Wednesday, 29 May 2024

"शहर, रस्त्यावरील अपघात व मामाचे पत्र खेळ !!










































"शहर, रस्त्यावरील अपघात व मामाचे पत्र खेळ!!

 सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या शहाण्या लोकांना होणारी शिक्षा म्हणजे, वाईट व्यक्तींच्या शासनाखाली जगावे लागणे” … प्लेटो.

 अनेकांना वरील नाव माहिती नसेल परंतु तो एक महान विचारवेत्ता व ग्रीक तत्वज्ञ होता. त्याची विद्वत्ता तेव्हाही काळाच्या पुढे होती. अशा पुरुषांनी नेहमीच त्या अभिशापाची किंमत चुकवावी लागते, प्लेटोलाही लागली व त्याला आयुष्याचा उत्तरार्ध तत्कालीन रोमन सरकाराच्या बंदीवासात घालवावा लागला. शासनकर्ते प्लेटोकडे नेहमी शंकेने बघत कारण त्यांना अशी भीती वाटत असे की त्याच्या तत्वज्ञानामुळे व ज्ञानामुळे नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल, जे कुणाही शासनकर्त्याला आवडत नाही. गंमत म्हणजे काही हजार वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही, अर्थात आपल्याकडे आत्ता  भोवताली फारसे प्लेटो नाहीत ही वस्तुस्थिती आहे. लेखाची अशी तत्विक सुरुवात करण्याचे कारण म्हणजे एक घटना (अपघात) जो आता राष्ट्रीय मुद्दा झाला आहे व समाज माध्यमांचे आभार मानले पाहिजेत, की हा मुद्दा कदाचित आंतरराष्ट्रीय मुद्दाही होईल. पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या एका घटनेत अल्पवयीन मुलगा दारुच्या नशेत गाडी चालवून, दुचाकीवर जाणाऱ्या दोन व्यक्तींना धडकल्याने त्या व्यक्तींचा जीव गेला. प्रत्येक प्रकारातील सर्व माध्यमांमध्ये (सोशल मीडिया सुद्धा) या घटनेशी संबंधित अनेक बातम्या देण्यात आल्या. या घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये अनेक बड्या व्यक्ती सहभागी झाल्या यात आश्चर्य नाही. अर्थात त्यांना ज्या व्यक्तींचा जीव गेला त्यांच्याविषयी फार काही सहानुभूती होती असे नाही तर त्यापैकी बहुतेकांना त्यांचे अस्तित्व जाणवून द्यायचे होते व बऱ्याच जणांनी या संधीचा वापर हिशोब चुकते करण्यासाठी पण केला. त्याचा हेतू काहीही असो, अगदी माझ्या लेखाचा समावेशही यापैकी एका वर्गवारीत केला जाईल व असे झाल्यास मी त्याला दोष देणार नाही. परंतु एक लक्षात ठेवा ही निश्चितच अशाप्रकारची पहिली  शेवटची घटना नव्हती. परंतु आपल्याला भविष्यात अशाप्रकारची जीवितहानी टाळायची असेल, तर आपण त्यातून काय शिकणार आहोत? अपघातात मरण पावलेल्या तरुणांच्या पालकांविषयी अतिशय सहानुभूती वाटते कारण कोणत्याही शब्दांनी त्यांची मुले परत येणार नाहीत. हा लेख लिहीताना केवळ एकच इच्छा आहे की इथून पुढे एखाद्या मुलाचे आयुष्य वाचावे व कुणाही पालकांना अशा दुःखाला सामोरे जावे लागू नये. हे जो मुलगा पोर्शे चालवत होता त्याच्या पालकांनाही लागू होते, कारण तेदेखील पालक आहेत व दोषी असतील किंवा नसतील (म्हणजे बरोबर किंवा चूक) कुणाही पालकांना ते त्यांच्या मुलांना वाढवत असताना आपण काही चूक करतोय असे वाटत नाही. तरीही मुलांकडून चुका घडतात व त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. त्याचशिवाय, मी सुद्धा तरुण मुलांचा वडील आहे व मला या पिढीला हाताळताना येणाऱ्या समस्यांची व आपल्याला त्यांच्याकडून असलेल्या व समाजाला पालक म्हणून आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव आहे (असे मला तरी वाटते).

 ज्या व्यक्तींना या घटनेविषयी माहिती आहे ते या प्रस्तावनेकडे दुर्लक्ष करू शकतात, परंतु ज्यांना ही घटना माहिती नाही (जे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे) त्यांच्यासाठी सांगतो. १८ मे रोजी शनिवारी संध्याकाळी एका तरुण मुलाने त्याचा १२वीचा निकाल त्याच्या मित्रांसोबत साजरा केला, मद्यपान केले (जे या वयाची मुले सर्रास करताना दिसतात, ही कटू सामाजिक वस्तुस्थिती आहे) व त्याच्या वडिलांची उंची गाडी चालवली. याच गाडीने तो पार्टीसाठी आला होता. पुण्याच्या पूर्वेकडील उपनगरामध्ये तो गाडी चालवत असताना, त्याचे वेगावर नियंत्रण राहिले नाही व पहाटे ३च्या सुमाराला बाईकवरून चाललेल्या एका जोडप्याला तो धडकला, ते सुद्धा एका पार्टीतून परत येत होते. त्या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला व गाडी चालवणाऱ्या मुलाला रस्त्यावरील जमावाने पकडले व थोडी मारहाण केल्यानंतर त्याला पोलीसांच्या हवाली केले.

 खरी गोष्ट येथून सुरू होते, हा मुलगा एका मोठ्या व्यावसायिकाचा (ते देखील बांधकाम व्यावसायिक) मुलगा होता, तो अल्पवयीन होता व त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. कळस म्हणजे त्या उंची कारची आरटीओकडे नोंदणीही झालेली नव्हती किंवा तिच्यावर नंबरप्लेट नव्हती. पोलीसांनी गुन्हा दाखल केला व संबंधित दंड संहितेअंतर्गत कलमे लावली. अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये सामान्यपणे जे होते तेच येथे झाले. परंतु  इथून पुढे जे घडले त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला, हा माझ्या लेखाचा विषय आहे. कारण यानंतर जे काही झाले त्यामुळे केवळ मरण पावलेल्या तरुण जोडप्याचे नातेवाईकच नव्हे तर संपूर्ण समाजाला धक्का बसला व ज्याप्रमाणे निर्भया प्रकरणामध्ये समाजामध्ये आक्रोश होता (काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये झालेली घटना) त्याचप्रमाणे तो या प्रकरणातही वाढत गेला. इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्विटर यांचे आभार, कारण यावेळी या घटनेची इतकी चर्चा झाली की शेवटी देशाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारालाही त्याची दखल घ्यावी लागली व त्यावर टिप्पणी करावी लागली. माननीय उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्यांना एक पत्रकार परिषद घ्यावी लागली. शहराचे माननीय पोलीस आयुक्त जे गुन्हे हाताळण्याच्या बाबतीत अतिशय कठोर अधिकारी मानले जातात त्यांना असे म्हणावे लागले, की पोलीसांनी गुन्हा नोंदवतांना लावलेली कलमे चुकीची असल्याचे आढळले तर ते जाहीरपणे माफी मागतील. व्वा, ही म्हणजे कमालच झाली. कुणालाही आश्चर्य वाटेल की ज्या शहरामध्ये जिथे दररोज चार-पाच लोकांचा अपघाती मृत्यू होतो तिथे या अपघाताने एवढे लक्ष का वेधले, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

 या अपघाताने सर्वांचे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे, ज्याप्रकारे अपघातानंतर यंत्रणेच्या हालचाली झाल्या त्यामुळे मद्यपान केलेल्या तरुणाने मद्यपान केले नसल्याचे आढळून आले (वैद्यकीय चाचणीमध्ये,

आता तर अस समोर आलेय की डॉक्टरांनी ते रक्ताचे नमूनेच बदलले) त्यामुळे त्या मुलांच्या रक्त चाचणीमध्ये मद्याचा अंश आढळून आला नाही, परंतु समाज माध्यमांवरील रिल्समध्ये तो त्याच्या मित्रांसोबत रात्री उशीरापर्यंत एका परमिट रूममध्ये दारू पित असल्याचे आढळून आले आहे. जेव्हा पोलीसांनी त्या मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले. त्या दिवशी रविवार असूनही अटकेनंतर दोन तासात त्याला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर करताना माननीय न्यायालयाने त्या मुलाला अपघाताविषयी ३०० शब्दांचा निबंध लिहा, पंधरा दिवस आरटीओसोबत वाहतूक व्यवस्थापनासाठी काम करावे लागेल व समुपदेशन घ्यावे लागेल, त्याचशिवाय इतरही काही अटी घातल्या त्या अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे मी त्यावर टिप्पणी करू शकत नाही. त्यामुळे जो मुलगा दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत झाला, त्या तरुणांच्या कुटुंबांना त्यांच्या लाडक्या मुलांचे मृतदेह ताब्यात मिळण्याआधीच, त्याला जामीन मिळाला. जामीनासाठीच्या अटीही निबंध लिहीणे वगैरेसारख्या होत्या. या बातमीमुळे अभूतपूर्व आक्रोश निर्माण झाला, ज्याची कुणी कधीही अपेक्षा केली नसेल. मी "भारत छोडो" आंदोलन पाहिलेले नाही परंतु ते कसे असेल याची मी कल्पना करू शकतो. प्रत्येक मंचावरील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकंदरच यंत्रणेविषयी राग व आक्रोश होता, हा माझ्या लेखाचा विषय आहे!

 तर यंत्रणेने (म्हणजे सरकारने) असे काय चूक केले ज्यामुळे जनतेमध्ये एवढा आक्रोश होता. याचे उत्तर म्हणजे प्रत्येकाला ज्या तरुणांना अपघातात जीव गमवावा लागला त्यांच्याविषयी आपल्या कुटुंबाप्रमाणे सहवेदना होती. कारण या शहरात जवळपास चाळीस लाख दुचाकी आहेत, त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील कुणी ना कुणी व्यक्ती दिवसातील कोणत्याही वेळी रस्त्यावरच असते. अशी अपघाताची घटना आपल्यासोबतही होऊ शकते, हे तथ्य पचवणे अवघड आहे. त्याशिवाय जे चित्र रंगवण्यात आले की त्या मुलाला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला, प्रत्येकाचा सरकारी यंत्रणेशी (विशेषतः पोलीसांशी) संपर्क येतोच, तिथे सामान्य माणसाला कशी वागणूक मिळते हे सर्व जाणतात. मी हे पोलीस खात्यात माझे अनेक मित्र असूनही म्हणतोय जी चांगली माणसे व चांगले अधिकारी सुध्दा आहेत. तरीही पोलीसांची जनमानसात अशी प्रतिमा का आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे (हे बांधकाम व्यावसायिकांनाही लागू होते). त्यानंतर न्यायालयाने जो निकाल दिला त्याविषयी, सुविद्य माननीय न्यायाधिशांनी कायद्यातील तरतुदींप्रमाणेच निकाल दिला असेल, परंतु याच तरतूदी जेव्हा एखादा आरोपी सामान्य कुटुंबातील असतो तेव्हा का लावल्या जात नाहीत व या प्रकरणात एवढी घाई का करण्यात आली. अशाप्रकारच्या लाखो प्रकरणांमध्ये लोकांना कुप्रसिद्ध “तारीख पे तारीख” चा अनुभव घ्यावा लागतो, हे या आक्रोशामागचे आणखी एक कारण होते. या प्रकरणामध्ये खरी गंमत नंतर सुरू झाली ज्यामुळे मला आमच्या लहानपणी खेळला जाणारा एक खेळ आठवला, तो म्हणजे “मामाचे पत्र”. या खेळामध्ये (हा खेळण्यासाठी अगदी कमीत कमी साधने लागतात), सर्व खेळाडू सरळ एका रांगेत बसतात व ज्याच्यावर राज्य असते तो त्यांच्याभोवती धावत असतो, त्याच्या हाती एक कागदाचा किंवा कापडाचा तुकडा असतो व तो मोठ्याने “माझ्या मामाचं पत्रं हरवलं” असे म्हणत असतो व बसलेले खेळाडू “आम्हाला नाही सापडलं” असे उत्तर देत असतात, तो मुलगा ते पत्र बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मांडीवर टाकत असे जो खेळातून बाद मानला जाई व इतरांनी दिलेले एखादे काम त्याला शिक्षा म्हणून करावे लागे. पुण्यातील घटनेनंतरही विविध संस्थांमध्ये (म्हणजे सरकारी) हाच खेळ सुरू झाला, त्या तरुणाला मद्य कुणी दिले इथपासून ते असे बार बंद होण्याच्या वेळेनंतरही कसे सुरू होते, तसेच पोर्शे गाडी नोंदणीशिवाय रस्त्यावर कशी होती, आरोपीला देण्यात आलेली अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसारखी वागणूक व मृत तरुण जोडप्याच्या पालकांचा चौकशी अधिकाऱ्यांकडून केला जाणारा छळ, म्हणजे ते जोडपे (जे मित्र होते) इतक्या उशीरा रात्री  का आणि कुठे चालले होते व त्यांचे एकमेकांशी काय नाते होते अशाप्रकारचे प्रश्न (मृताच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे) व यंत्रणेने इतक्या झटपट कारवाई कशी केली व त्या मुलाला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले व जामीन मिळाला; मला असे वाटते की यंत्रणा समाजाचा मूलभूत नियम समजून घेण्यात अपयशी ठरली, की जेव्हा न्याय समान वेगाने व पद्धतीने सगळ्यांना दिला जातो तेव्हाच तो जनतेला मान्य होतो, आणि तो न्याय पद्धतीने देण्यात आला असला तरीही तो एकाला वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा गतीने दिला तर तो न्याय राहत नाही.  

आता संपूर्ण यंत्रणा त्यांनी कशी योग्यप्रकारे कारवाई केली आहे व दुसरा विभाग आपले कर्तव्य पार पाडण्यात कसे अपयशी ठरले हे दाखवण्याच्या मागे लागली आहे व सगळेच जण जणू काही  "मामाचे पत्र" हा खेळ खेळत आहेत. माझा मुद्दा असा आहे की हे सगळे कधी थांबणार आहे?

 आणि दररोज प्रत्येक वाहतूक सिग्नलला किंवा रस्त्यावर, याच शहराचे नागरिक वाहतुकीच्या प्रत्येक नियमाचे उल्लंघन करत असतात व नागरिकांना दोष द्यायचा असेल, तर पोलीस केवळ अशा प्रकारे बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या चालकांवर केवळ कठोर कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे त्यांचे खांदे झटकू शकत नाहीत, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. त्याचवेळी, आपल्याकडे प्रत्येक कायदा व यंत्रणा आहे परंतु त्या यंत्रणेशी संबंधित प्रत्येक घटकाला तिचे संरक्षण करण्याऐवजी तिचे उल्लंघन करण्यात किंवा तिला वाकविण्यात अभिमान वाटतो (व पैसेही घेतो), थोडक्यात सांगायचे तर संपूर्ण समाज समाजाप्रती स्वत:च्या  जबाबदारीविषयी डोळे, कान झाकून घेतो व त्यामध्ये या घटनेच्या निमित्ताने समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्या बहुतेक व्यक्तींचाही समावेश होतो, किंबहुना आपण त्यासंदर्भात काय करणार आहोत, हा माझ्या लेखाचा विषय आहे!

 शेवटचा मुद्दा म्हणजे, ज्यामुळे मी अतिशय दुःखी झालो (म्हणजे कष्टी झालो, वैतागलो, चिडलो व अस्वस्थ झालो) ती म्हणजे मृत तरुणाच्या काकांनी दिलेली प्रतिक्रिया, “आपल्या तरुण मुलांना करिअरसाठी या शहरामध्ये पाठवावे किंवा नाही याबाबत आता आम्ही साशंक आहोत, जे त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित आहे असे आम्हाला वाटत होते!” लोकहो, ही प्रतिक्रिया व त्यामागच्या भावना या शहरातील प्रत्येकासाठी धोक्याचा इशारा आहेत ज्यांना या शहराने आपल्याला जी समृद्धी दिली आहे त्यातून लाभ मिळाला आहे. त्याशिवाय आपल्या केवळ आनंद साजरा करण्याच्या संकल्पनांचाच नव्हे तर एकूणच जीवनाविषयीच्या दृष्टिकोनाची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे. एक लक्षात ठेवा, अमेरिका अतिशय समृद्ध देश असेल, परंतु नागरिकांच्या आनंदाच्या मोजपट्टीवर भूतानने अमेरिकेलाही मागे टाकले आहे, कारण आनंद हा मनशांतीचा परिणाम आहे व सुरक्षितता हा त्याचा आधारस्तंभ आहे. आपण सगळे कुणाचा ना कुणाचा मुलगा/मुलगी/बहीण/ भाऊ आहोत व तसेच इतरांचेही आपल्याशी नाते आहे व आपल्याला वरील यादीतील आपल्या कुणाही जिवलगाला

या प्रकारे गमवावे लागले तर आपण अतिशय अस्वस्थ होऊ म्हणूनच आपण सगळ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतल्यास व त्यानुसार कृती केल्यास, आपण अपघात कमी करू शकतो जी किमान एखादी हत्या मानली जाणार नाही हे नक्की; एवढे बोलून निरोप घेतो.


 संजय देशपांडे

smd156812@gmail.com

 

 





Friday, 24 May 2024

महाराष्ट्र राज्य व रिअल इस्टेटचे वर्तमान आणि भविष्य !















































महाराष्ट्र राज्य व रिअल इस्टेटचे वर्तमान आणि भविष्य !

 घर खरेदी करणे ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे यावर माझा नेहमी विश्वास असेल. याचे कारण? कारण तुम्ही समभाग प्रमाणपत्रामध्ये राहू शकत नाही. तुम्ही म्युच्युअल फंड प्रमाणपत्रामध्ये पण राहू शकत नाही.”

ओपरा विन्फ्रे

समभागांमधील गुंतवणुकीची (म्हणजे गुंतवणुकीच्या इतर पर्यायांमध्ये) तुलना घरासाठी केलेल्या गुंतवणुकीशी करणे हस्यास्पद  वाटू शकते तरीही सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, ज्यासाठी लेखिकेचे अवतरण प्रसिद्ध आहे, तुम्हाला जाणीव होईल की रिअल इस्टेटला नेहमी वाढती मागणी का राहिलेली आहे, मग ते अमेरिका असो किंवा भारताच्या ग्रामीण भागातील एखादे गाव किंवा अगदी आपले प्रिय पुणे. ओपरा विन्फ्रे यांची ओळख करून देण्याची गरज नाही, प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या व लहान पडद्यावरील आपल्या जादुई वावराने त्यांनी लाखोंची मने जिंकली, ज्यामध्ये लिंग, रंग, किंवा राष्ट्रीयत्व अशा कोणत्याही सीमांचा भेदभाव नाही. आपल्या विकसित राज्यातील (स्व-घोषित असे काहीजण म्हणू शकतात) रिअल इस्टेटविषयी बोलायचे झाल्यास माझ्या मनात या क्षेत्रातील अंतिम उत्पादनाचे म्हणजे घराचे काय महत्त्व आहे याचे अगदी सोप्या शब्दात वर्णन करण्याचा विचार आला, जे ओपरा यांनी केले आहे. मला या लेखासाठी माझा मित्र नरेंद्र जोशी याने उद्युक्त केले त्याने मला केवळ पुणे व भोवतालच्याच नव्हे तर एकूणच राज्यातील रिअल इस्टेटचे काय भवितव्य आहे याविषयी लिहण्यास सांगितले. यावर अनेकजण म्हणतील त्यात काय मोठेसे, बांधकाम व्यावसायिक नेहमीपैसे कमावतात त्यामुळे रिअल इस्टेटचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे, मी यावर वाद घालत बसत नाही पणपण असे असते तर रेराला (आपल्या राज्यामध्ये महारेरा) रिअल इस्टेटभोवती आपले कायदे व नियमांचा फास आवळण्याची गरज नव्हती. तसेच आर्थिक गुन्हे शाखा/अंमलबजावणी संचालनालय (आता अगदी शाळकरी मुलालाही ईओडब्ल्यू व ईडीचा लॉगफॉम माहिती आहे), यांनी कारवाई केलेली बहुतेक नावे जमीनीच्या किंवा रिअल इस्टेटच्या व्यवहारांशी संबंधित असतात.


रिअल इस्टेट क्षेत्राविषयी पूर्णपणे आदर राखून असे सांगावेसे वाटते की इथे व्यावसायिक होण्यासाठी फार काही डोके लावावे लागत नाही. परंतु तुम्ही एकदा रिअल इस्टेट व्यावसायिक (बांधकाम व्यावसायिक) झाल्यानंतर व थोडे पैसे कमावल्यानंतर थोडेफार डोके निश्चत लावावे लागते. इथेच वाढ, विकास, भवितव्य, भविष्य इत्यादी संज्ञांचा संदर्भ येतो, असे मला वाटते. मला असे वाटते कारण या व्यवसायाचे स्वरूपच असे आहे, मी नेहमी उल्लेख करतो की हा एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये इतर कोणत्याही व्यवसायाच्या उलट कच्चा माल तुमच्यापर्यंत येत नाही तर तुम्हाला कच्च्या मालापर्यंत जावे लागते व तो जिथे असेल तिथे त्यातून उत्पादन तयार करावे लागते. मला खात्री आहे की तुम्ही आता गोंधळात पडला असाल, म्हणून आता एक साधी तुलना करत आहे करत आहे, कार किंवा कपडे धुण्याची पावडर (मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या संदर्भात बोलत नाही) तयार करण्यासाठी तुम्ही खुल्या बाजारातून कच्चा माल खरेदी करू शकता व तो तुमच्या कारखान्यात आणून त्यापासून अंतिम उत्पादन तयार करू शकता. तुम्ही ते कोणत्याही ठिकाणाहून खरेदी करू शकता, जसे ऑटो उद्योगासाठी पोलाद महाराष्ट्रातील जालन्यापासून ते पश्चिम बंगालपर्यंत खरेदी करू शकता, जर कपडे धुण्याची पावडर बनवायची असेल तर तुम्ही त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कॉस्टिक सोडा गुजरातमधून किंवा गोव्यातून खरेदी करू शकता व हेच कोणत्याही उत्पादनासंदर्भात शक्य आहे. परंतु रिअल इस्टेट उद्योगाच्या संदर्भात मुख्य कच्चा माल म्हणजे जमीन व तुम्ही ती हस्तांतरित करू शकत नाही किंवा हलवू शकत नाही परंतु तुम्हाला तुमचा कच्चा माल जिथे आहे तिथे घरे बांधावी लागतात जे तुमचे अंतिम उत्पादन असते व म्हणूनच रिअल इस्टेट व्यवसाय वेगळा ठरतो. तुम्ही कच्च्या मालाचे म्हणजे जमीनीचे उत्पादन वाढवू शकत नाही परंतु तुम्ही उत्पादनाचे मूल्य किंवा अंतिम उत्पादन तयार करण्याची क्षमता वाढवू शकता, परंतु त्यालाही काही मर्यादा असतात. उदाहरणार्थ तुमचा कारचा कारखाना पुण्यामध्ये असेल व कारची मागणी पंजाबमध्ये अधिक असेल, तर तुम्ही तुमच्या कार पंजाबहून पुण्याला पाठवू शकता परंतु घरांची मागणी पंजाबमध्ये अधिक असेल तर तुम्ही पुण्याहून जमीनीसकट घरे पंजाबला पाठवू शकाल का, नाही, बरोबर? म्हणूनच तुम्ही जेव्हा रिअल इस्टेटच्या भवितव्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कच्च्या मालाची भोवतालची परिस्थिती विचारात घ्यावीच लागते कारण त्यानंतरच तुम्ही विशिष्ट ठिकाणाच्या किंवा शहरातील रिअल इस्टेटचे भवितव्य ठरवू शकता.


आपल्याकडे इतर देशांपेक्षा ज्याप्रकारे अतिशय वेगाने लोकसंख्या वाढत आहे व ही १५० कोटी लोकसंख्या अनेक आघाड्यांवर शाप आहे परंतु रिअल इस्टेटसाठी ते एकप्रकारे वरदानच आहे, अगदी पूर्णपणे नसले तरीही.
कारण या सगळ्या लोकांना राहण्यासाठी किंवा काम करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छप्पर हवे असेल व त्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल मर्यादित आहे व यामुळे रिअल इस्टेटला नेहमीच मागणी राहिली आहे, पण! हा पण, मागणी समजावून घेताना विचारात घेणे आवश्यक आहे कारण लोक असल्याशिवाय, रिअल इस्टेटला भवितव्य नाही व लोकांकडे त्यांच्या डोक्यावरचे छप्पर कायदेशीर मार्गाने खरेदी करण्याची क्षमता हवी व त्यासाठी धोरणे व तसेच त्या घरांच्या भोवती असलेल्या पायाभूत सुविधा मागणीला अनुसरून असल्या पाहिजेत. असे झाले तरच रिअल इस्टेटची भरभराट होऊ शकते, नाहीतर आपल्याकडे राजस्थानाच्या वाळवंटात किंवा ओडिसाच्या त्रिभुज प्रदेशात मुबलक जमीन आहे परंतु आपल्याकडे त्या घरांसाठी मागणी नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी बोलायचे झाले तर अगदी खेडेगावातल्या जमीनींचे दरही वाढले आहेत. मी विदर्भातील खामगाव नावाच्या एका लहानशा गावातून आलो आहे, अगदी माझ्या गावातही मुख्य बाजारातील रस्त्यालगतच्या दुकानांच्या किमती कर्वे रस्त्यावरील दुकानांएवढ्या झाल्या आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा मी खरोखरच सांगतोय. केवळ अशा मागणीचे प्रमाण हाच एकमेव फरक आहे, केवळ काही रस्ते व काही दुकानांसाठीच येथे ग्राहक असतात व हेच घरांच्या बाबतीतही खरे आहे, तसेच कार्यालयाच्या जागा बाबतीतही खरे आहे, मी याविषयी कमी बोललेलेच बरे. थोडक्यात सांगायचे, तर कोणत्याही ठिकाणी रिअल इस्टेटची जी वाढ होते किंवा त्याला जी मागणी असते ती त्याठिकाणी किंवा शहरामध्ये उपलब्ध असलेल्या संधींच्या प्रमाणात असते. कारण त्यामुळेच एखादी व्यक्ती तिथे घर घेण्याचा व त्याचा किंवा तिच्या कुटुंबासोबत तिथे स्थायिक होण्याचा विचार करेल.

 

या निकषानुसार बहुतांश रिअल इस्टेटचे पाच विभागांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये विभाजन केले जाऊ शकते, एक म्हणजे मुंबई शहर, दुसरे म्हणजे मुंबईची उपनगरे म्हणजे नवीन मुंबई किंवा पश्चिमेला वसई-विरार, तिसरे म्हणजे ठाणे-नाशिक-पुणे हा त्रिकोण, चौथा म्हणजे राज्यातील संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांच्या भोवताली असलेला भाग व पाचवा म्हणजे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिक केंद्रामध्ये व त्याभोवती होणारी वाढ. या भागांमध्ये रिअल इस्टेटची वाढ होत असली तरीही त्यांची कारणे वेगळी आहेत, तसेच या वाढीचा वेगही वेगळा आहे किंवा अशा प्रत्येक केंद्रामध्ये अनुक्रमे गुंतवणूक व विकास होण्याची शक्यताही कमी आहे. मुंबई शहराचे उदाहरण घ्या, १४५ कोटी पेक्षा अधिक लोकसंख्येमुळे, या लोकांची गरज पूर्ण करणे हीच रिअल इस्टेट क्षेत्राची सर्वात मोठी मागणी आहे व मुंबईच्या भौगोलिक स्थितीमुळे येथे जागा मर्यादित आहे. हे भारताचे आर्थिक/व्यापारी केंद्र आहे, त्यामुळे इथे लोकांकडे पैसा (म्हणजे करिअर) आहे, जो मुंबईतील रिअल इस्टेटला चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे. परंतु या स्वप्ननगरीमध्ये घर किंवा कार्यालय घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी किंमत चुकवावी लागते ती सर्वांनाच परवडत नाही. म्हणूनच मुंबई एकतर अति श्रीमंत किंवा अति गरीबांसाठी आहे, मला कुणाचाही अनादर करायचा नाही परंतु मला जो अनुभव आला तो इथे मांडतोय. मुंबई भोवतालच्या भागांमध्ये खऱ्या अर्थाने वाढ होत आहे, जेथे जमीन अजूनही उपलब्ध आहे. परंतु नोकऱ्यांसाठी मुख्य मुंबईवरच अवलंबून राहणे आवश्यक आहे, तरीही रिअल इस्टेटसाठी ही चांगली बाब आहे. इथे मुंबईपर्यंत जाण्या-येण्यासाठी प्रवासाची साधने तसेच घरांसाठी पायाभूत सुविधा उभारणे या गोष्टींमुळे फरक पडणार आहे. आपण सगळ्यात शेवटी पुणे प्रदेशाविषयी बोलू. राज्यातील महत्त्वाच्या शहरांवर एक नजर टाकू, मी स्वतः नागपूरकर असल्यामुळे, प्रत्येक दुसऱ्या घरातील कुणीतरी व्यक्ती इथून करिअरसाठी पुण्या-मुंबईला स्थलांतरित झाली आहे व ज्या व्यक्ती उरल्या आहेत त्यांच्याच जागेच्या किंवा जीवनशैलीच्या वाढत्या गरजांमुळे त्या शहरांमधील रिअल इस्टेट तरून आहे. ही आकडेवारी मोठी असली तरीही स्थानिक ग्रामीण भागांमधील लोक नागपूरसारख्या केंद्रांकडे स्थलांतरित होत आहेत, ज्याप्रमाणे नागपूरचे लोक पुण्याला स्थलांतरित होत आहेत. संभाजीनगर किंवा कोल्हापूरची स्थिती या शहरांभोवती झालेल्या औद्योगिकरणामुळे जरा बरी आहे, तरीही पुणे प्रदेशासारखे होण्यासाठी बरेच काही करायची गरज आहे, विशेषतः सामाजिक व सांस्कृतिक आघाडीवर, कारण एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेण्यामागेही ते एक मोठे कारण आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या शहरांमध्ये परिस्थिती जरा वेगळी आहे इथे स्थायिक झालेल्या कुटुंबांना त्यांच्या पुढील पिढीला त्यांच्या इच्छेने किंवा इच्छेविरुद्ध मोठ्या शहरांमध्ये पाठवायचे असते. त्यामुळे इथे घरांची मागणी कमी आहे तरीही घरांना जी काही थोडीफार मागणी आहे ती केवळ काही ठिकाणांपुरतीच मर्यादित आहे. यामुळे स्थानिक नागरी संस्थांचे महसूलाच्या आघाडीवरील काम अवघड होते व या शहरांच्या पायाभूत सुविधांवर थेट परिणाम होतो व हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे, नाहीतर या केंद्रांमधून पुणे प्रदेशाकडे होणारे स्थलांतर कधीही थांबणार नाही.


आता सगळ्यात शेवटी ठाणे-नाशिक-पुणे प्रदेशाविषयी व विशेषतः पुण्याभोवतालच्या प्रदेशाविषयी बोलू. इथे रिअल इस्टेटच्या वाढीसाठी सर्वकाही उपलब्ध आहे, परंतु हा प्रदेश सरकारकडून योग्य तो पाठिंबा नसताना किती काळ स्थलांतरितांचा भार सहन करू शकेल हा खरा प्रश्न आहे. आपण चेन्नई व बेंगलुरूसारख्या शहरांना पाणी व वाहतुकीसारख्या मुद्द्यांवर कसा त्रास होत आहे व अनेक कुटुंबे या शहरांमधून स्थलांतर करत आहेत हे आपण वाचत असतो. एख लक्षात घ्या कुणीही या जगात अमरत्व घेऊन येत नाही व एखादे शहरही या नियमाला अपवाद नाही. यात फरक केवळ एवढाच आहे की, शहरांचा इतर कारणाने नव्हे तर स्वतःच्याच ओझ्यामुळे, म्हणजे नागरिकांमुळे मृत्यू होतो. कारण पाणी, वाहने चालवण्यासाठी जागा, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नसेल, श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन नसेल, तर एखाद्या शहरामध्ये तुम्हाला नोकरी व प्रशस्त घर असूनही अशा जीवनाचा काय उपयोग, नाही का? या आघाडीवर सरकार अनभिज्ञ (म्हणजे निष्काळजी) असल्याचे वाटते कारण त्यांना केवळ टीडीआर, सशुल्क एफएसआय व टीओडी वाढवून इथे कच्च्या मालाची उत्पादन क्षमाता वाढविण्यात रस आहे. कच्च्या मालाचे अंतिम उत्पादनात रुपांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पाठिंब्याचे काय, ज्याविषयी कुणी एक चकार शब्दही बोलत नाही. हे म्हणजे तुम्हाला एक कार तयार करण्यास सांगण्यात आले व तुम्ही उंची अंतर्गत सजावट व सर्वोत्तम सुरक्षितता वैशिष्ट्ये असलेली व डिझायनर लुक असलेली कार तयार केली परंतु केवळ एकच गोष्ट विसरलात ती म्हणजे कारचे इंजिन!
पुणे प्रदेशातील परिस्थिती थोडीफार अशीच झाली आहे, ज्याविषयी रिअल इस्टेटने विचार केला पाहिजे व तुम्ही जेव्हा वाढीच्या लाटेवर स्वार असता तेव्हा हे शक्य होते, जी परिस्थिती आत्ता आहे. हे शहर व त्याभोवतालच्या भागात रिअल इस्टेटच्या संभाव्य वाढीसाठी आवश्यक ते सर्व काही आहे परंतु त्यांची एक मोठी जबाबदारीही आहे, ती म्हणजे तशाच, किंबहुना अधिच चांगल्या पायाभूत सुविधा देणे ज्या या वाढीमध्ये टिकून राहू शकतील. ज्याप्रमाणे आपल्या शरीरासाठी पांढऱ्या रक्तपेशी चांगल्या असतात कारण त्या संसर्गाविरुद्ध लढतात परंतु त्यांची संख्या फार वाढल्यामुळे कर्करोग होऊ शकतो, या मूलभूत बाबी पुणेकरांनो विसरू नका एवढे सांगून निरोप घेतो !

 


संजय देशपांडे

smd156812@gmail.com
























Saturday, 18 May 2024

वन पर्यटन समजावून घेताना ! (भाग पहिला)

 





















































वन पर्यटन समजावून घेताना ! (भाग पहिला)

                                                                       

जंगल नावाच्या शाळेमध्ये अनेक वर्ग असतात, पण त्या सगळ्यांमध्ये एकच सामाईक अभ्यासक्रम असतो, तो म्हणजे सहजीवन शिकणे” … मी.

मी स्वतःचेच विचार (म्हणजे अवतरण, कारण अवतरणे फक्त थोर व्यक्तींची असतात) लेखाच्या सुरुवातीला वापरले असल्यामुळे, तुम्हाला कल्पना आली असेल की हा लेख एखाद्या विवादास्पद विषयासंदर्भात नाही तर अनेकांना जो

विषय आवडेल कुतूहल आहे. परंतु ज्याविषयी अतिशय कमी लोक बोलतात (नाही, तुम्हाला जो विचार करताय ते नाही) त्यासंदर्भात आहे, मी वन्यजीवन पर्यटनाविषयी बोलतोय. कोव्हिडनंतर जंगलांना भेट देण्यात वाढ झाली आहे व प्रत्येकाला वाघ पाहायचाअसतो ज्याला दुर्दैवाने आपल्या देशामध्ये वन्यजीवन पर्यटन असे समजतात जे एकाअर्थी वरदानही आहे व शापही. हेमांगी व आरती या माझ्या मैत्रिणी शहरी महिलांना वन्यजीवनाची ओळख करून देण्यासाठी जंगल बेल्स नावाची संस्था चालवतात. या उपक्रमातून या महिलांना तसेच त्यांच्या मुलांना (कुटुंबियांना)

 प्रत्यक्ष वन्यजीवन व पर्यटनाविषयी माहिती नसलेल्या अनेक गोष्टींविषयी माहिती मिळते व त्यांच्यासोबत मलाही नवीन माहिती मिळते. त्यामुळे, आम्ही वन्यजीवन पर्यटनाविषयी आमचे अनुभव सांगण्यासाठी एक  चित्र संवाद मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला, ज्यांना वन्यजीवनाचा आनंद उपभोगायचा आहे त्यांना त्याची मदत व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. ही पॉडकास्ट मालिका सामान्य माणसाला वन्यजीवन पर्यटन समजून घेता यावे यासाठी तयार करण्यात आली आहे कारण याविषयासंदर्भात अनेक मिथके, चुकीच्या कल्पना असल्याचे आम्हाला जंगल बेल्सच्या गेल्या पाच वर्षांच्या प्रवासामध्ये विशेषतः कोव्हिडनंतरच्या काळामध्ये जाणवले आहे. एकीकडे, लोकांना वन्यजीवनाची नवनवीन ठिकाणे पाहायची आहेत, परंतु तरीही या सगळ्यांमधील समान धागा म्हणजे वन्यजीवन म्हटल्यावर प्रत्येकाला फक्त वाघ पाहायचा असतो ही वस्तुस्थिती आहे. परंतु इतर प्रकारच्या पर्यटनाविरुद्ध, मग मौजमजेसाठीचे असतो, वारसा स्थळे, ऐतिहासिक स्थळे असोत किंवा निसर्गातील भ्रमंती (पदभ्रमण) असो, यासगळ्यांपेक्षा वन्यजीवन पर्यटन वेगळे असते कारण येथे पैसे देऊनही काहीच तुमच्या इच्छेनुसार होतात, हीच त्यातली खरी गंमत असते. जंगल तेच असले तरीही ज्या घटना घडतात त्या एकाच स्वरूपाच्या कधीच नसतात, उदाहरणार्थ तुम्ही डिस्नेलँडला भेट दिल्यावर, संध्याकाळच्या संचलनामध्ये सर्व पात्रे एकत्र येतात व पर्यटकांना भेटतात, जे दररोज संध्याकाळी, एकाच वेळी व एकाच मार्गावर घडते. परंतु जंगलामध्ये एखादा वाघ किंवा बिबट्या किंवा हरिणांचा कळप कधीही एकाच वेळी एकच मार्ग घेत नाहीत. काही वेळा ते असे करत असल्यासारखे वाटत असले तरीही तो निव्वळ योगायोग असतो ज्याला आपण नशीब म्हणतो व हेच अनेक पर्यटकांना समजत नाही!

जंगलामध्ये कुठे जायचे आहे ते स्थान निवडण्यापासून ते सफारीच्या आरक्षणावरील मर्यादेपर्यंत अनेक नियमांचे पालन करावे लागते, तसेच खर्च होतो, जेव्हा वन्यजीव पर्यटन या विषय असतो तेव्हा अनेक पैलू वेगळे असतात. हे सर्व घटक सांगता व समजवता येऊ शकतात असे आम्हाला वाटले. हे केवळ लेखी स्वरूपातच नव्हे तर संवादाच्या म्हणजे ध्वनी-चित्र माध्यमातून मांडावे, जेणेकरून लोक जागरुक होतील असा आमचा विचार होता, म्हणून आम्ही विषय तीन भागांमध्ये मांडायचे ठरवले, ते म्हणजे "वन्यजीवन पर्यटनाच्या मूलभूत गोष्टी ", "वन्यजीवन पर्यटनाविषयी गैरसमजूत" "वन्यजीवन पर्यटनामध्ये काय करावे व काय करू नये”! मी थोडा भाग्यवान असल्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मला आपल्या देशातील अनेक जंगलांमध्ये भेट देता आली. म्हणूनच पहिल्यांदाच माझ्या मनात ज्या लोकांनी अजून जंगल पाहिलेले नाही परंतु ज्यांना जाण्याची इच्छा आहे तसेच ज्यांनी काही जंगले पाहिली आहेत व त्यामध्ये काही अडचणींना तोंड द्यावे लागले आहे किंवा वन्यजीवन पर्यटनाविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांना काही सूचना द्याव्यात (म्हणजे माझे अनुभव सांगावेत) असा विचार आला. मी स्वतः अगदी सहजपणे लिहू शकतो म्हणूनच पॉडकास्टसाठी मी माझे विचार लिहीण्याचे ठरवले. बऱ्याच लोकांना प्रश्नोत्तरासारख्या स्वरूपातील ध्वनीचित्रफित समजण्यास अधिक सोपी वाटू शकते हे मान्य असले तरीही ज्यांना वाचायला आवडते (अजूनही असे काही लोक आहेत) ते हा लेख वाचू शकतात. तर वन्यजीवन पर्यटन समजून घेण्यासाठी तुम्ही आधी वन्यजीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, यावर बरेचजण म्हणतील त्यात काय मोठेसे, जेथे वाघ आहेत त्याला वन्यजीवन म्हणतात व व्याघ्र प्रकल्प पाहणे म्हणजे वन्यजीवन पर्यटन. मी याला अज्ञान म्हणणार नाही, कारण आपल्या मनावर नेहमी हेच बिंबवले जाते की वन्यजीवन म्हणजे वाघ पाहणे आणि नेमके हेच आपल्याला समजून घ्यायचे आहे. माझ्या मते, (वन्यजीवनातील सर्व जाणत्या व्यक्तींविषयी आदर राखून) असे कोणतेही ठिकाण जेथे नैसर्गिक स्वरूपात जैवविविधता दिसून येते ज्यामध्ये झाडे—झुडुपे, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी (अगदी जलचरही) यांचा समावेश होतो व अशा कोणत्याही ठिकाणांना दिलेली भेट ही वन्यजीवन पर्यटनच मानता येईल. सुदैवाने, आपल्या देशाला अतिशय वैविध्यपूर्ण वन्यजीवनाचे वरदान लाभलेले आहे, ज्यामध्ये हिमालयातील जंगलांपासून ते राजस्थानातील वाळवंटांपर्यंत, कान्हातील सदाहरित साल वृक्षांच्या जंगलांपासून ते पूर्वेकडील पावसाळी जंगलांपर्यंत, मध्य भारतातील कोरड्या जंगलांपासून ते पश्चिम घाटापर्यंत, दख्खनच्या पठारावरील रखरखीत भागातील कुरणांपासून ते सागरी भागातील जंगलांपर्यंत तसेच हिंदी महासागर व अरबी समुद्रातील जीवनापर्यंत, आपल्याकडे अक्षरशः सर्व प्रकारचे वन्यजीवन उपलब्ध आहे. आपल्या देशातील छत्तीस केंद्रशासित राज्यांपैकी साधारणतः बारा राज्यांमध्ये वाघ आहेत, बिबट्या जवळपास सर्व राज्यांमध्ये आढळतो तर सिंह गुजरातेत व चित्ता मध्य भारतात दिसून येतो जर आपण मार्जार कुळाचा विचार केला. या सर्वांव्यतिरिक्त, प्रत्येक राज्यामध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये त्यांची वैशिष्ट्यपूर्ण झाडे-झुडुपे व प्राणी दिसून येतात. अगदी पंजाब व हरियाणासारख्या शहरी/शेतीप्रधान सध्या  राज्यांमध्ये वन्यजीवन आहे व मुंबईसारख्या अगदी गजबजलेल्या शहरामध्ये पश्चिम उपनगरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे व ही सर्व ठिकाणे वन्यजीवनाचेच स्वरूप आहेत.

एकदा तुम्हाला वन्यजीवन म्हणजे काय हे समजल्यानंतर तुम्ही त्यानुसार कुठे जायचे ते ठरवू शकता व यासाठी सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न असतो जंगलात जाण्यासाठी किंवा वन्यजीवन पर्यटनासाठी सर्वात चांगला हंगाम कोणता व कोणत्या ठिकाणी जावे (म्हणजे थोडक्यात, मला वाघ हमखास कुठे दिसू शकेल)? यावर माझे उत्तर असते वन्यजीवन पर्यटनासाठी प्रत्येक हंगाम हा चांगलाच असतो, तेच वन्यजीवनाचे सौंदर्य आहे. जंगल केवळ प्रत्येक हंगामातच नव्हे तर दररोज, सकाळी व संध्याकाळी वेगळे दिसते. परंतु मला माहिती आहे, लोकांना असे श्री सद्गुरू स्वरूपाचे उत्तर नको असते. म्हणूनच मी तुम्हाला मनमोकळेपणाने सांगतो की तुम्हाला वाघ पाहायचा असेल तर उन्हाळा हा सर्वोत्तम हंगाम आहे व त्यासाठी मध्य भारतातील जंगलांमध्ये जावे. आता खरे उत्तर द्यायचे झाले तर तुम्हाला वन्यजीवन पर्यटनामध्ये काय पाहायचे आहे हे तुम्ही ठरवले पाहिजे, व त्यानंतर हंगामाचा निर्णय घेता येईल तसेच. तुम्ही तुम्ही कुठल्या हवामानाला तोंड देऊ शकता हे तुम्ही समजून घेतले पाहिजे कारण तुम्हाला बर्फातील बिबट्या पाहायचा असेल तर तुम्हाला लेह-लडाखला जावे लागेल व तिथे अगदी उबदार तापमानही शून्य अंशांच्या जवळपास असते. वन्यजीवन पर्यटनात तुम्हाला प्रत्येक हंगामात काहीतरी वेगळे पाहायला मिळते उदाहरणार्थ कान्हा जंगलातील बारसिंघा (स्वँप डिअर) प्रत्येक हंगामात आपला रंग व केसाळ कातडी बदलतो. उन्हाळ्यामध्ये तो करड्या रंगाचा असतो व कातडीवरचे केस कमी करतो तर हिवाळ्यामध्ये त्याची केसाळ कातडी कॅडबरीसारख्या गडद तपकिरी रंगाची होते व उन्हाळ्याच्या सुरुवातीला ती सोनेरी पिवळ्या रंगाची असते. मी केवळ एका प्रजातीविषयी बोलतोय, कारण प्रत्येक प्रजाती, मग अगदी झाडेही (भुताटकीच म्हणत/रबराची झाडे) जसा हंगाम बदलतो तसे त्यांचे स्वरूप बदलते. तुम्ही सर्व हंगामांमध्ये जंगलात गेल्याशिवाय तुम्हाला सर्वाधिक काय आवडते हे तुम्हाला समजणार नाही व त्यानंतर परत जायचे का हे तुम्ही ठरवू शकता. तरीही, थोडाफार अभ्यास करून, योग्य व्यक्तींना प्रश्न विचारून, तुम्ही कुठे जायचे हे ठरवू शकता. हंगामाचा विचार करता, वैयक्तिकपणे बोलायचे झाले तर मला थंडी सहन होत नाही त्यामुळे हिवाळ्यामध्ये मध्य भारतातील जंगलांमध्ये जाणे मी टाळतो कारण तिथे पहाटेची थंडी गोठवणारी असू शकते. अशा हंगामांमध्ये तुम्ही किनारपट्टीच्या भागातील किंवा पश्चिम घाटातील जंगलांमध्ये जाऊ शकता जिथे फारशी थंडी नसते. जैसलमेरच्या वाळवंटामध्ये हिवाळ्यात पहाटे अतिशय थंडी असते, परंतु तुम्ही सकाळी बाहेर पडणे टाळून थोडे उशीरा म्हणजे सकाळी १०च्या सुमाराला सफारी सुरू करू शकता जेव्हा सूर्य वर आलेला असतो. तुम्हाला हवामान कितपत सहन होते याचा विचार करून तुम्ही असे बदल करू शकता. हासुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे, कारण वन्यजीव पर्यटनामध्ये वन्यजीवन पाहण्यासाठीच्या वेळा ठरवताना त्यावर तुमचे नियंत्रण नसते, निसर्गच ते करतो. वन्यजीवन आढळणाऱ्या बहुतेक ठिकाणांना भेट देण्याच्या वेळा स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात व सामान्यपणे त्या राज्यातील वन विभागाद्वारे ठरवल्या जातात. तुम्ही त्या ठिकाणी भेट देण्यापूर्वी त्याविषयी माहिती घेतली पाहिजे.
जेथे वाघ आहेत अशा बहुतेक जंगलांना एनटीसीएच्या (राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण) मार्गदर्शक तत्वांनुसार संचालनाची परवानगी दिली जाते, तर इतर ठिकाणी वेळा हंगामानुसार व सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळांप्रमाणे बदलतात कारण जंगलातील जीवन हे सूर्याभोवती फिरते. अनेक ठिकाणी आता नियंत्रितपणे रात्रीच्या सफारींनाही परवानगी दिली जाते.
अनेक लोक वन्य पर्यटनाच्या ठिकाणी निवासाची सोय व जेवणाच्या व्यवस्थेविषयी व सफारीदरम्यानच्या सुरक्षिततेविषयी विचारतात. आपण एक गोष्ट समजून घेतले पाहिजे, काही ठिकाणांचा अपवाद वगळता (रणथंबोरसारख्या) बहुतेक जंगले ही शहरी वसाहतींपासून (शहरे व गावे) लांब असतात व अगदी उत्तम सेवा देणे, प्रशिक्षित मनुष्यबळ, तसेच मोबाईलसाठी नेटवर्क, अशा सर्व गोष्टी मिळणे अतिशय अवघड असते व आपण या गोष्टींचा आदर करणे आवश्यक आहे. कारण अशा परिस्थितीतही येथील लोक सर्व अडचणींवर मात करून पर्यटकांना जास्तीत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला एक उदाहरणच द्यायचे झाले तर, तुम्हाला सकाळी च्या सफारीला जायचे असते तेव्हा तुम्हाला अंघोळीसाठी गरम पाणी देण्यापासून ते तुमच्या नाश्त्याचे पाकीट तयार करेपर्यंत सगळ्या गोष्टी करण्यासाठी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना पहाटे वाजता उठावे लागते व उन्हाळ्यातील तीव्र उष्णता असो कडाक्याची थंडी असो किंवा पाऊस त्यांना ते करावेच लागते. तुमच्यापैकी काही जण जेवणाच्या खोलीत रात्री उशीरापर्यंत पीत बसलेले असतात कारण सकाळच्या सफारीला न जाण्याचा पर्याय असतो परंतु कर्मचाऱ्यांना अशी चैन करता येत नाही. त्याचप्रमाणे बिझनेस स्कूलमधील सर्व वर्गवाऱ्यांमधील सुप्रशिक्षित कर्मचारी इथे येण्यासाठी व राहण्यासाठी तयार नसतात कारण अशा ठिकाणी ३६५ दिवस राहणे हे शहरी पांढरपेशा कर्मचाऱ्यांसाठी सोपे नसते. त्यामुळे बहुतेक हॉटेल अथवा रिसॉर्टना स्थानिक मनुष्यबळावर अवलंबून राहावे लागते, त्यांना कसे बोलायचे, कशी वेशभूषा असावी हे सगळे शिकवणे हे एक मोठे काम असते. पण एक लक्षात ठेवा त्यातूनच स्थानिक लोकांना रोजगार मिळतो व तेच वन्यजीवन वाचवू शकतात. अनेक हॉटेलमध्ये खोलीत इंटरकॉम यंत्रणा नसते, यामुळे पर्यटन लहान-सहान, अजिबात महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींसाठी कर्मचाऱ्यांना कॉल करत नाहीत. त्याचप्रमाणे वाय-फाय सेवाही सगळ्या खोल्यांमध्ये उपलब्ध नसते तर जेवणाच्या जागेसारख्या काही मध्यवर्ती ठिकाणीच उपलब्ध असते. याचे कारण म्हणजे आपण निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवण्यासाठी जंगलात जातो आपल्या आभासी जगात गुंगून राहण्यासाठी नव्हे, जे आपल्या काँक्रीटच्या जंगलात आपण बहुतेक वेळ असतोच, बरोबर?
त्याऐवजी वन्यजीवनाविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही जिथे राहात आहात त्याच्या आसपास भटकंती करण्यासाठी, स्थानिकांशी बोलण्यासाठी हा वेळ वापरा व तुम्हाला समजेल की जंगले किती अद्भूत असतात व त्याच्या विस्तीर्ण अवकाशात कितीतरी गोष्टी दडलेल्या असतात. सुरक्षिततेविषयी बोलायचे झाले, तर वन्यजीवनामध्ये तुम्ही त्यांच्या नियमांचे पालन केले व व्यवस्थित अंतर राखले तर तुम्ही आपल्या काँक्रीटच्या जंगलांपेक्षाही शेकडोपट सुरक्षित असता व हा माझा वैयक्तिक अनुभ आहे त्यासाठी व्यावसायिकांशी संपर्क आला पाहिजे. वन्यजीवन पर्यटनामध्ये सहभागी असलेले बहुतेक लोक स्थानिक आहेत, हळूहळू त्यांनाही समजू लागले आहे की पर्यटकांनी खर्च केलेल्या पैशातूनच स्थानिकांची जीवनशैली सुधारेल जे वन्यजीवन संवर्धनाचे सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळेच ते पर्यटकांना सर्वतोपरी मदत करतात व पर्यटकांची काळजी घेतात.

शेवटचा मुद्दा म्हणजे, मित्रहो तुम्ही जेव्हा एखाद्या जंगलात जाता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःचा वेळ मजेत घालवत नसता तर अनेक अप्रत्यक्षरित्या परिवारांना मदतही करत असता, विशेषतः जंगलाच्या अवती-भोवती राहणाऱ्या व्यक्तींना. निसर्गाचे ऋण फेडण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, कारण हा निसर्ग म्हणजे देवाने माणसाला दिलेली एक भेटच आहे व माझ्यामते वन्यजीवन पर्यटनाचा हा सर्वोत्तम पैलू आहे. तुम्ही इथपर्यंत वाचले असेल तर संयमासाठी तुमचे आभार. तुम्ही एवढा संयम ठेवून जंगलाला भेट देण्यास गेलात तर नक्कीच तुम्हाला त्याविषयी अधिक चांगल्याप्रकारे शिकता येईल व त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही जंगलांना प्रत्येक हंगामात भेटत राहाल, एवढे सांगून निरोप घेतो

तुम्ही आमचे पॉडकास्ट यूट्यूबच्या खालील दुव्यावर पाहू शकता व तरांनाही आवजूशेअर करा

 

You can watch our sharing on You Tube link below in detail & plz do share …

 

 https://youtu.be/0m9b7UnF5m0?si=RoZQXQYp2oXGDRRc

 

 

संजय देशपांडे

smd156812@gmail.com