाला गती मिळते. प्रत्येकालाच आज आपले करिअर घडवण्यासाठी पुण्यामध्ये यायचे असते, व यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण जबाबदार आहे कारण या वाढीचे आपणही लाभार्थी आहोत, बरोबर ? समस्या अशी आहे की, याचा कुणी विचार केला नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केले शहराची वाढ होत असल्यामुळे जमीनीच्या एका मोजक्या क्षेत्रफळावर (म्हणजेच शहरात) लक्षवधी लोक आकर्षित होणार आहेत व त्यांना त्यांची घरे, शाळा, खरेदी, आरोग्य, मनोरंजन यासाठी इमारती लागतील, तसेच त्यांना सेवा, रस्ते व इतरही अशा गोष्टी लागतील ज्यासाठी पुन्हा जमीन आवश्यक असेल व अशी प्रत्येक इमारत पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये अडथळा असेल तसेच या शहरातील जमीनीची पाणी शोषून घेण्याची क्षमताही त्यामुळे कमी होईल. आत्ता हे शहर आता भूकंपाच्या केंद्रासारखे झाले आहे पण हा भूकंप लोकसंख्या उद्रेकाचा आहे परंतु त्याचा परिणाम भूकंपासारखाच होणार आहे, तो म्हणजे महाआपत्ती!

नागरी नियोजनामध्ये UDCPR येण्यापूर्वी ही स्थिती होती व आता UDCPR आल्यामुळे अधिक बांधकामयोग्य क्षेत्राला परवानगी देण्यात आली म्हणजेच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय)/विकास हक्क हस्तांतरणात (टीडीआर) (कृपया एफएसआय/टीडीआरचा अर्थ समजून घेण्यासाठी गूगल करा, मी वारंवार ते समजावून थकून गेलो आहे) वाढ झाली यामुळे त्याच जमीनीवर अधिक बांधकामयोग्य क्षेत्र शक्य झाले. थोडक्यात १०,००० चौरस फूटाच्या म्हणजेच १०० फूट x १०० फूटांच्या भूखंडावर आधी २ बीएचकेच्या १५ सदनिका बांधण्याची परवानगी होती तर आता UDCPR धोरणामुळे आम्ही जवळपास दिडपट  म्हणजे २ बीएचकेच्या २३ सदनिका बांधू शकतो. शहराच्या वाढीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता व त्यामागे आपण जमीनी वाढवू शकत नाही तर जमीनीची क्षमता वाढवू म्हणजे घरांच्या किमती कमी होतील. हा विचार चांगला होता व त्याला काही प्रमाणात यशही मिळाले परंतु तो वेगळ्या लेखाचा विषय होईल. शहराच्या रिअल इस्टेट उद्योगावर याचा काय परिणाम झाला, तर जमीनींचे मालक एका रात्रीतून दुप्पट किंवा तिप्पट श्रीमंत झाले कारण त्यांच्या जमीनीची क्षमता एका रात्रीतून वाढली. या सगळ्या जमीनी आता विकासासाठी उपलब्ध आहेत व यामध्ये बांधकाम व्यावसायिकही आहेत, परंतु केवळ बांधकाम व्यावसायिकांनाच का दोष द्या. सरकारलाही या विकासाच्या प्रत्येक चौरस फुटासाठी शक्य त्या सर्व स्वरूपात (म्हणजे करांच्या) पैसे मिळत आहेत. परंतु आपण पुन्हा एकदा विसरतो की, या सगळ्या विकासामुळे जमीनीच्या आवरणाचे नुकसान होणार आहे. या अतिरिक्त सदनिकांकरता पार्किंगसाठी आपल्याला तळघरात खणणे आवश्यक आहे त्यामुळे पावसाचे पाणी झिरपण्यासाठी अजून कमी वाव राहतो, त्यामुळेच रस्त्यावर व सगळीकडे पुराचे पाणी दिसते. UDCPR ही समस्या नाही, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे ही खरी समस्या आहे. आपण आज पावसाच्या पाण्याला दोष देत आहोत, परंतु जर पाऊस कमी पडला, तर पुराची समस्या असणार नाही, पण आपण या इमारतींना पिण्याच्या पाणी पुरवठा कसा करू शकू, आपण त्याचा विचार केला आहे का व असे घडण्यास आधीपासूनच सुरुवात झाली आहे. पुण्याच्या प्रिय विचारवंतांनो, पुण्याच्या नागरी नियोजनातील सर्वात मोठा विनोद (म्हणजे अपयश) आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण शहरामध्ये (पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत) पूर म्हणजेच अतिरिक्त पाणी टाळण्यासाठी आपण UDCPR किंवा नवीन विकासाला विरोध करतो व शहराच्या बाहेर (पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात) आपण या विकास कामांना पाणीपुरवठा करू शकत नाही म्हणून नवीन विकासाला विरोध करतो, आपण किती भारी नियोजक आहोत, नाही का ?

मुद्दा केवळ UDCPR नाही, आपला नागरी नियोजनाबाबतचा एकंदर दृष्टिकोनच अविचारी आहे. आपण मेट्रोची जवळपास दोन दशके उशीरा उभारणी करतो, त्यानंतर मेट्रो नफ्यात चालावी याकरता आपण शहराच्या मध्यवर्ती भागात लोकसंख्येची घनता अधिक असावी या विचाराने मेट्रोच्या मार्गालगत लहान सदनिका बांधतो. परंतु यामुळे शहरावर शक्य त्या सर्व स्वरूपात अधिक ताण वाढत आहे, हा पैलू आपण विसरत आहोत. आपण आपल्या पार्किंगच्या गरजांसाठी जमीनीमध्ये खणण्याची परवानगी देऊन व आपल्या जमीनीच्या पाणी शोषण्याच्या क्षमतेचे कायमस्वरूपी नुकसान करण्यापेक्षा आपण नियम बदलून अधिक उंच इमारतींना परवानगी दिली पाहिजे. जेथे सर्व पार्किंग जमीनवरच असेल त्यासाठी आपल्याला आपला नागरी नियोजनाबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. शहरात झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे आणखी एक नुकसान होत आहे व ते म्हणजे हरित आच्छादन कमी होत चालले आहे. काँक्रिटीकरणामुळे झाडांची मुळेही कमकुवत होत चालली आहेत कारण त्यांच्यासाठी कमी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे थोडासा मुसळधार पाऊस पडला तरीही वृक्ष उन्मळून पडण्याची संख्या सातत्याने वाढत आहे, यामुळे सध्या असलेले हरित आच्छादनही कमी होत आहे.

शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवैध बांधकामांचे काय, कारण UDCPR लागू असूनही सामान्य माणसाला पुणे शहर व आसपासच्या भागात कायदेशीर घरे परवडत नाहीत, याच एकमेव कारणामुळे टेकड्यांवर व नदी पात्रांमद्येही अवैध घरे बांधली जात आहे. आपले लोकप्रतिनिधी शहराची वाढ व निसर्ग यांचा समतोल राखण्यासाठी धोरण तयार करण्याऐवजी, अशी अवैध घरे नियमित करण्याच्या घोषणा देण्यातच धन्यता मानतात व आपले विचारवंत पुरासाठी UDCPR दोष देतात, उत्तम. UDCPR एका रात्रीत तयार झाला नाही, तो एकप्रकारे कायदाच आहे व तो अस्तित्वात येत असतात त्यातील त्रुटींविरुद्ध कुणी का निषेध व्यक्त केला नाही असा प्रश्न मला या विचारवंतांना विचारायचा आहे. याचा अर्थ असा होत नाही की आपण त्यामध्ये बदल करू शकत नाही. परंतु आपल्या दूरदृष्टिच्या अभावाचे खापर नियम पुस्तिकेतील काही पानांवर फोडू नका, एवढेच मला सांगायचे आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे कितीही प्रमाणात अन्न खरेदी करता येईल एवढा पैसा असला तरीही आपण आपले शरीर निरोगी राहावे यासाठी खाण्यावर ताबा ठेवतो, त्याचप्रमाणे शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी (माफ करा विकासकांनी) अधिकाधिक एफएसआय वापरण्याची स्पर्धा थांबवण्याची वेळ आली आहे. सरकार मोफत एफएसआय देत असले तरीही त्याचा वापर मर्यादित प्रमाणात करूया !

लोकहो, निसर्गचक्राप्रमाणे पाऊस पडत होता, पडत आहे व पडत राहील, आपण निसर्गाचा समतोल राखून जगायचा शिकतो का व त्यानुसार आपली धोरणे तयार करतो का हा मुद्दा आहे. आपण निसर्गाची पर्वा न करता आपली हावरटपणाची धोरणे राबवण्यावरच भर दिला तर, निसर्गही आपल्याला तसेच प्रत्युत्तर देईल. यात पराभव कुणाचा होईल हे आपण सगळे जाणतो, एवढे बोलून निरोप घेतो विचारवंत पुणेकरांनो !


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com













 

Friday 13 September 2024

भाईगिरीची दुसरी बाजू !

 


























भाईगिरीची दुसरी बाजू !

बंदुक हातात असलेल्या माणसापेक्षा ब्रीफकेस हाती असलेला वकील जास्त पैसे कमावु शकतो." मारिओ पुझो, (गॉडफादर)

हातात बंदुक हा तुम्हाला तुमच्या लक्ष्याकडे नेणारा सर्वात जलद मार्ग आहे, जर तुम्ही जिवंत लक्ष्यापर्येंत पोहचलात तर ...! इऑन कोल्फर

गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचे जीवन हा आपल्या समाजात नेहमीच आकर्षणाचा विषय राहिलेला आहे कारण आपल्या सगळ्यांमध्ये आत दबलेली वावरणारी एक काळी बाजू असते हे मानसशास्त्रानेही मान्य केलेले आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण पुणे शहरातल्या गुन्हेगारीविषयक बातम्यांबदद्ल तावातावाने बोलतो किंवा त्यावर टीका टिप्पणी करतो तेव्हावर लिहिलेल्या पहिल्या ओळींसाठी कुठल्याही परिचयाची गरज नाही कारण ती गॉडफादर या अजरामर कलाकृतीच्या लेखकाने लिहिली आहे आणि दुसरी ओळ जी या विषयासाठी अगदी चपखल बसते ती कोल्फर यांची. जे आयरिश बालसाहित्यिक आहेत. पूर्ण वेळ लेखक होण्यापूर्वी त्यांनी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केले. आर्टेमिस फाउल या सिरीजचे लेखक म्हणून त्यांची ओळख सुपरिचित आहे. शिक्षक आणि बालकथाकार असलेले कोल्फर यांनी माझ्या मनात असलेल्या गुन्हेगारी आणि गुन्हेगारांबाबतच्या भावना अचूकपणे मांडल्या आहेत यात आश्चर्य नाही ! ज्यांनी गॉडफादर लिहिला ते मारिओ पुझो आणि अभिनेता मर्लीन ब्रँडो यांनी गुन्हेगारीला एका वेगळ्याउंचीवर नेऊन ठेवले आहेज्याविषयी मी या आधीही लिहिले आहे. मी ती सुद्धा कबुली देतो की आयुष्य जगणे आणि कामाविषयीच्या गॉडफादरच्या तत्त्वज्ञानाचा मी प्रचंड चाहता आहेपण त्या तत्त्वज्ञानाचा उपयोग करण्याच्या त्याच्या पद्धतीचा नव्हे, हे मी इथे आधीच स्पष्ट करू इच्छितो ! हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे सध्या पुण्याच्या गुन्हेगारी जगतात अचानक वाढत असलेल्या घटना  किंवा गुन्हे किंवा गुन्हेगारीच्या बातम्यांमध्ये  झालेली वाढ. पोलिसांच्या मते ही संघटित गुन्हेगारी नसली तरी खून हा शेवटी खूनच असतो आणि चोरी ही चोरीच असते आणि याच सर्व गोष्टींना गुन्हेगारी म्हणतात आणि समाजासाठी आणि कोणत्याही व्यवसायासाठी ह्या घटना घातकच असतात. आणि या सर्व गुन्ह्यांमध्ये सर्वात चिंतेची बाब कोणती असेल तर ती गुन्हेगारीमधला अल्पवयीन मुलांचा किंवा अगदी तरुण मुलांचा सहभागयामुळे पोलिसांसमोरही आव्हान उभे ठाकले आहे आणि ही तरुण मुले गुन्हेगारीच्या रेकॉर्डवरही नसतात !

"रेकॉर्डवरील गुन्हेगार" ही संज्ञा अनेक वाचकांना समजणार नाहीअनेकदा वर्तमानपत्रात वाचलेली किंवा माध्यमांमधून बघितलेली असली तरी त्याचा नेमका अर्थ कायतर जेव्हा पोलिस एखाद्या गुन्हेगाराला एखाद्या गुन्ह्यासंबंधी पकडतात / अटक करताततेव्हा त्याचे / तिचे नाव इतर सर्व माहिती गुन्हाच्या तपशीलांसह पोलीसांच्या नोंदींमध्ये समाविष्ट होते. त्यामुळे जेव्हा कोणताही गुन्हा घडतो तेव्हा पोलिस पहिला संशयित आरोपी हा त्यांच्याकडील उपलब्ध नोंदींमधून शोधत असतातज्या मध्ये गुन्हेगारांची आणि गुन्हेगारीच्या पद्धतीची समानता असते त्यांना बरेचदा चौकशीसाठी बोलावले जाते. थोडक्यात आता तुमच्यावर गुन्हेगार असा शिक्का बसलाय म्हणजेच तुमची पोलिसांकडे नोंद झाली आहे! (रेकॉर्डवर आलीही) परंतुअलिकडे गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले गुन्हेगार हे पोलिसांच्या रेकॉर्डवर नसतातम्हणजे त्यांना कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतेशिवाय बरेचदा ही मुले अल्पवयीन असतात म्हणजेच 18 वर्षे वयाखालील असतात. त्यामुळे  त्यांना अटक करणे पोलिसांना अवघड जाते किंवा अल्पवयीन मुलांबाबतच्या कायद्यातील तरतुदींनुसार त्यांना अधिक काळ तुरुंगात राहण्याची भीती नसते. आणि हे एकाअर्थी खरेच आहे कारण गुन्हेगारीत अडकलेल्या मुलांना किंवा तरुणांना जगण्याची दुसरी संधी दिलीपाहिजेपरंतु दुर्दैवाने याचा वापर शिक्षेविरोधात ढाल म्हणून केला जातो आणि अनेक सराईत गुन्हेगार स्वत:साठी अल्पवयीन मुलांची नियुक्ती करून / त्यांचा सहभाग वाढवून पोलिसांच्या मर्यादांचा गैरफायदा घेताना दिसतातयामुळेच मला या विषयाबद्दल लिहावेसे वाटले !

अनेक वाचक विचार करतील कीमला हे लिहून काय करायचे आहे किंवा अशा विषयांत मी कधी पासून तज्ञ झालो आणि माझी लिखाणाची चाकोरी जसे वन्यजीवविषयक (ताडोबा असे वाचावे) किंवा रिअल इस्टेट सोडून मी या विषयात ज्ञान का पाजळत आहे,  परंतु मी हे एक समाज म्हणून त्याच्या जागृतीसाठी लिहित आहे, कारण हा धोका आपल्या संपूर्ण भविष्यावर आणि व्यवसायावर आणि दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूवर घोंघावत आहे! पोलीस हे काही देव नसतातशिवाय ते सर्वत्र असू शकत नाहीत किंवा ते गुन्हेगाराला योग्य मार्गाने जाण्याचा रस्ता दाखवू शकतातपण ते त्याचे काम नव्हे. त्यांचे खरे काम गुन्हेगारी रोखणे हे आहे, गुन्ह्यांचा शोध घेणे आणि गुन्हेगारांना न्यायालयासमोर उभे करणे हे आहे. परंतु गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरूणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करणे ही काळाजी आणि समाजाची गरज आहे. हे पोलीस यंत्रणेसमोरचे सर्वात कठीण आव्हान आहे आणि आपण प्रत्येकाने त्यांना या कामात सहकार्य करायला हवे हा इथे माझा उद्देश आहे !

अधिकाधिक तरूण गुन्हेगारीकडे वळण्याची कारणे अनेक असू शकतात परंतु एक मुख्य कारण म्हणजे गुन्हेगारी विश्वाचं आणि गुन्हेगारांचं आकर्षण आणि उदात्तीकरण ही वस्तुस्थिती आहे. आणि तरुणांना या उदात्तीकरणामागील पोकळपणा आणि कटू सत्याची जाणीव करून देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण मोठे योगदान देऊ शकतो! एखाद्या भाईच्या (स्थानिक गुडांसाठी किंवा गुन्हेगासाठी वापरण्यात येणारी लोकप्रिय संज्ञा) बेदरकार वृत्तीचे तरुणांच्या गँगद्वारे समर्थन करणेत्याच्या वाढदिवसाला मोठमोठे होर्डिंग / कटआऊट्स लावणेभाईचे गोल्डन चेन आणि बेसलेटने मढवलेले फोटोत्याची राजकीय नेत्यांशी जवळीक काळा ऊंची गॉगल, महागडी  रॅडोच घडयाळ, काळ्या काचेची स्पेशल नंबर प्लेटची एस यूव्ही कार अशा अनेक गोष्टी लहान मुलांना  अकर्षित करतात ! सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाईला अभ्यास करावा लागत नाही किंवा त्याला परिक्षेतील मार्कांची चिंता नसते  किंवा त्याला कुणाच्यातरी आदेशानुसार 10 ते 7 काम करावे लागत नाहीया सर्व कारणांमुळे भाईबद्दल मुलांमध्ये आकर्षण निर्माण होते आणि अगदी पोलीसही भाईशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात ! म्हणूनच मग जेईईएनईईटीसारख्या सामान्य मुलांच्या शर्यतीत का सामील व्हायचे किंवा इतर मुलांशी तुलना होऊन आपल्याला मठ्ठ समजले जाईल अशा शाळेत का जायचे आणि सरतेशेवटी ज्या कार्यालयात मान मिळणार नाही अशा ठिकाणी का काम करायचे बरोबर ? हे सहजपणे काही न करता मिळणारे आयुष्य याचे प्रमुख कारण आहे. या मुळेच अनेक मुले अभियंता किंवा मॅनेजर किंवा अगदी कुशल कामगार बनण्यापेक्षा भाई बनणं पसंत करतात हा माझ्या लिखाणाचा विषय आहे! इथेच आपण मारिओ पुझोच्या विचाराकडे दुर्लक्ष करतोजिथे तो उपहासात्मकरित्या सांगत असतो की एक विद्वान वकिल गुन्हेगारापेक्षा अधिक पैसे कमावु शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करायला हवाजे तुम्हाला भाई बनवण्यासाठी गरजेचं नसते !  मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि या भाई नावाच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचे नाव आहे दु:खद अंतयातूनच मला पोलिस प्रमुखांना पत्र लिहावेसे वाटले. आणि याची गरज केवळ पोलिसांनाच नाही तर संपूर्ण समजााला आहे असे मला वाटते. म्हणून मी लिहिलेले पत्र खाली शेअर करत आहे...

प्रति

मा. रश्मी शुक्ला मॅडम, आयपीएस,

महासंचालक, महाराष्ट्र पोलीस.

एका भाईची गोष्ट” 

विषयगुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये यासाठी तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबाबत काही सूचना.

आदरणीय मॅडम,

मी हे पत्र पुण्यातून लिहित आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी आणि त्यातल्या अल्पवयीन युवकांच्या विशेषत: मुले जी 18 वर्षे वयोगटाखालील आहेतत्यांच्या गुन्हेगारीतल्या वाढत्या सहभागाविषयी आपल्याला माहितच आहे. ही केवळ पोलिसांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी चिंतेची बाब आहे. हे युवक करिअर म्हणून गुन्हेगारीकडे का वळत आहेत याविषयी कारणांच्या तपशिलात मी जाणार नाही पण एक मुख्य कारण म्हणजे सोशल मिडीयाद्वारे मिळणारी प्रसिद्धी किंवा भाई बनवण्यासाठी स्थानिकांकडून केले जाणारे उदात्तीकरण आणि चुकीचा आदर! शिवाय चित्रपटांमधून उभी केली जाणारी भाईची प्रतिमा जसे सत्या सारख्या चित्रपटात भिकू म्हात्रे असेल आणि अलिकडच्या मुळशी पॅटर्न चित्रपटात नान्या भाईसारखी व्यक्तीरेखा, याकडेही आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण हे थांबवू शकत नाही परंतु भाईबाबतच्या आकर्षणामागील ही एक वस्तुस्थिती आहे'!

यासाठी आदर किंवा भीती असलेल्या अनेक स्थानिक भाईच्या केस स्टडीमधून (सोशल मिडीया पोस्ट) आपण या आकर्षणाच्या भागाचा सामना करू शकतोकारण वस्तुस्थिती अशी आहे, की अशा भाईंचा अंत तीनपैकी एकामार्गाने होऊ शकतोते म्हणजे तुरुंग किंवा पोलिसांकडून एन्काऊंटर किंवा प्रतिस्पर्धी टोळीकरून खून ! समाज माध्यमे किंवा कोणताही चित्रपट आपल्याला काय दाखवत नाहीतर एखादा भाई मेल्यावर किंवा तुरुंगात गेल्यावर त्याच्या कुटुंबाचे काय होते, हे आपण तरुणांना दाखवलेपाहिजे. मुळशी पॅटर्नमध्ये नान्या भाईचे उदात्तीकरण करण्यात आले आहे पण चित्रपटातच नान्या भाई त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतच तो ऐन चाळीशीत असताना खून होतो आणि त्यानंतर त्याच्या बायका-पोरांनी आयुष्य कसं जगलं असेल हे कोणी विचारत नाही! त्याचप्रमाणे जेव्हा एखादा भाई तुरुंगात जातो तेव्हा त्याचे आईवडिल किंवा भावंडांना समाज कसा तुच्छतेने बघतो हे कुठल्याही चित्रपटात किंवा समाज माध्यमांमधल्या पोस्टमध्ये सांगितले जात नाहीबरोबरहेच पोलिस करू शकतात आणि अशा प्रकारच्या गोष्टींना क्रेडाईसारख्या संस्था सहाय्य देऊ शकतात. शिवाय आपण नामांकित निर्मिती कंपन्यांना या कथांवर दोन मिनिटांचे लघुपट तयार करायला सांगू शकतो.  आणि हे लघुपट चित्रपटगृहात किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रमोट करा. लहान मुले जे सोशल मिडियावर पाहतात त्यासोबतच वहावत जातातआणि गुंडा भाईच्या आयुष्याचा करूण अंत दाखवल्याने निश्चितच मुलांना गुन्हेगारीकडे वळण्याच्या मार्गापासून दूर खेचता येण्यास मदत होईल. यावर माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच मी हे पत्र आपल्याला लिहिण्याचे धाडस केले!

हे पत्र मी आपल्या विभागातील काही अधिकारी मित्रांनाही पाठवत आहेकारण कुणीतरी कुठेतरी अधिक चांगला विचार करू शकेल आणि जास्त उशीर होण्यापूर्वी या कार्यासाठी हातभार लावू शकेल! एक व्यक्ती म्हणून तसेच संस्था म्हणून आम्हाला या कार्यासाठी हातभार लावण्यात आनंद होईल!

हार्दिक शुभेच्छा!

संजय देशपांडे

मित्रांनोगुन्हेगारी हा आपल्या समजाचा अंगभूत भाग होताआहे आणि राहिलसुद्धा, पण  मुद्दा हा आहे कीआपण गुन्हेगारीला चांगुलपणाविरुद्ध जिंकू द्यायचे की नाही. अगदी मार्वल / डिस्नेच्या चित्रपटांमध्येही सरतेशेवटी चांगुलपणाचाविजय होतो परंतु तेही वाईटांशी (इथे गुन्हेगारी असे वाचावे) कठोर युद्ध केल्यानंतरच. आणि इथे तर आपण खऱ्याखुऱ्या आयुष्याविषयी बोलत आहोत, जेथे आपल्या मुलांचे भविष्य पणाला लागले आहे आणि वाईटपणा नेहमीसंधीची वाट बघण्यासाठी टपलेला असतो.  हे लक्षात असुद्या. या वाक्यावर थांबतो !

धन्यवाद !

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी -  smd156812@gmail.com